शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
4
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
5
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
6
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
7
पति निक जोनाससोबत प्रियंका चोप्राचं लिप-लॉक, समुद्र किनाऱ्यावर दिसला रोमॅन्टिक अंदाज; बघा लेटेस्ट VIDEO
8
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
9
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
10
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
11
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
12
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
13
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
14
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
15
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
16
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
17
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
18
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
19
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
20
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...

जिवंत साप घरात सोडून पैसे उकळण्याचा धंदा

By admin | Updated: April 20, 2015 00:26 IST

जिवंत सापांना लोकांच्या घरात, दुकानात सोडून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे व पैसे उकळण्याचा गोरखधंदा मागील १५ दिवसांपासून परिसरात सुरु आहे.

दोघांवर कारवाई : नागरिकांमध्ये भीतीचे वातारण, वनविभागाने घेतली दखलरोहित प्रसाद तिवारी मोर्शीजिवंत सापांना लोकांच्या घरात, दुकानात सोडून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे व पैसे उकळण्याचा गोरखधंदा मागील १५ दिवसांपासून परिसरात सुरु आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी असा खेळ करणाऱ्या दोघांवर रविवारी कारवाई केली आहे. बाहेरगावची काही मंडळी जिवंत साप टोपलीत ठेवून लोकांच्या घरी, दुकानात पोहोचत असत. टोपलीतील साप हातात धरुन ते लोकांकडून पैशाची, अन्नधान्याची मागणी करीत होते. त्यांना पैसे, अन्नधान्य दिले नाही तर ते साप दुकानात, घरात सोडून देत असत. या प्रकारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भीतीपोटी नागरिकांनी संबंधितांना पैसे व धान्य देण्याचा प्रकार येथे वाढला आहे. त्यामुळे या लोकांचा धंदा जोरात सुरु होता. काही जागरुक नागरिकांनी सर्पमित्रांना, पोलिसांना बोलाविण्याची धमकी दिल्यावर ही मंडळी तेथून पोबारा करीत असत; तथापि त्यांचा हा भीतीयुक्त धंदा सुरुच होता. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये, दुकानदारांमध्ये दहशत निर्माण झाली होती.शनिवार १८ एप्रिल रोजी अशाचप्रकारे ही मंडळी जयस्तंभ चौकात दहशत निर्माण करुन धंदा करीत असताना एका नागरिकाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन हा प्रकार बंद पाडण्याची विनंती केली. मोर्शीचे वर्तुळ अधिकारी राजेंद्र राऊत, विशेष वर्तुळ अधिकारी अमोल चौधरी, वनरक्षक एस. व्ही. डहाके आणि वनमजूर मनोहर वणवे यांनी दूरभाष केंद्र परिसरात दोघांना त्यांच्याकडे असलेल्या साप, आणि टोपलीसह पकडले; तथापि वन कार्यालयात या आरोपींना आणत असताना त्यांनी पोबारा केला. वन विभागाच्या कार्यालयात सापासह टोपली आणून जप्त करण्यात आली. येथील सर्पमित्र असलम शहा यांना बोलावून पकडलेल्या सापाची शहानिशा करण्यात आली. ‘दिवड’ नावाचा हा पाण्यात राहणारा बिनविषारी साप असल्याचे त्याने हाता-पायाला चावा घेतल्यास तो सोडत नसल्याचे आणि ओढून काढल्यास खोलवर जखम होत असल्याची माहिती असलम शहा यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. हा साप अप्पर वर्धा धरण परिसरातील पाण्यात सोडण्यात येणार असल्याचे वन कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. साप पकडून त्याचा खेळ मांडण्याचा प्रकार हा वन वन्य जीव संरक्षण अधिनियम खाली गुन्हा ठरतो. मात्र वृत्त लिहिस्तोवर कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.