शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
3
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
4
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
5
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
6
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
7
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
8
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
9
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
10
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
11
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
12
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
13
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
14
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
15
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
16
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
17
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
18
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
19
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
20
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?

महाविकास आघाडी सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:17 IST

कॅप्शन - पत्रकार परिषदेला संबोधित करताना सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. व्यासपीठावर भूपेश थुलकर, सुधाकर वानखडे आदी. ---------------------------------------------------------------------------------------------------------- रामदास ...

कॅप्शन - पत्रकार परिषदेला संबोधित करताना सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. व्यासपीठावर भूपेश थुलकर, सुधाकर वानखडे आदी.

----------------------------------------------------------------------------------------------------------

रामदास आठवले यांचे प्रतिपादन, काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडून सेनेने भाजपशी युती करावी

अमरावती : १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) निर्माण करण्याचे अधिकार राज्यांना बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत केले.

केंद्र सरकारने मराठा आरक्षणसंदर्भात संसदेत विधेयक मंजूर केले आहे. एसईबीसी प्रवर्ग तयार करूनही मराठा आरक्षण देण्यात अडचण येऊ शकते, हे लक्षात घेऊन घटनेत नमूद असलेल्या ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याच्या हालचाली महाविकास आघाडी सरकारने चालविल्या आहेत. मात्र, तामिळनाडू सरकारने ६९ टक्क्यांपर्यंत आरक्षण दिले आहे. हे उदाहरण समोर ठेवून एखाद्या समाजाला न्याय देण्याची भूमिका असेल, तर आरक्षणाची टक्केवारी वाढली, तर हा विषय गौण ठरवावा, असे ना. आठवले म्हणाले. घटनेच्या ३४२ अ (३) मध्ये १२७ वी घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. यात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाची स्वत: ची यादी तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारला देण्यात आले आहे. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी न्यायिक आहे. ज्यांची उत्पन्न क्षमता आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात योग्य ते पाऊल उचलणे आवश्यक आहे, अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरल्यास महाविकास आघाडी सरकारची सळो की पळो अशी स्थिती होईल, असा टोलाही ना. आठवले यांनी लगावला.

पत्रपरिषदेला भूपेश थुलकर, सुधाकर वानखडे, रिपाइंचे गटनेता प्रकाश बनसोड, सिनेट सदस्य मनीष गवई, ओमप्रकाश बनसोड आदी उपस्थित होते.

---------------------------

सेनेने भाजपशी जुळवून घ्यावे

महाविकास आघाडी सरकार किती दिवस राहील, हे सांगता येत नाही. मात्र, शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपशी युती करावी. याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोललो आहे. सेनेने तसे पाऊल उचलल्यास भाजप-सेना पुन्हा युती होऊन राज्यात जनतेच्या हिताचे सरकार स्थापन होईल, अन्यथा येत्या काळात शिवसेना संपेल, असा इशारा ना. रामदास आठवले यांनी दिला. जनतेच्या हितासाठी महायुतीचे सरकार आले पाहिजे, असे ना. आठवले म्हणाले.

-----------------

प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपाइंचे ऐक्य नाही

एकट्या रिपाइंच्या भरवशावर आमदार, खासदार निवडून येणे शक्य नाही. त्याकरिता मोठ्या पक्षाशी युती, आघाडी करावी लागेल. रिपाइंच्या ऐक्यासाठी मी तयार आहे. केंद्रीय मंत्रिपदाचा त्याग करतो. मात्र, प्रकाश आंबेडकर हे सोबत आले तरचं रिपाइंचे ऐक्य नाही, असे ना. रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली, पण अपशय आले, हा इतिहास बघता रिपाइंने वाटचाल करावी, असे ना. आठवले म्हणाले.