शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

स्व. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात कम्युनिकेशन क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:16 IST

जिल्हा, शहर काँग्रेस कमिटीतर्फे राजीव गांधी यांना अभिवादन अमरावती : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात खऱ्या अर्थाने ...

जिल्हा, शहर काँग्रेस कमिटीतर्फे राजीव गांधी यांना अभिवादन

अमरावती : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात खऱ्या अर्थाने संगणक क्रांती झाली. त्यामुळेच देश खऱ्या अर्थाने विकसित झाला, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते शुक्रवारी (दि. २०) जिल्हा कॉंग्रेस ग्रामीण व शहरच्या वतीने आयोजित स्व. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती कार्यक्रमाला संबोधित करताना बाेलत होते.

यावेळी कार्यक्रमाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा कॉंग्रेस व जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, दयाराम काळे, पूजा आमले, आदी उपस्थित होते.

याप्रसंगी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांनी देशाची धुरा हाती घेताच देशात संगणक क्रांती आणि पर्यायाने कम्युनिकेशनमध्ये देशाने अग्रणी प्रगती केली, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. केंद्र शासनावर टीका करीत देशात महागाईला व आर्थिक व्यवस्थेला खिळखिळा करणारा भाजप पक्ष जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे आज कोणताही घटक सुखी नाही, खऱ्या अर्थाने आता एकसंध होऊन केंद्रातदेखील काँग्रेसची सत्ता आणली पाहिजे, असे आवाहन देशमुख यांनी केले. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीही यावेळी अभिवादन करीत काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये यापेक्षाही मजबूत करण्याकरिता सर्वांनी कटिबद्ध होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. शहरात कॉंग्रेस पक्ष मजबूत करून महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार, असा विश्वास शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी मनोगतात व्यक्त केला. कार्यक्रमाला जिल्हा काॅंग्रेस व शहर काॅग्रेस कमिटीचे पदाधिकारी,पक्षाचे नगरसेवक, अल्पसंख्याक सेल, युवक काॅंग्रेस, एन. एस. यू. आय.,महिला काॅंग्रेस, आदी विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बॉक्स ,

आगामी निवडणुकीत काँग्रेसचाच झेंडा

आगामी काळात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व पंचायत समित्यांच्या तसेच सहकार क्षेत्रामधील बँक व अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत; त्यामुळे जिल्ह्यात आता या सहकार क्षेत्रावर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांवरदेखील काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा निर्धार जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केला.