शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

सदाभाऊंच्या निर्देशाला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:49 IST

शेतकºयांच्या सोयाबीनला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी अटी गुंडाळून खरेदी करा; आर्द्रता १२ च्या ऐवजी १४ टक्के असली तरी चालेल, ....

ठळक मुद्देडीएमओला सूचना नाहीत : नाफेडच्या अटी-शर्तीनुसारच होतेय सोयाबीनची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकºयांच्या सोयाबीनला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी अटी गुंडाळून खरेदी करा; आर्द्रता १२ च्या ऐवजी १४ टक्के असली तरी चालेल, असे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी कोल्हापूर तेथे दिले. अध्यादेशाची गरज नाही, मी सांगतोय तोच अध्यादेश, असेहीे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्याद्वारे शासनानेच शेतकºयांना दिलेल्या ग्वाहीला रात्र उलटत नाही तोच जिल्ह्यात मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे शासनाने पुन्हा एकदा शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील बाजार समित्या व नाफेडच्या खरेदी केंद्रांना भेटी देऊन शेतकºयांच्या व्यथा जाणून घेतल्या. नाफेडच्या केंद्रावर अटी व शर्तीमुळेच खरेदी मंदावली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. उत्पादनाच्या तुलनेत सोयाबीनची खरेदी नगण्य प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी यंत्रणेला निर्देश दिलेत. सोयाबीनमध्ये कचरा असल्यास चाळणी मारून ते खरेदी करा, सात-बारावरील नोंदी न पाहता शेतकरी असल्याचा दाखला, आधार कार्ड, बँक खात्याची झेरॉक्स घ्या तसेच आधी चांगल्या प्रतीचे व नंतर तुय्यम प्रतीचे सोयाबीन खरेदी करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. शेतकरीहिताचे धोरण शासनाद्वारा जाहीर झाल्याने सदाभाऊंच्या या निर्देशाला राज्यस्तरावर प्रसिद्धी मिळाली. मात्र, रात्र उलटत नाही तोच जिल्ह्यासह सर्वत्र नेहमीच्याच पद्धतीने खरेदी सुरू झाली. डीएमओंशी संपर्क साधला असता, मुंबईच्या बैठकीत निर्देश मिळाले नाहीत तसेच सद्यस्थितीत शासनाचे कोणतेच निर्देश व अध्यादेश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोयाबीनची आर्द्रता कमी झाल्यावर वजनदेखील कमी होणार असल्याने या घटलेल्या वजनाचा फरक कोण देणार, याविषयीचे कोणतेच दिशानिर्देश नाहीत. त्यामुळे देखील नाफेडच्या केंद्रांवर प्रचलीत पद्धतीनेच खरेदी होत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात दहा केंद्रांवर नाफेडद्वारा ६८३ शेतकºयांचे १४ हजार ३५३ क्विंटल, तर व्यापाºयांनी ५ लाख ६५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. केंद्रावर आॅनलाइन नोंदणीसह अटी व शर्तीचा भडीमार आहे, तर मोजणीचा वेग नसल्याने केंद्रांसह खासगी विक्रीत व्यापाºयांद्वारा शेतकºयांची लूट होत आहे.नाफेड केंद्रावरची शासन खरेदीसोयाबीनचे शासकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून ११ केंद्रांवर ५७६ शेतकºयांकडून १२ हजार ३२४ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यामध्ये अचलपूर केंद्रावर ४४७ क्विंटल, अमरावती १६१, अंजनगाव सुर्जी ६६०, चांदूर बाजार १८६, चांदूर रेल्वे १५६०, धामणगाव रेल्वे ६७२३, मोर्शी ६९८, नांदगाव खंडेश्वर ७८७, दर्यापूर ८४ व तिवसा १०१४ क्विंटलची खरेदी करण्यात आली, तर धारणी व वरूड तालुक्यात खरेदी निरंक आहे.अशी आहे व्यापाºयांची खरेदीयंदाच्या हंगामात व्यापाºयांद्वारा ५ लाख ६५ हजार १८७ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यामध्ये अमरावती बाजार समितीमध्ये ३,६१,२५० क्विंटल, नांदगाव खंडेश्वर १६,८४०, चांदूर रेल्वे १५,९१५, धामणगाव रेल्वे ७९,०४९, चांदूरबाजार २१,०५४, तिवसा ६५, मोर्शी २१,०३३, वरुड ७०४, दर्यापूर १३,९१५, अंजनगाव सुर्जी १४,५२३, अचलपूर १४,१०९ व धारणी तालुक्यात ६,७३० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.जिल्ह्यातील दहाही केंद्रांवर नाफेडचे ग्रेडर सोमवारपासून उपलब्ध झालेले आहेत. सोयाबीन खरेदीसंदर्भात कोणतेही नव्याने आदेश, अध्यादेश नाहीत. नेहमीप्रमाणे खरेदी सुरू आहे.- रमेश पाटीलजिल्हा मार्केटिंग अधिकारी.