शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लॉकडाऊनमुळे घरकुलाची कामे अर्धवट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर करीत संचारबंदी लागू केली. त्याचा थेट परिणाम घर बांधकामावर ...

अमरावती : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर करीत संचारबंदी लागू केली. त्याचा थेट परिणाम घर बांधकामावर झाला आहे. बांधकाम साहित्य मिळेना, कामगारही घरी थांबून असल्याने घरबांधणीचे काम थांबले आहे. त्यामुळे नवीन घर बांधण्याच्या प्रयत्नात असलेल्या नागरिक काहीसे अडचणीत आले आहेत.

लॉकडाऊन आणि संचारबंदीचा थेट परिणाम घर बांधणीच्या कामात झाला आहे. संचारबंदीनंतर घरबांधकाम करणारे कामगार घरातून बाहेर पडणे थांबले आहे. तसेच वाहतूक बंदी असल्याने वाळू ,सिमेंट आणि बांधकाम साहित्य मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे घरबांधणीचे काम पूर्णत: ठप्प झाले आहे. अनेकांनी मार्च-एप्रिल महिन्यांपूर्वी घर बांधण्याचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला गती दिली होती. घरबांधणीचे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना बांधकाम साहित्य मिळत नाही. कामगार कामावर येत नाहीत. त्यामुळे करायचे काय असे प्रश्नचिन्ह घरमालकांसमोर आहे. जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे महिन्यांमध्ये पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे नवीन घर बांधणारे नागरिक मार्च महिन्याच्या अगोदरच घरबांधणीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. बांधकामाला पाण्याची कमतरता भासू नये हा त्या पाठीमागे उद्देश असतो. मात्र, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने घरबांधणीचे काम थांबविण्याची वेळ आली आहे. संचारबंदीची मुदत आता १५ मेपर्यंत असली तरी यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा घरबांधणीसाठी विविध अडचणींचा सामना काही दिवस करावा लागणार आहे.