शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांचे मोर्चे मूक, संख्या मात्र बोलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2016 00:11 IST

राज्याच्या ३५ जिल्ह्यांसह जगातल्या १८ देशांमध्ये मराठ्यांचे मूकमोर्चे निघालेत.

प्रवीण गायकवाड : मराठा आरक्षण हवेच, १४ डिसेंबरला नागपुरात महामोर्चाअमरावती : राज्याच्या ३५ जिल्ह्यांसह जगातल्या १८ देशांमध्ये मराठ्यांचे मूकमोर्चे निघालेत. राज्यात तर तीन कोटी मराठे एकत्र आलेत. जगाने नोंद घेतली. आतापर्यंतच्या मूकमोर्चाचे रेकॉर्ड ३.५० लाखांचे होते. मात्र मराठ्यांच्या मोर्चांनी ते रेकॉर्ड केव्हांचेच मोडले असून मोर्चे मूक होते, संख्या मात्र बोलकी असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले. सकल मराठा समाजाच्यावतीने सोमवारी येथील मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख व्याख्यानमाला घेण्यात आली. त्यात ‘मराठा मोर्चामागील असंतोषाची कारणे’ या विषयावर प्रवीण गायकवाड बोलत होते. व्याख्यानमालेचे उद्घाटक म्हणून आ. यशोमती ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. वीरेंद्र जगताप होते. व्यासपीठावर जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अरविंद गावंडे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मोहिते, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा मयुरा देशमुख, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमाकांत तेटू, तिरळे कुणबी समाजाचे रमेश आळे, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे हेमंत देशमुख यांची उपस्थिती होती. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजानंतर तब्बल २७ वर्ष मराठे नेतृत्वाविना लढले. तंजावरपासून पेशावरपर्यंत राज्य निर्माण केले. त्यामुळे मराठ्यांच्या नेतृत्वावर कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. मात्र आज आर्थिक हलाखीमुळे मराठ्यांची परिस्थिती बेताची झाली आहे. त्या अनुषंगाने राज्यभर नव्हे, तर देशभर निघालेल्या मोर्चांमध्ये आम्ही २२ मागण्या मांडल्या. त्या मागण्यांचा तांत्रिक, कायदेशीर आणि घटनात्मक अभ्यास करण्यासाठी आम्ही तज्ज्ञ समिती नेमली असून १४ डिसेंबरच्या मोर्चाच्या निवेदनानंतर सरकारला उणिव काढण्यास संधीच राहणार नाही, असे गायकवाड म्हणाले. मराठा मोर्चाची दखल जगाने घेतली आहे. जगाच्या पाठीवर अभूतपूर्व मूकमोर्चा असे नामानिधान या मोर्चाने मिळविले असून मराठ्यांमधील खदखद या मोर्चातून रस्त्यावर आल्याचे ते म्हणाले. तर मराठा आरक्षण वास्तव आणि गरज या विषयावर बोलताना याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू मांडली. मराठा मोर्चानंतर अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणामध्ये कमी आली असून हक्काच्या शिक्षणासाठी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. शेती तोट्याची होणे, हे मराठ्यांच्या माघारण्याचे मुख्य कारण असल्याचे आ. वीरेंद्र जगताप म्हणाले तर आ. यशोमती ठाकूर यांनी मराठ्यांनी स्पिरीट जोपासले पाहिजे, नेमके काय करावयाचे आहे ते ठामपणे ठरविले पाहिजे, अशी भूमिका मांडली.