शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

भातात अळ्या, पाण्यात बेडूक, करपलेली पोळी!

By admin | Updated: December 23, 2014 22:56 IST

तालुक्यातील डोमा शासकीय शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भातात अळ्या, जळलेली पोळी, पिण्याच्या पाण्यात बेडूक, उघड्यावर अर्धपोट जेवण अन् फाटलेले ब्लँकेट अशा

डोमा आश्रम शाळेतील प्रकारनरेंद्र जावरे - चिखलदरातालुक्यातील डोमा शासकीय शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भातात अळ्या, जळलेली पोळी, पिण्याच्या पाण्यात बेडूक, उघड्यावर अर्धपोट जेवण अन् फाटलेले ब्लँकेट अशा अनेक समस्यांनी सातशेपेक्षा अधीक मुला-मुलींना वेठीस धरले असल्याचे उघडकीस आले आहे. राज्याच्या आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय आश्रम शाळांची बकाल अवस्था आहे. सर्व सोयीसुविधा पुरविण्यात येत आहे. आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे सत्य डोमा येथील आश्रम शाळेत पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग असून सातशेच्या जवळपास आदिवासी मुल-मुली निवासी आहेत. शनिवारी नेहमीप्रमाणे मुलांना सकाळी १०.३० वाजता जेवण देण्यात आले. जेवणात वांग्याची भाजी, दाळ, भात, जळालेली पोळी नेहमीप्रमाणे होती. वांग्याच्या भाजीत अळ्या निघाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. आश्रम शाळेला होणारा धान्य व भाजीपाल निकृष्ट व सडक्या दर्जाचा असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात लखन मुंगीलाल तोटे, देवीदास राजाराम बेठेकर, दिलीप मुन्ना कास्देकर, अंकुश रामोधिकार, रामूू धिकार, गजानन बेठेकर, लक्ष्मण कास्देकर, शारदा दहिकर, भागू सावलकर, महिमा मावस्कर यांनी तक्रार केली आहे.अर्धपोटी जेवणआश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्या जाण्यासोबत एक पोळी व वरण, भात असे अर्धपोटे जेवण दिल्या जात असल्याच्या कारणावरुन गत महिन्यात या विद्यार्थ्यांनी पायदळ धारणी येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडे कुच केली होती. सदर प्रकार माहिती होताच विद्यार्थ्यांना सेमाडोह येथे थांबवून प्रकल्प कार्यालयातर्फे त्यांची समजूत काढून आश्वासन देण्यात आले होते. परंतु त्यानंतरही परिस्थिती जैसे थेच आहे.अंधाराचे साम्राज्यसातशेच्या जवळपास पहिली ते बारावी पर्यंतचे मुल-मुली निवासी असताना एका खोलीत दीडशेवर विद्यार्थी झोपतात. रात्री विद्युत पुरवठा खंडित झाल्यास त्यांना नेहमी अंधारातच रात्र काढावी लागते. जनरेटर, सौर उर्जेचे दिवे काही बेपत्ता वजा बंद अवस्थेत असल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अंधारात सर्प, विंचू पासून भिती असताना त्यावर दुर्लक्ष करण्यात आले. जारीदा आश्रम शाळेतील अस्वलाचा हमला विद्युत पुरवठा बंद असल्यामुळेच झाला होता हे विशेष.