शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

वृक्षदिंडीने वनमहोत्सवाचा शुभारंभ; हरितक्रांतीची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 23:58 IST

राज्यात १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

अमरावती : राज्यात १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा शुभारंभ विद्यापीठ परिसरात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते वृक्षारोपणाने शुक्रवारी झाला. यावेळी काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीमध्ये पालकमंत्री स्वत: सहभागी झाले होेते. यावेळी खा. आनंदराव अडसूळ, आ.बच्चू कडू, जिल्हाधिकारी किरण गित्ते, कुलगुरू मुरलीधर चांदेकर, कुलसचिव अजय देशमुख, माजी कुलगुरू व्ही.एस. सपकाळ, प्र-कुलगुरु जयकिरण तिडके, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, उपवनसंरक्षक नीनू सोमराज, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक प्रदीप मसराम, जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत, भाजपच्या वैशाली झटाले आदी उपस्थित होते.यावेळी ना. पोटे म्हणाले, विद्यापिठाचा परिसर भव्य आहे. नागरिक पहाटे येथे फिरण्याकरिता येतात. शुद्ध प्राणवायू येथे नागरिकांना मिळतो. इतकेच नव्हे तर गाडगेबाबांनी साक्षरता व वनसंवर्धनाचा संदेश दिला आहे. त्यामुळे या परिसरात अधिकाधिक झाडे लावली जावीत. राज्यात वृक्षलागवडीची चळवळ सुरु असून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनदेखील पालकमंत्र्यांनी केले.यावेळी बोलताना खा. आनंदराव अडसूळ म्हणाले, वृक्षाचे माणसाशी आजन्म नाते आहे.राज्याची लोकसंख्या ११ कोटी आहे. प्रत्येकाने एक झाड लावले तरी उद्दिष्ट्यपूर्ती होऊ शकते.कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी वृक्षारोपण ही जागतिक गरज असल्याचे सांगितले. विद्यापीठात ‘हरितसंकल्प’अमरावती : विद्यापिठाची ४५० एकर जमीन व तरूण मनुष्यबळ आणि रासेयोचे २५ हजार (एनएसएस) विद्यार्थी विद्यापीठाकडे आहेत. या मनुष्यबळाचा वापर महसूल विभागाच्या सहकार्याने करून अमरावती विभागातील ७० टक्के रिकाम्या जागेवर वृक्षारोपण करून विद्यापीठ परिसर संपूर्ण हरित करण्यासाठी २०१६ पर्यंत वृक्षलागवड केली जाईल. विद्यापीठ परिसरात १५१ झाडे लावण्यात आली आहेत. वृक्षदिंडीपूर्वी उपस्थित पाहुण्यांनी वृक्षपूजन करुन वनमहोत्सवाचा शुभारंभ केला. पश्चात वृक्ष देऊन अतिथींचे स्वागत करण्यात आले. संचालन विलास नांदूरकर तर उपसंचालक सामाजिक वनिकरण प्रदीप मसराम यांनी आभार प्रदर्शन केले. (प्रतिनिधी)दुपारपर्यंत पाच लक्ष वृक्षारोेपण : जिल्हाधिकारीजिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात जिल्ह्यात ४ लक्ष ८० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५ लाख रोपट्यांचे रोपण करून उद्दिष्ट्यपूर्ती केली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत ३ लक्ष ६३ हजार झाडे लावण्यात आली होती. या सर्व झाडांचे संवर्धन करण्यासाठी २०० झाडांमागे एक मजूर तसेच तारेचे कुंपण करून वृक्षांचे जतन करण्यात येईल. जलयुक्त शिवार योजनेच्या २५० गावांमध्ये १ लाख ८० हजार झाडे लावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.