शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

चला... चिमण्यांना वाचवू या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:49 IST

मोबाइल अन् संगणक युगात पहाटे चिवचिवाटाने जागे करणाऱ्या चिमण्या कालबाह्य झाल्यागत आहे.

इंदल चव्हाण ।आॅनलाईन लोकमतअमरावती : मोबाइल अन् संगणक युगात पहाटे चिवचिवाटाने जागे करणाऱ्या चिमण्या कालबाह्य झाल्यागत आहे. चहुबाजूला काँक्रीटीकरण झाल्यामुळे चिमण्यांचे वास्तव्य संपुष्टात आले असले तरी टीटीनगर मात्र त्याला अपवाद ठरले आहे. आजही येथील नागरिकांची पहाट पक्ष्यांच्या चिवचिवाटाने उजाडते. पक्ष्यांना जगण्याच्या दृष्टिकोनातून वातावरणाची निर्मिती करायची आहे, ज्यामुळे पक्ष्यांची संख्या वाढीस मदत होणार आहे.स्थानिक अभियंता कॉलनी परिसरातील टीटीनगरात पक्षिमित्र वैभव ठाकरे हे पक्ष्यांना रोज खाद्य व पाणी पुरविण्याचे कार्य करतात. येथे पक्ष्यांना पोषक वातावरण निर्मित होत असल्याने त्यांच्या घरासमोरील कडुनिंब, काटेरी झाडांवर व तारेवर पक्ष्यांचे थवे दिसून येतात. त्यांच्या प्रेरणेने परिसरातील नागरिकांनाही पक्ष्यांबद्दल आकर्षण वाढत असल्याने ठिकठिकाणी पाण्याची भांडी, घरटी ठेवली जातात. या परिसरात चिमण्यांचा वावर दिसून येतो.पर्यावरण संतुलनात पक्ष्यांची भूमिका महत्त्वाचीमानवाच्या स्वार्थापोटी जंगलाचा ऱ्हास होऊन पर्यावरणात बदल झाले आहे. सुप्रसिद्ध भौतिकशास्त्राचे तज्ज्ञ आइनस्टाइन यांनी संशोधनात मांडल्याप्रमाणे, पाणी आहे म्हणून झाडं नव्हेत, तर झाडं आहेत म्हणून पाणी आहे. पक्ष्यांनाही वृक्षांची गरज असते, तर पर्यावरण संतुलानासाठी पक्षी संवर्धन आवश्यक आहे. त्यामुळे यातील साम्य अनिवार्य आहे.सर्वांनी दाखवावी भूतदयाप्रत्येक सूक्ष्म जीवही अन्नसाखळीतील घटक असल्याने त्यांचे अस्तीत्व अबाधित राखण्याचे कार्य माणसांना करावयाचे आहे. त्यामुळे सर्वांनी भूतदया दाखवित चिमण्यांचा बचाव करणे आवश्यक आहे.प्रत्येक नागरिकाने घरोघरी दाणा-पाण्याची सुविधा केल्यास पक्ष्यांना या दिवसांत आधार मिळेल. पक्षी वाचविणे काळाची गरज समजून प्रत्येकांनी या कार्यात सहभागी होणे गरजेचे आहे.- वैभव ठाकरे, पक्षिमित्र