शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

१,९६३ गावांची अंतिम ७० पैसेवारी

By admin | Updated: January 1, 2017 00:46 IST

पैसेवारी काढण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आल्याने यंदा खरिपाची अंतिम पैसेवारी १५ जानेवारी ऐवजी ३१ डिसेंबरला

उरफाटा न्याय : सोयाबीन, मुगाचे मोठे नुकसान अमरावती : पैसेवारी काढण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आल्याने यंदा खरिपाची अंतिम पैसेवारी १५ जानेवारी ऐवजी ३१ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. जिल्ह्यात लागवडीयोग्य एक हजार ९६३ गावात ७० पेसेवारी जिल्हा प्रशासनाने काढली. यंदाच्या हंगामात प्रतिकुल हवामानामुळे सोयाबीन, मूग, उडीद व तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकताच झाल्याच्या पार्श्वभूमिवर ५० पैशांपेक्षा अधिक पैसेवारीने शासन खूष असले, तरी शेतकऱ्यांत मात्र नाराजी आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक असा १२० टक्के पाऊस पडला. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ८१४ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ९७८ मिमी पाऊस पडला.सुरूवातीला काळात अधिक पावसाने अल्प कालावधीचे सोयाबीन, मुग व उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर काळ्या जमिनीच्या शेतामधील तुरीवर ‘मर’ रोग येऊन हजारो एकरातील पीक नष्ट झाले आहे. तर ७ आॅगस्टनंतर महिनाभर पावसाने खंड दिल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. यामुळे सरासरी उत्पन्नात कमी आली. सोयाबीन सोंगणी व मळणीच्या हंगामात सतत पाऊस झाल्याने ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव, वातावरणात व जमिनीत वाढलेली आर्द्रता यामुळे सोयाबीनच्या शेंगांमधील दाण्यांचे अंकुरण झाले. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अतिपावसामुळे कपाशीची पातेगळ व प्रतिकुल स्थितीमुळे ‘लाल्याचा’ प्रादुर्भाव झाला. डिसेंबरच्या अखेरच्या दोन आठवड्यात अति थंडीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील उभी तूर जळाली. त्यामुळे सरासरी उत्पन्नात कमी येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खरीपाची अंतिम ७० पैसेवारी जाहीर केली. यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी मदत मिळण्यास अडसर निर्माण होणार आहे. (प्रतिनिधी)