शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
4
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
7
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
8
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
9
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
10
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
11
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
12
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
13
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
14
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
15
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
16
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
17
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
18
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
19
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
20
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?

वृक्षदिंडीने वनमहोत्सवाचा शुभारंभ; हरितक्रांतीची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 23:58 IST

राज्यात १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

अमरावती : राज्यात १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा शुभारंभ विद्यापीठ परिसरात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते वृक्षारोपणाने शुक्रवारी झाला. यावेळी काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीमध्ये पालकमंत्री स्वत: सहभागी झाले होेते. यावेळी खा. आनंदराव अडसूळ, आ.बच्चू कडू, जिल्हाधिकारी किरण गित्ते, कुलगुरू मुरलीधर चांदेकर, कुलसचिव अजय देशमुख, माजी कुलगुरू व्ही.एस. सपकाळ, प्र-कुलगुरु जयकिरण तिडके, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, उपवनसंरक्षक नीनू सोमराज, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक प्रदीप मसराम, जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत, भाजपच्या वैशाली झटाले आदी उपस्थित होते.यावेळी ना. पोटे म्हणाले, विद्यापिठाचा परिसर भव्य आहे. नागरिक पहाटे येथे फिरण्याकरिता येतात. शुद्ध प्राणवायू येथे नागरिकांना मिळतो. इतकेच नव्हे तर गाडगेबाबांनी साक्षरता व वनसंवर्धनाचा संदेश दिला आहे. त्यामुळे या परिसरात अधिकाधिक झाडे लावली जावीत. राज्यात वृक्षलागवडीची चळवळ सुरु असून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनदेखील पालकमंत्र्यांनी केले.यावेळी बोलताना खा. आनंदराव अडसूळ म्हणाले, वृक्षाचे माणसाशी आजन्म नाते आहे.राज्याची लोकसंख्या ११ कोटी आहे. प्रत्येकाने एक झाड लावले तरी उद्दिष्ट्यपूर्ती होऊ शकते.कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी वृक्षारोपण ही जागतिक गरज असल्याचे सांगितले. विद्यापीठात ‘हरितसंकल्प’अमरावती : विद्यापिठाची ४५० एकर जमीन व तरूण मनुष्यबळ आणि रासेयोचे २५ हजार (एनएसएस) विद्यार्थी विद्यापीठाकडे आहेत. या मनुष्यबळाचा वापर महसूल विभागाच्या सहकार्याने करून अमरावती विभागातील ७० टक्के रिकाम्या जागेवर वृक्षारोपण करून विद्यापीठ परिसर संपूर्ण हरित करण्यासाठी २०१६ पर्यंत वृक्षलागवड केली जाईल. विद्यापीठ परिसरात १५१ झाडे लावण्यात आली आहेत. वृक्षदिंडीपूर्वी उपस्थित पाहुण्यांनी वृक्षपूजन करुन वनमहोत्सवाचा शुभारंभ केला. पश्चात वृक्ष देऊन अतिथींचे स्वागत करण्यात आले. संचालन विलास नांदूरकर तर उपसंचालक सामाजिक वनिकरण प्रदीप मसराम यांनी आभार प्रदर्शन केले. (प्रतिनिधी)दुपारपर्यंत पाच लक्ष वृक्षारोेपण : जिल्हाधिकारीजिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात जिल्ह्यात ४ लक्ष ८० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५ लाख रोपट्यांचे रोपण करून उद्दिष्ट्यपूर्ती केली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत ३ लक्ष ६३ हजार झाडे लावण्यात आली होती. या सर्व झाडांचे संवर्धन करण्यासाठी २०० झाडांमागे एक मजूर तसेच तारेचे कुंपण करून वृक्षांचे जतन करण्यात येईल. जलयुक्त शिवार योजनेच्या २५० गावांमध्ये १ लाख ८० हजार झाडे लावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.