शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:17 IST

कॅप्शन - पत्रकार परिषदेला संबोधित करताना सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. व्यासपीठावर भूपेश थुलकर, सुधाकर वानखडे आदी. ---------------------------------------------------------------------------------------------------------- रामदास ...

कॅप्शन - पत्रकार परिषदेला संबोधित करताना सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. व्यासपीठावर भूपेश थुलकर, सुधाकर वानखडे आदी.

----------------------------------------------------------------------------------------------------------

रामदास आठवले यांचे प्रतिपादन, काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडून सेनेने भाजपशी युती करावी

अमरावती : १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) निर्माण करण्याचे अधिकार राज्यांना बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत केले.

केंद्र सरकारने मराठा आरक्षणसंदर्भात संसदेत विधेयक मंजूर केले आहे. एसईबीसी प्रवर्ग तयार करूनही मराठा आरक्षण देण्यात अडचण येऊ शकते, हे लक्षात घेऊन घटनेत नमूद असलेल्या ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याच्या हालचाली महाविकास आघाडी सरकारने चालविल्या आहेत. मात्र, तामिळनाडू सरकारने ६९ टक्क्यांपर्यंत आरक्षण दिले आहे. हे उदाहरण समोर ठेवून एखाद्या समाजाला न्याय देण्याची भूमिका असेल, तर आरक्षणाची टक्केवारी वाढली, तर हा विषय गौण ठरवावा, असे ना. आठवले म्हणाले. घटनेच्या ३४२ अ (३) मध्ये १२७ वी घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. यात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाची स्वत: ची यादी तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारला देण्यात आले आहे. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी न्यायिक आहे. ज्यांची उत्पन्न क्षमता आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात योग्य ते पाऊल उचलणे आवश्यक आहे, अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरल्यास महाविकास आघाडी सरकारची सळो की पळो अशी स्थिती होईल, असा टोलाही ना. आठवले यांनी लगावला.

पत्रपरिषदेला भूपेश थुलकर, सुधाकर वानखडे, रिपाइंचे गटनेता प्रकाश बनसोड, सिनेट सदस्य मनीष गवई, ओमप्रकाश बनसोड आदी उपस्थित होते.

---------------------------

सेनेने भाजपशी जुळवून घ्यावे

महाविकास आघाडी सरकार किती दिवस राहील, हे सांगता येत नाही. मात्र, शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपशी युती करावी. याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोललो आहे. सेनेने तसे पाऊल उचलल्यास भाजप-सेना पुन्हा युती होऊन राज्यात जनतेच्या हिताचे सरकार स्थापन होईल, अन्यथा येत्या काळात शिवसेना संपेल, असा इशारा ना. रामदास आठवले यांनी दिला. जनतेच्या हितासाठी महायुतीचे सरकार आले पाहिजे, असे ना. आठवले म्हणाले.

-----------------

प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपाइंचे ऐक्य नाही

एकट्या रिपाइंच्या भरवशावर आमदार, खासदार निवडून येणे शक्य नाही. त्याकरिता मोठ्या पक्षाशी युती, आघाडी करावी लागेल. रिपाइंच्या ऐक्यासाठी मी तयार आहे. केंद्रीय मंत्रिपदाचा त्याग करतो. मात्र, प्रकाश आंबेडकर हे सोबत आले तरचं रिपाइंचे ऐक्य नाही, असे ना. रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली, पण अपशय आले, हा इतिहास बघता रिपाइंने वाटचाल करावी, असे ना. आठवले म्हणाले.