शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

‘स्ट्रॉबेरी’ने उंचावले शेतकऱ्यांचे जीवनमान

By admin | Updated: March 5, 2016 00:15 IST

मेळघाटमध्ये स्ट्रॉबेरीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविले आहे. ५० शेतकऱ्यांनी प्रत्येकी १० गुंठे शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्यामध्ये ५०० लोकांना रोजगार मिळाला.

मेळघाटात हरितक्रांती : ५०० लोकांना मिळाला रोजगार, रोज लाखोंची उलाढालमनीष कहाते अमरावतीमेळघाटमध्ये स्ट्रॉबेरीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविले आहे. ५० शेतकऱ्यांनी प्रत्येकी १० गुंठे शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्यामध्ये ५०० लोकांना रोजगार मिळाला. रोज लाखो रूपयांची उलाढाल याद्वारे होत आहे. देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये चिखलदऱ्याच्या स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आदिवासी शेतकरी सुखावला आहे. येथील शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या पुढाकाराने मेळघाटमधील शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यामध्ये ५० शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यास इच्छुक झाले. चिखलदरा तालुक्यातील मोथा येथील सर्वाधिक ३४ शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. तेथील शंकर किसन निखाडे यांनी स्ट्रॉबेरीची लागवड आॅक्टोबर २०१५ मध्ये १० गुंठे शेतामध्ये केली. स्ट्रॉबेरी लागवडीआधी ते कोरडवाहू पिके घेत होते. त्यामध्ये त्यांना कधी १५ हजार रुपयांच्यावर उत्पन्न झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु सहा महिन्यांच्या स्ट्रॉबेरीच्या लागवडीने आम्हाला लाखो रूपये कसे दिसतात ते पहायला मिळाले. आजपर्यंत ७० हजार रुपयांची स्ट्रॉबेरी विकली असून महिनाभरात तेवढीच निघणार असल्याचे त्यांनी सांगितले. आलाडोह, शहापूर, टेटू, आमझरी, खटकाली, सलोना, लोणादरा आदी ठिकाणी शेतात स्ट्रॉबेरीची लागवड झाली. आलाडोह येथील नारायण खडके यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून आतापर्यंत एक लाख रुपयांची स्ट्रॉबेरी विकल्याचे त्यांनी सांगितले. चिखलदरा शहरात व आजूबाजूच्या गावांत स्ट्रॉबेरी स्टॉल विक्रीकरिता तेथील लोकांनी लावले. त्यामध्ये सुमारे ५०० लोकांना रोजगार मिळाला आहे. काही शेतकऱ्यांनी शेतातच वजनकाटे लावून स्ट्रॉबेरीची विक्री सुरू केली आहे. रोजचा खर्च शेतकऱ्यांचा स्ट्रॉबेरीवर भागत असल्याचे गणेश शेळके स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्याने सांगितले. परिसरात शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी अमरावती, परतवाडा, इंदौर, नागपूर, हैद्राबाद, मुंबई येथे विक्रीला नेल्याचे पान्डू शनवारे यांनी सांगितले. आम्ही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी कधी पाहली नाही. गहू, सोयाबीन, तूर, कापूस हेच आमचे कोरडवाहू पिके. परंतु यामधून खर्चाच्या मानाने उत्पन्न अतिशय कमी मिळत होते. परंतु उद्यानविद्या महाविद्यालयाच्या चमूने आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनातला अंधार कायमचा दूर केल्याचे साधुराम पाटील यांनी सांगितले.