शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
4
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
5
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
7
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
8
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
9
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
10
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
11
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
12
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
13
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
14
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
15
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
16
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
17
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
18
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
19
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
20
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

Maharashtra Election 2019 ; निवडणुकीची लगबग अन् सोयाबीन सवंगणी एकाचवेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

पाऊस थांबून कडाक्याचे उन्ह पडत असल्याने कामाने वेग घेतला आहे. मजुरांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. पावसाचे वातावरण नसताना मजूर वर्ग सुमारे तीन हजार रुपये एकराने कापणीचा खर्च घेत आहे. आता वातावरण बदललेले पाहून सोयाबीन काढणीचा भाव अजून किती गगनाला भिडणार याची चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे.

ठळक मुद्देप्रचाराला केवळ आठ दिवस : ग्रामीण भागात गर्दी जमविण्यासाठी उमेदवारांची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दर पाच वर्षांत एकदाच येणारा निवडणुकीचा हंगाम अन् वर्षातून एकदाच येणारा सोयाबीन कापणी व काढणीचा हंगाम यावर्षी एकाच वेळी आला आहे. परिणामी राजकारणी व शेतकरी अशा दोघांनाही आपआपली कामे उरकविण्यासाठी माणसांची गर्दी जमविताना कसरत करावी लागत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोेचली आहे. सर्वच उमेदवार आपापल्या मतदारसंघांमध्ये प्रचार व मतदारांच्या भेटीगाठीत व्यस्त आहेत. पण, यावर्षी सोयाबीन काढणी आणि निवडणूक प्रचार एकाच वेळी आल्यामुळे मतदारांच्या भेटीगाठी दुर्मीळ होत आहेत. यामुळे दिवसऐवजी रात्रीच्या वेळी शेतकरी, शेतमजूर महिला-पुरुष मतदारांना गाठताना उमेदवारांच्या नाकीनऊ येत आहेत. दरम्यान, नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले. त्याचबरोबर लहान-मोठे बंधारे तलाव तुडुंब भरले आहेत. सोयाबीन पीक आता कापणी व काढणीला आले आहे. पाऊस थांबून कडाक्याचे उन्ह पडत असल्याने कामाने वेग घेतला आहे. मजुरांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. पावसाचे वातावरण नसताना मजूर वर्ग सुमारे तीन हजार रुपये एकराने कापणीचा खर्च घेत आहे. आता वातावरण बदललेले पाहून सोयाबीन काढणीचा भाव अजून किती गगनाला भिडणार याची चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे. अगोदरच मजुरांची प्रचंड ओठताण होता असताना दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुका नेमक्या याच काळात आल्या आहेत. अशाच आता आठही मतदारसंघात विधानसभेचा प्रचारही जोरात सुरू झाला आहे.प्रचाराचा वेग वाढला असून विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा सुद्धा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या सभेची शोभा वाढण्यासाठी ग्रामीण भागात विशेषता शेतकरी-शेतमजूर या वगार्ला घेऊन जावे लागत आहे. त्यासाठी विविध पक्षातील राजकारणी मंडळी या वर्गावर डोळा ठेवून आहे. कारण जशा सभा लागतील तसे गावागावात गाड्या पाठवून या मंडळींना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र वर्षातून येणारा सोयाबीन काढणीचा काळ शेतकरी शेतमजूर यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. नेमका तोच कालावधी आला आहे. हाता तोंडाशी आलेला एवढी सुगीचा हंगाम वाया गेला तर पूर्ण वर्षभर आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे.दिवसा गावखेड्यांमध्ये शुकशुकाटसध्या पावसाने ओढ दिल्याने उन्हाचा पारा तापत आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. ग्रामीण भागात सध्या सोयाबीन, ज्वारी कापणी व काढणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे बहुतांश गावांतील शेतकरी व शेतमजूर दिवसभर शेतात राबत आहेत. परिणामी गावखेड्यांमध्ये दिवसा कुणीही नागरिक सहसा भेट नाही. परिणामी उमेदवारांचे दिवसा असलेले दौरे निरुपयोगी ठरत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :amravati-acअमरावती