शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

चला... चिमण्यांना वाचवू या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:49 IST

मोबाइल अन् संगणक युगात पहाटे चिवचिवाटाने जागे करणाऱ्या चिमण्या कालबाह्य झाल्यागत आहे.

इंदल चव्हाण ।आॅनलाईन लोकमतअमरावती : मोबाइल अन् संगणक युगात पहाटे चिवचिवाटाने जागे करणाऱ्या चिमण्या कालबाह्य झाल्यागत आहे. चहुबाजूला काँक्रीटीकरण झाल्यामुळे चिमण्यांचे वास्तव्य संपुष्टात आले असले तरी टीटीनगर मात्र त्याला अपवाद ठरले आहे. आजही येथील नागरिकांची पहाट पक्ष्यांच्या चिवचिवाटाने उजाडते. पक्ष्यांना जगण्याच्या दृष्टिकोनातून वातावरणाची निर्मिती करायची आहे, ज्यामुळे पक्ष्यांची संख्या वाढीस मदत होणार आहे.स्थानिक अभियंता कॉलनी परिसरातील टीटीनगरात पक्षिमित्र वैभव ठाकरे हे पक्ष्यांना रोज खाद्य व पाणी पुरविण्याचे कार्य करतात. येथे पक्ष्यांना पोषक वातावरण निर्मित होत असल्याने त्यांच्या घरासमोरील कडुनिंब, काटेरी झाडांवर व तारेवर पक्ष्यांचे थवे दिसून येतात. त्यांच्या प्रेरणेने परिसरातील नागरिकांनाही पक्ष्यांबद्दल आकर्षण वाढत असल्याने ठिकठिकाणी पाण्याची भांडी, घरटी ठेवली जातात. या परिसरात चिमण्यांचा वावर दिसून येतो.पर्यावरण संतुलनात पक्ष्यांची भूमिका महत्त्वाचीमानवाच्या स्वार्थापोटी जंगलाचा ऱ्हास होऊन पर्यावरणात बदल झाले आहे. सुप्रसिद्ध भौतिकशास्त्राचे तज्ज्ञ आइनस्टाइन यांनी संशोधनात मांडल्याप्रमाणे, पाणी आहे म्हणून झाडं नव्हेत, तर झाडं आहेत म्हणून पाणी आहे. पक्ष्यांनाही वृक्षांची गरज असते, तर पर्यावरण संतुलानासाठी पक्षी संवर्धन आवश्यक आहे. त्यामुळे यातील साम्य अनिवार्य आहे.सर्वांनी दाखवावी भूतदयाप्रत्येक सूक्ष्म जीवही अन्नसाखळीतील घटक असल्याने त्यांचे अस्तीत्व अबाधित राखण्याचे कार्य माणसांना करावयाचे आहे. त्यामुळे सर्वांनी भूतदया दाखवित चिमण्यांचा बचाव करणे आवश्यक आहे.प्रत्येक नागरिकाने घरोघरी दाणा-पाण्याची सुविधा केल्यास पक्ष्यांना या दिवसांत आधार मिळेल. पक्षी वाचविणे काळाची गरज समजून प्रत्येकांनी या कार्यात सहभागी होणे गरजेचे आहे.- वैभव ठाकरे, पक्षिमित्र