शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

१,९६३ गावांची अंतिम ७० पैसेवारी

By admin | Updated: January 1, 2017 00:46 IST

पैसेवारी काढण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आल्याने यंदा खरिपाची अंतिम पैसेवारी १५ जानेवारी ऐवजी ३१ डिसेंबरला

उरफाटा न्याय : सोयाबीन, मुगाचे मोठे नुकसान अमरावती : पैसेवारी काढण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आल्याने यंदा खरिपाची अंतिम पैसेवारी १५ जानेवारी ऐवजी ३१ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. जिल्ह्यात लागवडीयोग्य एक हजार ९६३ गावात ७० पेसेवारी जिल्हा प्रशासनाने काढली. यंदाच्या हंगामात प्रतिकुल हवामानामुळे सोयाबीन, मूग, उडीद व तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकताच झाल्याच्या पार्श्वभूमिवर ५० पैशांपेक्षा अधिक पैसेवारीने शासन खूष असले, तरी शेतकऱ्यांत मात्र नाराजी आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक असा १२० टक्के पाऊस पडला. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ८१४ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ९७८ मिमी पाऊस पडला.सुरूवातीला काळात अधिक पावसाने अल्प कालावधीचे सोयाबीन, मुग व उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर काळ्या जमिनीच्या शेतामधील तुरीवर ‘मर’ रोग येऊन हजारो एकरातील पीक नष्ट झाले आहे. तर ७ आॅगस्टनंतर महिनाभर पावसाने खंड दिल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. यामुळे सरासरी उत्पन्नात कमी आली. सोयाबीन सोंगणी व मळणीच्या हंगामात सतत पाऊस झाल्याने ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव, वातावरणात व जमिनीत वाढलेली आर्द्रता यामुळे सोयाबीनच्या शेंगांमधील दाण्यांचे अंकुरण झाले. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अतिपावसामुळे कपाशीची पातेगळ व प्रतिकुल स्थितीमुळे ‘लाल्याचा’ प्रादुर्भाव झाला. डिसेंबरच्या अखेरच्या दोन आठवड्यात अति थंडीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील उभी तूर जळाली. त्यामुळे सरासरी उत्पन्नात कमी येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खरीपाची अंतिम ७० पैसेवारी जाहीर केली. यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी मदत मिळण्यास अडसर निर्माण होणार आहे. (प्रतिनिधी)