शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

३० आॅगस्टपर्यंत हलका, मध्यम पाऊस पडणार

By admin | Updated: August 28, 2016 00:02 IST

पावसाने अतिवृष्टीचे संकट निर्माण झाले होते. मात्र, ७ आॅगस्टनंतर दांडी मारल्यामुळे असह्य उकाडा निर्माण झाला आहे.

अंदाज : २१ दिवसांपासून पावसाची दडीअमरावती : पावसाने अतिवृष्टीचे संकट निर्माण झाले होते. मात्र, ७ आॅगस्टनंतर दांडी मारल्यामुळे असह्य उकाडा निर्माण झाला आहे. आता पुन्हा हलका व मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते, आंध्रप्रदेश किनारपट्टीवर व पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र आणि ८ किमी. उंचीवर चक्राकार वारे आहे. तसेच बंगालच्या उपसागरावर ९०० मिटर उंचीवर चक्राकार वारे आहेत. दक्षिण राजस्थानवर आणि मध्यप्रदेशावरही चक्राकार वारे असून कर्नाटक किनार पट्टीवर ते केरळ कमजोर द्रोणीय स्थिती आहे. कमी दाबाचे क्षेत्र हे दक्षिणेकडून पश्चिमेकडे सरकत आहे. या स्थितीमुळे २८ आॅगस्टला बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम, २९ आणि ३० आॅगस्टला बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य भारतात २ सप्टेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुन्हा पावसाची वातारवण तयार होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. हवामान तज्ज्ञांने शनिवारी बऱ्याच ठिकाणी हलका किंवा मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे. (प्रतिनिधी)हवेतील आर्द्रतेमुळे उकाळापाऊस ओसरल्यानंतर उन्हाचा तडाखा सुरु झाला. त्यातच वातावरण हवेचे प्रमाण कमी झाले. तापत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले. त्यामुळे हवेत आर्द्रता वाढली आहे. या आर्द्रतेमुळे गर्मी वाढल्याने उकाळा निर्माण झाला आहे. हा उकाळा आता असह्य होऊ लागला असून अनेकांनी तर थंड हवेकरिता कुलर सुध्दा काढल्याचे चित्र शहरात आढळून आले आहे.