शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

एलबीटी वसुलीत खोडा

By admin | Updated: January 31, 2015 01:03 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शासनाने येत्या १ एप्रिलपासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) ऐवजी जीएसटी ही नवी कर प्रणाली महापालिकांत सुरु होणार,..

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शासनाने येत्या १ एप्रिलपासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) ऐवजी जीएसटी ही नवी कर प्रणाली महापालिकांत सुरु होणार, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे एलबीटी जाणार हे आता निश्चित झाल्याने शहरातील व्यापाऱ्यांनी एलबीटीचा भरणा थांबविला आहे. दुसरीकडे एलबीटी कसे वसूल करावे, हा प्रश्न महापालिका प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. जानेवारी महिन्यात एलबीटीचे उत्पन्न ३ कोटी ६४ लाख रुपये वसूल झाल्याची माहिती आहे.महापालिकेचा आर्थिक डोलारा हा एलबीटीवर अवलंबून असताना काही महिन्यांपूर्वी व्यापाऱ्यांनी एलबीटीला कडाडून विरोध केला. एलबीटी हटविण्याची मागणी करीत लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारादेखील व्यापाऱ्यांनी दिला होता. मात्र काँग्रेस शासन एलबीटीच्या निर्णयावर कायम राहिले तर भाजपचे शासन आल्यास एलबीटी हटवू, असे ठोस आश्वासन दिले होते. त्यानुसार भाजपने सत्तास्थानी आल्यानंतर राज्यातून एलबीटी हटविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १ एप्रिलपासून केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. नवीन कर प्रणाली लागू होण्यास दोन महिन्यांचा कालावधी असताना शहरातील बहुतांश व्यावसायिकांनी एलबीटीचा भरणा बंद केला आहे. परिणामी दरमहा साडेसहा कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट असताना केवळ हे चार कोटींवर पोहचले आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न घटले आहे. याचा मोठा भार महापालिका तिजोरीवर पडला आहे. महापालिका आर्थिक संकटातून वाटचाल करीत असताना एलबीटीचे उत्पन्न माघारल्याने आयुक्त हैराण झाले आहेत. कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, कंत्राटदार व पुरवठादारांची देणी कशी अदा करावी, हा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. मागील डिसेंबर महिन्यात ५ कोटी ७१ लाख रुपयांचे उत्पन्न एलबीटीतून मिळाले होते, हे विशेष. (प्रतिनिधी )