शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

वादळी पावसामुळे शेंदूरजनाघाटसह तालुक्यात संत्र्याचे लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:17 IST

फोटो - वरूड ०७ पी वरूड : मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आलेल्या विजांच्या गडगडाटासह वादळी पावसामुळे शेंदूरजनाघाट परिसरात ...

फोटो - वरूड ०७ पी

वरूड : मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आलेल्या विजांच्या गडगडाटासह वादळी पावसामुळे शेंदूरजनाघाट परिसरात मोठे नुकसान झाले. वादळी पावसाने संत्रा झाडे उखडली गेली, तर आंबिया बहराची फळे जमीनदोस्त झाली. यामुळे संत्रा उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाने तलाठी पाठवून पंचनामे सुरू केले आहेत.

तालुक्यात मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोळा भरण्याच्या वेळी अचानक वादळी पावसाळा सुरुवात झाली. विजांचा तुफान कडकडाट होऊन एक तास मुसळधार पाऊस झाला, तर त्यानंतर पहाटेपर्यंत रिमझिम पाऊस होता. यामध्ये शेंदूरजनाघाटलगत खेडी शिवारातील अरुण मोघे, नेपाल पाटील यांच्या शेतातील संत्रा झाडे उन्मळून पडली, तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा आंबिया बहर गाळून जमीनदोस्त झाला. कपाशी, एरंडी, तूर, सोयाबीन, मिरची आदी पिकांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुस्कान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वाठोडा, देऊतवाडा, गाडेगाव, हातुर्णा, पुसला, सावंगी, आमनेर, धनोडी, तिवसाघाट, टेम्भूरखेडा, सुरळी, बाभूळखेडा, राजुराबाजार, लोणी, जरूड, पेठ मांगरूळी, बेनोडा आदी परिसरात पावसामुळे नुकसान झाले आहे. आंबिया बहराला चांगलाच फटका बसला. महसूल प्रशासनाने पंचनामे करण्याकरिता पथक रवाना केले असल्याचे सांगण्यात आले आहे.