शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

स्व. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात कम्युनिकेशन क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:16 IST

जिल्हा, शहर काँग्रेस कमिटीतर्फे राजीव गांधी यांना अभिवादन अमरावती : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात खऱ्या अर्थाने ...

जिल्हा, शहर काँग्रेस कमिटीतर्फे राजीव गांधी यांना अभिवादन

अमरावती : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात खऱ्या अर्थाने संगणक क्रांती झाली. त्यामुळेच देश खऱ्या अर्थाने विकसित झाला, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते शुक्रवारी (दि. २०) जिल्हा कॉंग्रेस ग्रामीण व शहरच्या वतीने आयोजित स्व. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती कार्यक्रमाला संबोधित करताना बाेलत होते.

यावेळी कार्यक्रमाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा कॉंग्रेस व जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, दयाराम काळे, पूजा आमले, आदी उपस्थित होते.

याप्रसंगी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांनी देशाची धुरा हाती घेताच देशात संगणक क्रांती आणि पर्यायाने कम्युनिकेशनमध्ये देशाने अग्रणी प्रगती केली, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. केंद्र शासनावर टीका करीत देशात महागाईला व आर्थिक व्यवस्थेला खिळखिळा करणारा भाजप पक्ष जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे आज कोणताही घटक सुखी नाही, खऱ्या अर्थाने आता एकसंध होऊन केंद्रातदेखील काँग्रेसची सत्ता आणली पाहिजे, असे आवाहन देशमुख यांनी केले. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीही यावेळी अभिवादन करीत काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये यापेक्षाही मजबूत करण्याकरिता सर्वांनी कटिबद्ध होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. शहरात कॉंग्रेस पक्ष मजबूत करून महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार, असा विश्वास शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी मनोगतात व्यक्त केला. कार्यक्रमाला जिल्हा काॅंग्रेस व शहर काॅग्रेस कमिटीचे पदाधिकारी,पक्षाचे नगरसेवक, अल्पसंख्याक सेल, युवक काॅंग्रेस, एन. एस. यू. आय.,महिला काॅंग्रेस, आदी विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बॉक्स ,

आगामी निवडणुकीत काँग्रेसचाच झेंडा

आगामी काळात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व पंचायत समित्यांच्या तसेच सहकार क्षेत्रामधील बँक व अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत; त्यामुळे जिल्ह्यात आता या सहकार क्षेत्रावर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांवरदेखील काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा निर्धार जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केला.