शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

२१ कर्मचार्‍यांवर ५५ गावांचा कारभार

By admin | Updated: July 13, 2014 22:43 IST

आसेगाव पोलीस स्टेशनची व्यथा: निवासस्थानांची पडझड, कर्मचार्‍यांवर अतिरिक्त भार

देपुळ : इतरांच्या समस्या मार्गी लावणार्‍या आसेगाव पोलिस स्टेशनलाच सद्यस्थितीत विविध समस्यांनी ग्रासले आहे. पोलिस निवासस्थानांची दुरवस्था झाली असून मनुष्यबळाचीही कमतरता जाणवत आहे. ५५ गावांच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी २१ कर्मचार्‍यांना पेलावी लागत आहे. आसेगाव पोलीस स्टेशनला ३६ कर्मचारी मंजूर असताना येथे केवळ २१ कर्मचार्‍यावर ५५ गावांचा कारभार ठाणेदार एस.व्ही. लष्करे यांना पाहावा लागत असल्याने त्यांना कायदा व सुव्यवस्था शांतता प्रदान करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या ५५ गावामध्ये रात्रीच्या गस्तीसाठी पोलीस लागतात. पोलीस स्टेशनमध्येही राखीव ठेवावे लागतात. यामध्ये भांडण, तंटे यांच्या फिर्यादी निपटारे, कार्यवाया, महिलांचा छेड, अवैध धंदे, सणवारानिमित्त वेळोवेळीचे बंदोबस्त कोर्टाचे प्रकरण, खात्याच्या डागा यातही कर्मचारी गुंततात अशा बिकट परिस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठाणेदाराला तारेवरची कसरत करावी लागत आहे. आसेगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांसाठी बांधण्यात आलेले निवासस्थानामध्ये ठाणेदाराचे निवासस्थान वगळता सर्वच निवासस्थानाची पडझड झाली आहे. तसेच छतावरचे कवेलू फुटले.भिंती कोसळल्या, दार खिडक्या मोडल्या या निवासामध्ये झाडही वाढत आहेत. याची अवस्था भूकंप झाल्यासारखी झाली. त्यामुळे पोलिसांना येथे राहता येत नाही आणि आसेगावमध्ये त्यांना कुटुंब घेउन राहण्यासाठी जागाही भाड्याने मिळत नसल्याचा दावा पोलिस कर्मचार्‍यांनी केला आहे. भाड्याने जागा मिळत नसल्याचे कारण समोर करून शहराच्या ठिकाणावरून अपडाउन केल्याशिवाय पर्याय नाही. मुख्यालयी राहावे तर निवास नाही, बाहेरगावी राहावे तर मुख्यालयाचा नियम आहे. ईकडे आड तिकडे विहीर अशी आसेगाव पोलिसांची गत झाली आहे. याकडे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जातीने लक्ष घालून आसेगाव पो.स्टे.ला मंजुरातीप्रमाणे कर्मचारी द्यावे व निवासाची दुरुस्ती करावी, अशी जनतेची मागणी होत आहे.