शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

मणीबाईची कल्याणी प्रथम

By admin | Updated: June 14, 2017 00:02 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन पद्धतीने जाहीर झाला.

दहावीतही मुलीच : सामराची प्रियल, मोर्शीची संपदा, शिरजगावचा प्रसाद संयुक्तपणे द्वितीय लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन पद्धतीने जाहीर झाला. शहरातील मणीबाई गुजराती हायस्कूलची विद्यार्थिनी कल्याणी पुरूषोत्तम धावडे हिने ९८.४० टक्क्यांसह (क्रीडा गुण वगळून) जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. कल्याणीला एकूण ४९२ गुण मिळाले आहेत. तर भंवरीलाल सामरा हायस्कूलची विद्यार्थिनी प्रियल सराफ, मोर्शी येथील शांतीनिकेतन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी संपदा आजनकर आणि चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील बालमुकुंद राठी विद्यालयाचा विद्यार्थी प्रसाद इंगळे या तिघांनी ५०० पैकी ४९० गुणांसह ९८ टक्केवारी मिळवून जिल्ह्यातून संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्याच्या दहावीच्या निकालावर यंदा देखील मुलींचाच वरचष्मा आहे. जिल्ह्याला टॉपर देणाऱ्या मणिबाई गुजराती हायस्कूलचा निकाल ९५.७१ टक्के लागला आहे. तर भंवरीलाल सामरा इंग्लिश हायस्कूलने यंदाही उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली असून या शाळेचा निकाल ९९.१७ टक्के लागला आहे. १२१ विद्यार्थ्यांपैकी १२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. गेल्या वर्षी याच शाळेची विद्यार्थिनी प्राची उदासी हिने जिल्ह्यातून अव्वल क्रमांक पटकावला होता. विद्यार्थ्यांना शाळेतूनच योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने यंदाही यशाची परंपरा कायम राखता आली, असे मत भंवरीलाल सामरा विद्यालयाचे मुख्याध्यापक मोहन राठी यांनी व्यक्त केले. शहरातील अरूणोदय शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्याचप्रमाणे ज्ञानमाता हायस्कूल ९६.४५, समर्थ हायस्कूल ९७.२७, होलिक्रॉस कॉनव्हेंट इंग्लिश हायस्कूल १०० टक्के, नारायणदास लढ्ढा हायस्कूल ९८.३८ टक्के, मनपा उर्दू हायस्कूल ९७.८२, तखतमल इंग्लिश हायस्कूल ९७.८८, सेंट फ्रान्सिस हायस्कूल ९९.३० टक्के निकाल लागला आहे.कल्याणीला व्हायचेय आयएएसअमरावती : माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता दहावी) जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावून नेत्रदीपक यश संपादन करणारी मणिबाई गुजराती हायस्कूलची विद्यार्थिनी कल्याणी धावडे हिला भविष्यात आयएएस, आयपीएस होऊन देशसेवा, समाजसेवा करायची आहे. कल्याणीने दहावीच्या परीक्षेत ९८.४० टक्के गुण प्राप्त केले आहेत. जिल्ह्यातून प्रथम येण्याची बातमी कळताच उत्साहाने ओथंबलेली कल्याणी ‘लोकमत’शी भरभरून बोेलली. ती म्हणाली दररोज दोन तास चिकाटीने अभ्यास, नियमित ट्यूशन क्लासेस, शाळेत एकाग्रतेने लक्ष देणे, यामुळेच हे यश मिळू शकले. कल्याणीचे वडील शहरातील बोके प्रिंटर्समध्ये कार्यरत आहेत तर आई गृहिणी आहे. आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य असलेल्या कल्याणीला भविष्यात खूप अभ्यास करून प्रशासकीय सेवेत जायचे आहे. त्यासाठी सद्यस्थितीत ती ‘आयआयटी’चा अभ्यास करीत असून यातून सायन्स व्होकेशनलला जाऊन व अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन पुढे स्पर्धा परीक्षा देण्याचा तिचा मानस आहे. आपल्या या यशाचे श्रेय ती आई-वडिल, शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांसह शिकवणीवर्गाच्या संचालकांना देते.