शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

चार प्रकल्पांनी गाठली धोक्याची पातळी

By admin | Updated: July 28, 2014 23:16 IST

विभागातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या उर्ध्व वर्धा धरणाचे क्षेत्रात दि. २२, २३ व २७ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडला तसेच प्रकल्पात मध्यप्रदेशातून ‘येवा’ वाढल्याने जलाशयातील साठ्याने धोक्याची

अमरावती : विभागातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या उर्ध्व वर्धा धरणाचे क्षेत्रात दि. २२, २३ व २७ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडला तसेच प्रकल्पात मध्यप्रदेशातून ‘येवा’ वाढल्याने जलाशयातील साठ्याने धोक्याची पातळी गाठली. त्यामुळे रविवारपासून धरणाचे १३ ही दरवाजे उघडण्यात आले. तसेच चांदूरबाजार तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पूर्णा, चंद्रभागा व सपन प्रकल्पदेखील ‘ओव्हरफ्लो’ झाले आहेत.या धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे. झालेली अतिवृष्टी, सोडण्यात आलेले धरणाचे पाणी यामुळे जिल्ह्यातील ३० ते ४० गावात पुराचे पाणी घुसल्याने ४ हजारावर नागरिकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात १ मोठा उर्ध्व वर्धा, ४ मध्यम शहानूर, चंद्रभागा, पूर्णा व सपन तसेच ११८ मध्यम प्रकल्प आहेत. उर्ध्व वर्धा धरणाचे पाण्यासाठी प्रमुख स्त्रोत मध्यप्रदेशातून येतो. २२, २३ व २७ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडल्याने धरणाने ३४२.०४ ही महत्तम पाण्याची पातळी गाठली. परिणामी रविवार २७ जुलै रोजी दुपारी १२.३० मिनिटांनी धरणाचे तेराही दरवाजे उघडण्यात आले. यामुळे वर्धा नदीला पूर येऊन धामणगाव तालुक्यामधील बगाजी सागर धरण धोक्याच्या पातळीवर आले. चांदूरबाजार तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पूर्णा व चंद्रभागा धरणाने धोक्याची पातळी गाठली. यामुळे ४ हजारावर लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.