शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025 : मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
7
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
8
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
9
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
10
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
11
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
12
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
13
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
14
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
15
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
16
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
17
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
18
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
19
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
20
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?

महाविकास आघाडी सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:17 IST

कॅप्शन - पत्रकार परिषदेला संबोधित करताना सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. व्यासपीठावर भूपेश थुलकर, सुधाकर वानखडे आदी. ---------------------------------------------------------------------------------------------------------- रामदास ...

कॅप्शन - पत्रकार परिषदेला संबोधित करताना सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. व्यासपीठावर भूपेश थुलकर, सुधाकर वानखडे आदी.

----------------------------------------------------------------------------------------------------------

रामदास आठवले यांचे प्रतिपादन, काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडून सेनेने भाजपशी युती करावी

अमरावती : १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) निर्माण करण्याचे अधिकार राज्यांना बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत केले.

केंद्र सरकारने मराठा आरक्षणसंदर्भात संसदेत विधेयक मंजूर केले आहे. एसईबीसी प्रवर्ग तयार करूनही मराठा आरक्षण देण्यात अडचण येऊ शकते, हे लक्षात घेऊन घटनेत नमूद असलेल्या ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याच्या हालचाली महाविकास आघाडी सरकारने चालविल्या आहेत. मात्र, तामिळनाडू सरकारने ६९ टक्क्यांपर्यंत आरक्षण दिले आहे. हे उदाहरण समोर ठेवून एखाद्या समाजाला न्याय देण्याची भूमिका असेल, तर आरक्षणाची टक्केवारी वाढली, तर हा विषय गौण ठरवावा, असे ना. आठवले म्हणाले. घटनेच्या ३४२ अ (३) मध्ये १२७ वी घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. यात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाची स्वत: ची यादी तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारला देण्यात आले आहे. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी न्यायिक आहे. ज्यांची उत्पन्न क्षमता आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात योग्य ते पाऊल उचलणे आवश्यक आहे, अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरल्यास महाविकास आघाडी सरकारची सळो की पळो अशी स्थिती होईल, असा टोलाही ना. आठवले यांनी लगावला.

पत्रपरिषदेला भूपेश थुलकर, सुधाकर वानखडे, रिपाइंचे गटनेता प्रकाश बनसोड, सिनेट सदस्य मनीष गवई, ओमप्रकाश बनसोड आदी उपस्थित होते.

---------------------------

सेनेने भाजपशी जुळवून घ्यावे

महाविकास आघाडी सरकार किती दिवस राहील, हे सांगता येत नाही. मात्र, शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपशी युती करावी. याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोललो आहे. सेनेने तसे पाऊल उचलल्यास भाजप-सेना पुन्हा युती होऊन राज्यात जनतेच्या हिताचे सरकार स्थापन होईल, अन्यथा येत्या काळात शिवसेना संपेल, असा इशारा ना. रामदास आठवले यांनी दिला. जनतेच्या हितासाठी महायुतीचे सरकार आले पाहिजे, असे ना. आठवले म्हणाले.

-----------------

प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपाइंचे ऐक्य नाही

एकट्या रिपाइंच्या भरवशावर आमदार, खासदार निवडून येणे शक्य नाही. त्याकरिता मोठ्या पक्षाशी युती, आघाडी करावी लागेल. रिपाइंच्या ऐक्यासाठी मी तयार आहे. केंद्रीय मंत्रिपदाचा त्याग करतो. मात्र, प्रकाश आंबेडकर हे सोबत आले तरचं रिपाइंचे ऐक्य नाही, असे ना. रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली, पण अपशय आले, हा इतिहास बघता रिपाइंने वाटचाल करावी, असे ना. आठवले म्हणाले.