शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

‘लेकीं’चाच वरचष्मा!

By admin | Updated: June 17, 2014 23:57 IST

बारावीच्या पाठोपाठ घोषित झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालांमध्येही सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली. निकालाची एकूण टक्केवारी लक्षात घेता मुलांच्या तुलनेत मुलींना मिळालेले यश लक्षणीय आहे.

अमरावती : बारावीच्या पाठोपाठ घोषित झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालांमध्येही सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली. निकालाची एकूण टक्केवारी लक्षात घेता मुलांच्या तुलनेत मुलींना मिळालेले यश लक्षणीय आहे. जिल्ह्यातील उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ८६.५१ इतकी आहे. गतवर्षी सुध्दा ८४.९० टक्क्यांसह मुलीच आघाडीवर होत्या, हे विशेष.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वीचा निकाल मंगळवार १७ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला. यामध्ये यंदाही जिल्ह्यात मुलींनीच शिखर गाठले. परीक्षेमध्ये ७८.७३ टक्के मुले तर ८६.५१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासूनच्या इयत्ता दहावी व बारावीच्या निकालांकडे नजर टाकली असता मुलींनी मिळविलेले देदिप्यमान यश डोळ्यांत भरण्यासारखे आहे. शैक्षणिक क्षेत्रात मुलींचे वर्चस्व सुखावह आहे. गेल्यावर्षी अमरावती जिल्ह्याचा निकाल ७६.२३ टक्के निकाल लागला होता. त्यावेळी विभागात १३ लाख २० हजार विद्यार्थी नियमीत व पुनर्परिक्षार्थींनी परीक्षा दिली होती. यामध्ये ७३.४० टक्के मुले तर ७९.७५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. या आकडेवारीहून मागील वर्षी दहावीच्या परीक्षेत मुलीनीच बाजी मारली होती. यावर्षी सुध्दा मुलींनीच दहावीचा गड सर केला आहे. अमरावती जिल्ह्यातील ६५६ शाळांमधून ४३ हजार ४७३ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली होती. त्यामध्ये ३५ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये २२ हजार २०१ मुले तर २१ हजार २७२ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.