परतवाडा : जागतिक व्याघ्रदिनी परतवाड्यात "शेरनी" हा चित्रपट व्याघ्र प्रकल्पाकडून दाखविण्यात आला.
शेरनी हा चित्रपट टी-वन वाघीण (अवनी) च्या मृत्यू प्रकरणावर बनविला आहे. अवनीला यात वन्यजीव विभागाकडून ठार करण्यात आले होते. अवघ्या दोन वर्षात १३ माणसांना खाल्ल्याचा अवनीवर आरोप लावण्या आला होता. याचा शेवट तिला ठार करून झाला. यानंतर तिच्या छाव्यांना(बछड्यांना) बेशुद्ध करून रेस्क्यू सेंटरला पाठविले गेले.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत या सत्य घटनेवर आधारित शेरनी हा चित्रपट आहे. यात मानव-वन्यजीव संघर्ष दाखविण्यात आला. मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत मेळघाटमध्ये वाघांविषयी काही प्रमाणात असेच समज-गैरसमज बघायला मिळतात. यात पुनर्वसनाची समस्या मोठी आहे. वाघ सुरक्षित राहावा व वाघाला संरक्षण मिळावे, याकरिता मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अनेक परिणामकारक उपायोजना केल्या जात आहेत. मेळघाटमध्ये गुराढोरांच्या चराईचा प्रश्न नेहमीच उद्भवतो यात वन्यजीव अधिकारी व पशुपालकांमध्ये नेहमीच संघर्ष बघायला मिळतो.
याला अनुषंगून शेरनी या चित्रपटात एक डायलॉग पुढे येतो, "लोग अपने जानवरो को चराने कहा ले जायेंगे सर, जहा चाहे वाहा ले जाये," हमने ठेका थोडी ले रखा है. हमे तो टायगर की चिंता करनी चाहिये.
"आपके जंगल मे टायगर हमारे लिए खतरा बन चुका है, कोई हल है आपके पास, जब मुसीबत आपडी तो एक लेडी ऑफिसर को भेजा है"
शेरनी या चित्रपटात प्रमुख भूमिका एक्ट्रेस विद्या बालन ने निभावली आहे. ती एक आयएफएस ऑफिसरच्या भूमिकेत आहे. ती वाघिणीला संरक्षण व संवर्धन देण्याच्या भूमिकेत वावरते.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे एक नजर टाकली असता, या व्याघ्र प्रकल्पांतर्गत क्षेत्रसंचालक व मुख्य वनसंरक्षक म्हणून जयोती बॅनर्जी, तर मेळघाट वन्यजीव विभागाच्या डीएफओ म्हणून पीयुषा जगताप या आयएफएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यांच्यावरही मेळघाटातील वाघांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी आहे. त्याही जबाबदारी प्रभावीपणे सांभाळत आहेत. जागतिक व्याघ्र दिन शेरनी चित्रपट बघितल्यानंतर अनेकांच्या पुढे व्याघ्र प्रकल्प अंतर्गत कार्यरत महिला अधिकाऱ्यांच्या प्रशंसनीय भूमिका येतात.
दि.29/7/21 फोटो