शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावातील कुपोषित बालक दगावले

By admin | Updated: July 3, 2017 00:29 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या मेळघाटातील चार गावांपैकी घोटा गावातील कुपोषित बालक आठवडाभर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या मेळघाटातील चार गावांपैकी घोटा गावातील कुपोषित बालक आठवडाभर औषधोपचार घेतल्यानंतर शनिवारी रात्री दगावले. या कुपोषित बालकाचे प्राण वाचविण्यात शासकीय यंत्रणा ‘फेल’ ठरली आहे. सुमित बालकराम जांबेकर (५) असे मृत बालकाचे नाव आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सन-२०१५ मध्ये मेळघाटातील घोटा, भुलोरी, राणामालूर व बेसावर्डा ही चार गावे कुपोषणमुक्तीसाठी दत्तक घेतली होती. या चारही गावांवर मुख्यमंत्र्यांसह आयएएस अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष होते. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी देखील सातत्याने मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावांवर सूक्ष्म लक्ष ठेवून होते. मात्र, मागील आठडवड्यात सुमित जांबेकर याला कुपोषणाने ग्रासल्याने त्याच्यावर प्रारंभी हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आलेत. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात १४ जून रोजी पाठविले. परंतु या बालकाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे शासकीय मेडिकल रूग्णालयात १६ जून रोजी उपचारासाठी पाठविले. तेथे त्याच्यावर १६ ते २१ जूनदरम्यान मेडिकलमध्ये नियोजनबद्धपणे उपचार सुरू झालेत. पाच दिवसांनंतर बालकाची प्रकृती सुधारताच त्याच्या आई-वडिलांनी २२ जून रोजी नागपूर येथील शासकीय मेडिकल रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना काहीही न कळविता बाळाला घेऊन परस्पर घोटा गाव गाठले. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी या बालकावर पारंपरिक पद्धतीने भूमकाद्वारे उपचार सुरू केलेत. मात्र, या बालकाची प्रकृती फारच ढासळली असल्याचे हे वृत्तपत्रांमधून प्रकाशित झाले. पुन्हा आरोग्य यंत्रणा जागी झाली आणि कुपोषित बालकाला अमरावतीच्या ‘होप’ या खासगी रूग्णालयात २४ जून रोजी उपचारासाठी दाखल केले. जिल्हाधिकाऱ्यांचा होता सूक्ष्म ‘वॉच’अमरावती : आठ दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी १ जुलै रोजी उशिरा रात्री १ वाजता प्राणज्योत मालवली. आई-वडिलांचे अज्ञान, आरोग्य यंत्रणांचे दुर्लक्ष आदींमुळे सुमितला प्राण गमवावे लागले, हे विशेष.सुमित जांबेकर (साडेपाच वर्षे) याकुपोषित बालकाचे प्राण वाचावेत, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर हे स्वत: सूक्ष्म लक्ष ठेवून होते. नागपूर मेडिकलमधून सुमितला त्याचा आई-वडिलांनी उपचाराविनाच परत आणले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी उपचार करण्यासाठी त्याला पुन्हा अमरावतीत आणले. सुमितची प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालातील अतिदक्षता विभागात ठेवले. सुमितचे प्राण वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, सीएस अरुण राऊत यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले. मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेली अन् सुमित दगावला.