शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

कायदा रुग्णसेवेपेक्षा मोठा नाही

By admin | Updated: October 8, 2016 00:19 IST

रुग्णसेवा ईश्वर सेवा सांगणारे किती डॉक्टर रुग्णांसोबत संवाद साधतात आणि किती अरेरावी करतात,..

बच्चू कडू : उपजिल्हा रुग्णालयात स्पंदन मेळावापरतवाडा : रुग्णसेवा ईश्वर सेवा सांगणारे किती डॉक्टर रुग्णांसोबत संवाद साधतात आणि किती अरेरावी करतात, याचा प्रत्यय अनेकांना आपापल्या जीवनात येतो. आपण आतापर्यंत जवळपास ६५ हजार रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करवून घेतल्यात. त्यासाठी पहिल्यांदा विना तिकीट मुंबई प्रवास करावा लागला, मानवतेसाठी कायदा तोडून रुग्णसेवेचे कार्य करावे लागले, असे प्रतिपादन आ. बच्चू कडू यांनी केले. अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित स्पंदन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक मो. जाकीर, पं.स.सभापती गजानन भोरे, विकास अधिकारी सावरकर, पी.वा. शहाणे, हर्षवर्धन हरले, अंकुश जवंजाळ, सा.बां. विभागाचे अभियंता प्रमोद भिलपवार, गोपाल बकालेंसह मान्यवर उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालयात शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदय शस्त्रक्रिया यशस्वी बालकांचा स्पंदन मेळावा ४ आॅक्टोबर रोजी झाला. तालुक्यातील सर्वच शाळेतील ६७ विद्यार्थ्यांची हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यासाठी पालकांना कुठलाच खर्च करावा लागत नाही. त्या विद्याथर्यांच्या पुढील भविष्यासाठी या स्पंदन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शून्य खर्चातून करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियांमध्ये तालुक्यातील सर्वच शाळांच्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती. (तालुका प्रतिनिधी)हिवाळी अधिवेशनात मुदतवाढराष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत केंद्रशासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना संपत आल्या आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनात आपण त्या योजनांची मुदतवाढ करण्यासाठी मागणी करणार असल्याचेसुद्धा आ. बच्चू कडू यांनी उपसचिवांना सांगितले. कुष्ठरोगी हृदयरुग्णांना औषधी शासनाच्या ढीगभर योजना आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्या पोहोचविल्याच जात नाहीत. योजना कागदावर तयार होऊन तेथेच थांबविण्याचे सत्य आहे, तर काही योजना तयारच का केल्या आणि त्यांचा लाभ तरी कुणाला मिळणार, असा संतापजनक प्रश्न निर्माण होत असल्याचे आ. बच्चू कडू यांनी सांगीत कुष्ठरोग व हृदयरोग रुग्णांना लवकरच सहाशे रुपये प्रतिमहिना औषधी खर्च लागू करून देऊ. शासन निर्णय फार अडगळीचा आहे. १८ वर्षांवरील रुग्ण व बापलेक कमावते नको असा तो निर्णय राज्यात फक्त अचलपूर तालुक्यात मानवतेचा दृष्टिकोन पुढे ठेवून आपण शिथिल केल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले.६५ हजार मोफत शस्त्रक्रिया१९९९ पासून आपण रुग्णांना अविरतपणे मुंबई येथील जे.जे., अंबानी. हिंदुजासारख्या अत्यंत महागड्या दवाखान्यात शस्त्रक्रियेसाठी नेले. आजपर्यंत किमान ६५ हजारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. किमान २ लक्ष रुपयांच्या वर खर्च संबंधित रुग्णांसाठी करावा लागला तर त्यांच्याच बेलोरा गावातील जामोदकर यांच्या शस्त्रक्रियेसाठी तब्बल २१ लक्ष रुपये खर्च करण्यात आला होता. ती शस्त्रक्रियासुद्धा मोफत करण्यात आली होती. पहिल्यांदा विनातिकिट प्रवास करून शस्त्रक्रिया केल्याचा अनुभव आयोजित मेळाव्यात आ.बच्चू कडू यांनी उपस्थितांसमोर कथन केला.