शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
3
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
4
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
5
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
6
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
7
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
8
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
9
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
10
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
11
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
12
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
13
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
14
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
15
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
16
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
17
Astro Tips: मोगऱ्याचा गजरा आणि प्रिय व्यक्ती, शुक्रवारी करा 'हा' उपाय, वाढवा घरची श्रीमंती!
18
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
19
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
20
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!

महेंद्रीचे विश्रामगृह झाले १०८ वर्षांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर सातपुड्याच्या उंच टेकडीवर तालुक्यातील महेंद्री येथील विश्रामगृह आहे. त्या काळात या बांधकामाला २ हजार ६५८ रुपये खर्च झाल्याची नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. वातवरणीय बदलानुसार विश्रामगृहाचे वातावरण राहावे, याकरिता दगडांमध्ये भिंती बांधण्यात आल्या असल्या तरी वरचे छत गवताचे होते.

ठळक मुद्देबेदखल : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाताहत, ऐतिहासिक वास्तू जपण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : येथून २० किमी अंतरावर असलेल्या महेंद्री येथील ब्रिटिशकालीन विश्रामगृहाला १०८ वर्षे पूर्ण झाली आहेत. इतिहासाची साक्ष देणारी ही वास्तू डौलात उभी असली तरी पुरेशा डागडुजीअभावी तिला घरघर लागली आहे. वनविभागाने या विश्रामगृहाकडे दुर्लक्ष चालविले आहे. ब्रिटिशांनी सन १९१२ मध्ये या विश्रामगृहाची उभारणी विदेशी पाहुण्यांच्या निवासाकरिता केली होती.महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर सातपुड्याच्या उंच टेकडीवर तालुक्यातील महेंद्री येथील विश्रामगृह आहे. त्या काळात या बांधकामाला २ हजार ६५८ रुपये खर्च झाल्याची नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. वातवरणीय बदलानुसार विश्रामगृहाचे वातावरण राहावे, याकरिता दगडांमध्ये भिंती बांधण्यात आल्या असल्या तरी वरचे छत गवताचे होते. वास्तव्यास असलेल्या अधिकाऱ्यांना तसेच पाहुण्यांना हवा मिळावी म्हणून दोराने हलणारा पंखा आणि ते हलविणारा माणूस असायचा. प्रकाशाकरिता कंदील होते. महेंद्री टेकडीवर अमरावती-पांढुर्णा राज्य महामार्गाच्या बाजूलाच हे विश्रामगृह साकारण्यात आले आहे.टेकडीवर असल्याने येथून सभोवतालच्या हालचाली माहिती पडायच्या. शत्रूसुद्धा पोहोचू शकत नव्हता. येथे दोन शयनकक्ष, एक माजघर, एक भोजनकक्ष तसेच खानसामा आणि चौकीदाराचेसुद्धा निवासस्थान आहे. संपूर्ण बांधकाम दगडी आहे. सभोवताल दाट जंगल आणि बाजूच्या टेकडीवर महेंद्री हे छोटेसे २० घरांचे गाव आहे.विश्रामगृहाची देखभाल वरूड वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून केली जाते. वनविभागाने लक्ष देऊन विश्रामगृहाची ऐतिहासिक वास्तू जपण्याची मागणी निसर्गप्रेमी संस्थांकडून केली जात आहे.इको-टुरिझमचा प्रस्ताव धूळखातसात-आठ वर्षांआधी तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी इको-टुरिझमचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविला. मात्र, अद्यापही या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. त्या प्रस्तावास शासनाने हिरवी झेंडी दिल्यास पर्यटकांची संख्या वाढून उत्पन्नात भर पडेल. मात्र, त्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. येथील खानसामा सेवानिवृत्त झाल्यानंतर वास्तव्यास कोणीच नसतो. या विश्रामगृहाची फरपट थांबलेली नाही. येथे गेल्या दोन-तीन वर्षांपासून नूतनीकरणाचे काम सुरू असून, विद्युत व्यवस्था नाही. यामुळे विश्रामगृहाला अखेरची घरघर लागली आहे.सुविधांमुळे सौंदर्यात भरकाळानुरूप बदल करून येथे सन १९८७-८८ मध्ये विद्युत व्यवस्था, स्वयंचलित पंखे, कौलाचे छप्पर व सुंदर उद्यान साकारण्यात आले. येथे स्वातंत्र्यानंतर उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय नेतेसुद्धा वास्तव्यास असतात. महेंद्री पंढरी जंगलातून राज्य महामार्ग, जंगलातील पशू-पक्षी तसेच सांैदर्यांत भर टाकणारा वर्धा डायव्हर्शन सुपर एकसप्रेस कॅनाल आणि तीन किमी लांबीचा विलोभनीय बोगद्याचा कालवा आहे. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, हरिण, सांबर, निलगाय आदी प्राण्यांचा सततचा वावर पर्यटकांना मोहवून टाकणारा आहे.

टॅग्स :Socialसामाजिक