शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊंच्या निर्देशाला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:49 IST

शेतकºयांच्या सोयाबीनला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी अटी गुंडाळून खरेदी करा; आर्द्रता १२ च्या ऐवजी १४ टक्के असली तरी चालेल, ....

ठळक मुद्देडीएमओला सूचना नाहीत : नाफेडच्या अटी-शर्तीनुसारच होतेय सोयाबीनची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकºयांच्या सोयाबीनला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी अटी गुंडाळून खरेदी करा; आर्द्रता १२ च्या ऐवजी १४ टक्के असली तरी चालेल, असे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी कोल्हापूर तेथे दिले. अध्यादेशाची गरज नाही, मी सांगतोय तोच अध्यादेश, असेहीे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्याद्वारे शासनानेच शेतकºयांना दिलेल्या ग्वाहीला रात्र उलटत नाही तोच जिल्ह्यात मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे शासनाने पुन्हा एकदा शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील बाजार समित्या व नाफेडच्या खरेदी केंद्रांना भेटी देऊन शेतकºयांच्या व्यथा जाणून घेतल्या. नाफेडच्या केंद्रावर अटी व शर्तीमुळेच खरेदी मंदावली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. उत्पादनाच्या तुलनेत सोयाबीनची खरेदी नगण्य प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी यंत्रणेला निर्देश दिलेत. सोयाबीनमध्ये कचरा असल्यास चाळणी मारून ते खरेदी करा, सात-बारावरील नोंदी न पाहता शेतकरी असल्याचा दाखला, आधार कार्ड, बँक खात्याची झेरॉक्स घ्या तसेच आधी चांगल्या प्रतीचे व नंतर तुय्यम प्रतीचे सोयाबीन खरेदी करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. शेतकरीहिताचे धोरण शासनाद्वारा जाहीर झाल्याने सदाभाऊंच्या या निर्देशाला राज्यस्तरावर प्रसिद्धी मिळाली. मात्र, रात्र उलटत नाही तोच जिल्ह्यासह सर्वत्र नेहमीच्याच पद्धतीने खरेदी सुरू झाली. डीएमओंशी संपर्क साधला असता, मुंबईच्या बैठकीत निर्देश मिळाले नाहीत तसेच सद्यस्थितीत शासनाचे कोणतेच निर्देश व अध्यादेश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोयाबीनची आर्द्रता कमी झाल्यावर वजनदेखील कमी होणार असल्याने या घटलेल्या वजनाचा फरक कोण देणार, याविषयीचे कोणतेच दिशानिर्देश नाहीत. त्यामुळे देखील नाफेडच्या केंद्रांवर प्रचलीत पद्धतीनेच खरेदी होत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात दहा केंद्रांवर नाफेडद्वारा ६८३ शेतकºयांचे १४ हजार ३५३ क्विंटल, तर व्यापाºयांनी ५ लाख ६५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. केंद्रावर आॅनलाइन नोंदणीसह अटी व शर्तीचा भडीमार आहे, तर मोजणीचा वेग नसल्याने केंद्रांसह खासगी विक्रीत व्यापाºयांद्वारा शेतकºयांची लूट होत आहे.नाफेड केंद्रावरची शासन खरेदीसोयाबीनचे शासकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून ११ केंद्रांवर ५७६ शेतकºयांकडून १२ हजार ३२४ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यामध्ये अचलपूर केंद्रावर ४४७ क्विंटल, अमरावती १६१, अंजनगाव सुर्जी ६६०, चांदूर बाजार १८६, चांदूर रेल्वे १५६०, धामणगाव रेल्वे ६७२३, मोर्शी ६९८, नांदगाव खंडेश्वर ७८७, दर्यापूर ८४ व तिवसा १०१४ क्विंटलची खरेदी करण्यात आली, तर धारणी व वरूड तालुक्यात खरेदी निरंक आहे.अशी आहे व्यापाºयांची खरेदीयंदाच्या हंगामात व्यापाºयांद्वारा ५ लाख ६५ हजार १८७ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यामध्ये अमरावती बाजार समितीमध्ये ३,६१,२५० क्विंटल, नांदगाव खंडेश्वर १६,८४०, चांदूर रेल्वे १५,९१५, धामणगाव रेल्वे ७९,०४९, चांदूरबाजार २१,०५४, तिवसा ६५, मोर्शी २१,०३३, वरुड ७०४, दर्यापूर १३,९१५, अंजनगाव सुर्जी १४,५२३, अचलपूर १४,१०९ व धारणी तालुक्यात ६,७३० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.जिल्ह्यातील दहाही केंद्रांवर नाफेडचे ग्रेडर सोमवारपासून उपलब्ध झालेले आहेत. सोयाबीन खरेदीसंदर्भात कोणतेही नव्याने आदेश, अध्यादेश नाहीत. नेहमीप्रमाणे खरेदी सुरू आहे.- रमेश पाटीलजिल्हा मार्केटिंग अधिकारी.