शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
3
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
4
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
5
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
6
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
7
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
9
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
10
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
11
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
12
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
13
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
14
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
16
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
17
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
18
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
19
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
20
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक

स्व. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात कम्युनिकेशन क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:16 IST

जिल्हा, शहर काँग्रेस कमिटीतर्फे राजीव गांधी यांना अभिवादन अमरावती : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात खऱ्या अर्थाने ...

जिल्हा, शहर काँग्रेस कमिटीतर्फे राजीव गांधी यांना अभिवादन

अमरावती : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात खऱ्या अर्थाने संगणक क्रांती झाली. त्यामुळेच देश खऱ्या अर्थाने विकसित झाला, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते शुक्रवारी (दि. २०) जिल्हा कॉंग्रेस ग्रामीण व शहरच्या वतीने आयोजित स्व. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती कार्यक्रमाला संबोधित करताना बाेलत होते.

यावेळी कार्यक्रमाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा कॉंग्रेस व जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, दयाराम काळे, पूजा आमले, आदी उपस्थित होते.

याप्रसंगी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांनी देशाची धुरा हाती घेताच देशात संगणक क्रांती आणि पर्यायाने कम्युनिकेशनमध्ये देशाने अग्रणी प्रगती केली, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. केंद्र शासनावर टीका करीत देशात महागाईला व आर्थिक व्यवस्थेला खिळखिळा करणारा भाजप पक्ष जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे आज कोणताही घटक सुखी नाही, खऱ्या अर्थाने आता एकसंध होऊन केंद्रातदेखील काँग्रेसची सत्ता आणली पाहिजे, असे आवाहन देशमुख यांनी केले. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीही यावेळी अभिवादन करीत काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये यापेक्षाही मजबूत करण्याकरिता सर्वांनी कटिबद्ध होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. शहरात कॉंग्रेस पक्ष मजबूत करून महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार, असा विश्वास शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी मनोगतात व्यक्त केला. कार्यक्रमाला जिल्हा काॅंग्रेस व शहर काॅग्रेस कमिटीचे पदाधिकारी,पक्षाचे नगरसेवक, अल्पसंख्याक सेल, युवक काॅंग्रेस, एन. एस. यू. आय.,महिला काॅंग्रेस, आदी विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बॉक्स ,

आगामी निवडणुकीत काँग्रेसचाच झेंडा

आगामी काळात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व पंचायत समित्यांच्या तसेच सहकार क्षेत्रामधील बँक व अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत; त्यामुळे जिल्ह्यात आता या सहकार क्षेत्रावर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांवरदेखील काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा निर्धार जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केला.