शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

मराठ्यांचे मोर्चे मूक, संख्या मात्र बोलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2016 00:11 IST

राज्याच्या ३५ जिल्ह्यांसह जगातल्या १८ देशांमध्ये मराठ्यांचे मूकमोर्चे निघालेत.

प्रवीण गायकवाड : मराठा आरक्षण हवेच, १४ डिसेंबरला नागपुरात महामोर्चाअमरावती : राज्याच्या ३५ जिल्ह्यांसह जगातल्या १८ देशांमध्ये मराठ्यांचे मूकमोर्चे निघालेत. राज्यात तर तीन कोटी मराठे एकत्र आलेत. जगाने नोंद घेतली. आतापर्यंतच्या मूकमोर्चाचे रेकॉर्ड ३.५० लाखांचे होते. मात्र मराठ्यांच्या मोर्चांनी ते रेकॉर्ड केव्हांचेच मोडले असून मोर्चे मूक होते, संख्या मात्र बोलकी असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले. सकल मराठा समाजाच्यावतीने सोमवारी येथील मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख व्याख्यानमाला घेण्यात आली. त्यात ‘मराठा मोर्चामागील असंतोषाची कारणे’ या विषयावर प्रवीण गायकवाड बोलत होते. व्याख्यानमालेचे उद्घाटक म्हणून आ. यशोमती ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. वीरेंद्र जगताप होते. व्यासपीठावर जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अरविंद गावंडे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मोहिते, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा मयुरा देशमुख, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमाकांत तेटू, तिरळे कुणबी समाजाचे रमेश आळे, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे हेमंत देशमुख यांची उपस्थिती होती. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजानंतर तब्बल २७ वर्ष मराठे नेतृत्वाविना लढले. तंजावरपासून पेशावरपर्यंत राज्य निर्माण केले. त्यामुळे मराठ्यांच्या नेतृत्वावर कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. मात्र आज आर्थिक हलाखीमुळे मराठ्यांची परिस्थिती बेताची झाली आहे. त्या अनुषंगाने राज्यभर नव्हे, तर देशभर निघालेल्या मोर्चांमध्ये आम्ही २२ मागण्या मांडल्या. त्या मागण्यांचा तांत्रिक, कायदेशीर आणि घटनात्मक अभ्यास करण्यासाठी आम्ही तज्ज्ञ समिती नेमली असून १४ डिसेंबरच्या मोर्चाच्या निवेदनानंतर सरकारला उणिव काढण्यास संधीच राहणार नाही, असे गायकवाड म्हणाले. मराठा मोर्चाची दखल जगाने घेतली आहे. जगाच्या पाठीवर अभूतपूर्व मूकमोर्चा असे नामानिधान या मोर्चाने मिळविले असून मराठ्यांमधील खदखद या मोर्चातून रस्त्यावर आल्याचे ते म्हणाले. तर मराठा आरक्षण वास्तव आणि गरज या विषयावर बोलताना याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू मांडली. मराठा मोर्चानंतर अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणामध्ये कमी आली असून हक्काच्या शिक्षणासाठी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. शेती तोट्याची होणे, हे मराठ्यांच्या माघारण्याचे मुख्य कारण असल्याचे आ. वीरेंद्र जगताप म्हणाले तर आ. यशोमती ठाकूर यांनी मराठ्यांनी स्पिरीट जोपासले पाहिजे, नेमके काय करावयाचे आहे ते ठामपणे ठरविले पाहिजे, अशी भूमिका मांडली.