शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Maharashtra Election 2019 ; निवडणुकीची लगबग अन् सोयाबीन सवंगणी एकाचवेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

पाऊस थांबून कडाक्याचे उन्ह पडत असल्याने कामाने वेग घेतला आहे. मजुरांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. पावसाचे वातावरण नसताना मजूर वर्ग सुमारे तीन हजार रुपये एकराने कापणीचा खर्च घेत आहे. आता वातावरण बदललेले पाहून सोयाबीन काढणीचा भाव अजून किती गगनाला भिडणार याची चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे.

ठळक मुद्देप्रचाराला केवळ आठ दिवस : ग्रामीण भागात गर्दी जमविण्यासाठी उमेदवारांची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दर पाच वर्षांत एकदाच येणारा निवडणुकीचा हंगाम अन् वर्षातून एकदाच येणारा सोयाबीन कापणी व काढणीचा हंगाम यावर्षी एकाच वेळी आला आहे. परिणामी राजकारणी व शेतकरी अशा दोघांनाही आपआपली कामे उरकविण्यासाठी माणसांची गर्दी जमविताना कसरत करावी लागत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोेचली आहे. सर्वच उमेदवार आपापल्या मतदारसंघांमध्ये प्रचार व मतदारांच्या भेटीगाठीत व्यस्त आहेत. पण, यावर्षी सोयाबीन काढणी आणि निवडणूक प्रचार एकाच वेळी आल्यामुळे मतदारांच्या भेटीगाठी दुर्मीळ होत आहेत. यामुळे दिवसऐवजी रात्रीच्या वेळी शेतकरी, शेतमजूर महिला-पुरुष मतदारांना गाठताना उमेदवारांच्या नाकीनऊ येत आहेत. दरम्यान, नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले. त्याचबरोबर लहान-मोठे बंधारे तलाव तुडुंब भरले आहेत. सोयाबीन पीक आता कापणी व काढणीला आले आहे. पाऊस थांबून कडाक्याचे उन्ह पडत असल्याने कामाने वेग घेतला आहे. मजुरांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. पावसाचे वातावरण नसताना मजूर वर्ग सुमारे तीन हजार रुपये एकराने कापणीचा खर्च घेत आहे. आता वातावरण बदललेले पाहून सोयाबीन काढणीचा भाव अजून किती गगनाला भिडणार याची चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे. अगोदरच मजुरांची प्रचंड ओठताण होता असताना दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुका नेमक्या याच काळात आल्या आहेत. अशाच आता आठही मतदारसंघात विधानसभेचा प्रचारही जोरात सुरू झाला आहे.प्रचाराचा वेग वाढला असून विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा सुद्धा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या सभेची शोभा वाढण्यासाठी ग्रामीण भागात विशेषता शेतकरी-शेतमजूर या वगार्ला घेऊन जावे लागत आहे. त्यासाठी विविध पक्षातील राजकारणी मंडळी या वर्गावर डोळा ठेवून आहे. कारण जशा सभा लागतील तसे गावागावात गाड्या पाठवून या मंडळींना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र वर्षातून येणारा सोयाबीन काढणीचा काळ शेतकरी शेतमजूर यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. नेमका तोच कालावधी आला आहे. हाता तोंडाशी आलेला एवढी सुगीचा हंगाम वाया गेला तर पूर्ण वर्षभर आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे.दिवसा गावखेड्यांमध्ये शुकशुकाटसध्या पावसाने ओढ दिल्याने उन्हाचा पारा तापत आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. ग्रामीण भागात सध्या सोयाबीन, ज्वारी कापणी व काढणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे बहुतांश गावांतील शेतकरी व शेतमजूर दिवसभर शेतात राबत आहेत. परिणामी गावखेड्यांमध्ये दिवसा कुणीही नागरिक सहसा भेट नाही. परिणामी उमेदवारांचे दिवसा असलेले दौरे निरुपयोगी ठरत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :amravati-acअमरावती