शहरं
Join us  
Trending Stories
1
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
2
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
3
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
4
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
5
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
6
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
7
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
8
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
9
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
10
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
11
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
12
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
13
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
14
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
15
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
16
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
17
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
18
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
19
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
20
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का

‘स्ट्रॉबेरी’ने उंचावले शेतकऱ्यांचे जीवनमान

By admin | Updated: March 5, 2016 00:15 IST

मेळघाटमध्ये स्ट्रॉबेरीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविले आहे. ५० शेतकऱ्यांनी प्रत्येकी १० गुंठे शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्यामध्ये ५०० लोकांना रोजगार मिळाला.

मेळघाटात हरितक्रांती : ५०० लोकांना मिळाला रोजगार, रोज लाखोंची उलाढालमनीष कहाते अमरावतीमेळघाटमध्ये स्ट्रॉबेरीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविले आहे. ५० शेतकऱ्यांनी प्रत्येकी १० गुंठे शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्यामध्ये ५०० लोकांना रोजगार मिळाला. रोज लाखो रूपयांची उलाढाल याद्वारे होत आहे. देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये चिखलदऱ्याच्या स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आदिवासी शेतकरी सुखावला आहे. येथील शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या पुढाकाराने मेळघाटमधील शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यामध्ये ५० शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यास इच्छुक झाले. चिखलदरा तालुक्यातील मोथा येथील सर्वाधिक ३४ शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. तेथील शंकर किसन निखाडे यांनी स्ट्रॉबेरीची लागवड आॅक्टोबर २०१५ मध्ये १० गुंठे शेतामध्ये केली. स्ट्रॉबेरी लागवडीआधी ते कोरडवाहू पिके घेत होते. त्यामध्ये त्यांना कधी १५ हजार रुपयांच्यावर उत्पन्न झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु सहा महिन्यांच्या स्ट्रॉबेरीच्या लागवडीने आम्हाला लाखो रूपये कसे दिसतात ते पहायला मिळाले. आजपर्यंत ७० हजार रुपयांची स्ट्रॉबेरी विकली असून महिनाभरात तेवढीच निघणार असल्याचे त्यांनी सांगितले. आलाडोह, शहापूर, टेटू, आमझरी, खटकाली, सलोना, लोणादरा आदी ठिकाणी शेतात स्ट्रॉबेरीची लागवड झाली. आलाडोह येथील नारायण खडके यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून आतापर्यंत एक लाख रुपयांची स्ट्रॉबेरी विकल्याचे त्यांनी सांगितले. चिखलदरा शहरात व आजूबाजूच्या गावांत स्ट्रॉबेरी स्टॉल विक्रीकरिता तेथील लोकांनी लावले. त्यामध्ये सुमारे ५०० लोकांना रोजगार मिळाला आहे. काही शेतकऱ्यांनी शेतातच वजनकाटे लावून स्ट्रॉबेरीची विक्री सुरू केली आहे. रोजचा खर्च शेतकऱ्यांचा स्ट्रॉबेरीवर भागत असल्याचे गणेश शेळके स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्याने सांगितले. परिसरात शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी अमरावती, परतवाडा, इंदौर, नागपूर, हैद्राबाद, मुंबई येथे विक्रीला नेल्याचे पान्डू शनवारे यांनी सांगितले. आम्ही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी कधी पाहली नाही. गहू, सोयाबीन, तूर, कापूस हेच आमचे कोरडवाहू पिके. परंतु यामधून खर्चाच्या मानाने उत्पन्न अतिशय कमी मिळत होते. परंतु उद्यानविद्या महाविद्यालयाच्या चमूने आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनातला अंधार कायमचा दूर केल्याचे साधुराम पाटील यांनी सांगितले.