शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

भूमिहीन शेतकरी पुत्रांना मिळेनात वधू!

By admin | Updated: May 6, 2016 00:15 IST

शुभमंगल सावधान या शब्दाची वेळ प्रत्येक समाजातील तरुणांच्या जीवनात येते. मात्र तालुक्यातील २ ते ३ वर्षांपासून भूमिहीम शेतकरी युवकांची गोची झाल्याचे दिसून येते.

कर्मचाऱ्यांना प्राधान्य : शेती व्यवसाय बेभरवशाचा परिणामसुनील देशपांडे अचलपूर शुभमंगल सावधान या शब्दाची वेळ प्रत्येक समाजातील तरुणांच्या जीवनात येते. मात्र तालुक्यातील २ ते ३ वर्षांपासून भूमिहीम शेतकरी युवकांची गोची झाल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण कमी असल्याने व स्थावर मालमत्ता नसल्याने बहुतांश समाजातील युवक मुली बघण्याकरिता फिरताना दिसतात. परंतु मुलींची बहुतांश समाजामध्ये कमतरता असल्याने भूमिहीम मुलांना प्रत्येक समाजात मुली देण्यासाठी नकार मिळत असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. आपल्या मुलीला चांगला पती मिळण्याकरिता शेती, स्थावर मालमत्ता किंवा कंपनीमध्ये काम करीत असेल तरच मुलीला दाखवितात. नाही तर मुली दाखविण्यासच तयार होत नसल्याचे शेतकरी मजूर तरुणांच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे. काही छोट्या समाजामध्ये मुलीचे प्रमाण फारच कमी असल्यामुळे व पैशाने लबालब असल्याने त्यांना कोणत्याही समाजाची मुलगी पत्नी म्हणून स्वीकारणे वावगे वाटत नाही. काही सुशिक्षित समाजातील तरुण तर बहुतांश वृत्तपत्रांत मुलगी पाहिजे म्हणून जाहिरात देतात व त्या जाहिरातीत मी स्वत: ३० हजार रुपये महिना कमावत असून मी कोणत्याही समाजाची मुलगी करायला तयार आहे करिता संपर्क साधावा, अशा प्रकारच्या जाहिराती देऊन मुली शोधत असल्याचे वास्तव आहे. अशा परिस्थितीमुळे तालुक्यातील तरुणांची मानसिकता खराब होत चालली आहे. त्या मानसिकतेमध्ये बहुतांश तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहेत. यापेक्षाही उलट म्हणजे मुलीचे आई-वडील दारू पिणाऱ्या शासकीय नोकरी करणाऱ्या मुलांना डोळे बंद करून मुली देण्यास तयार होतात. मात्र राबराब कष्ट राबणाऱ्या तरुणांकडून शेतीचे कामे करून घेतात. मात्र मुलगी देण्याची वेळ येते त्यावेळी मात्र नकार देतात. यामुळे तालुक्यातील भूमिहीन मजूर वर्गातील मुलांचे आई-वडील हतबल झाले असून मुलासाठी मुलगी शोधावी तरी कशी, असा पेच त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने भूमिहीन शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी शासकीय नोकरीमध्ये प्राधान्य देऊन काही प्रमाणात भूमिहीन तरुणांपुढील संकट दूर करावे. तसेच शासकीय बँकांमार्फत भूमिहीन शेतकऱ्यांना सुलभ स्वरुपात कोणतीही अट न ठेवता उद्योगधंद्यासाठी कर्ज देण्यात यावे, अशा प्रकारची इच्छा तालुक्यातील भूमिहीन तरुणांनी बोलून दाखवली. दारू पिणारा चालेल, पण सातबारा असावातालुक्यामध्ये भूमिहीन तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यापैकी काही तरुणांनी स्वकष्टाच्या जोरावर प्रगतीसुद्धा केली आहे. तरीसुद्धा प्रत्येक समाजामध्ये भूमिहीन तरुणांना मुली देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. दारू पिणारा मुलगा असला तरी चालेल. पण त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता किंवा शासकीय-निमशासकीय नोकरी असायला हवी. अशांनाच प्रत्येक समाजामध्ये प्रथम प्राधान्य दिले जाते, असे परतवाडा येथील पुरुषोत्तम काळे यांनी सांगितले.कोणत्याही समाजाचा असो त्या प्रत्येक समाजाच्या मुलींच्या आई-वडिलांना आपल्या मुलीला योग्य वर मिळावा, अशी अपेक्षा असते. त्याकरिता ते प्रथम प्राधान्य शासकीय-निमशासकीय नोकरी करणाऱ्या तरुणांना देतात. त्यामुळे अशी अपेक्षा ठेवणे साहजिकच आहे. परंतु प्रत्येक समाजामध्ये असेही काही आई-वडील आहेत की भूमिहीन कष्टकरी मुलांनासुद्धा प्राधान्य देतात.- शुभम गायकवाड, धामणगाव गढीसमाजामध्ये असलेले मुलींचे कमी प्रमाण यासाठी सर्वाधिक कारणीभूत आहे. प्रत्येक आई-वडीलाची इच्छा असतेकी, आपल्या मुलीचे जीवन सुखात जावे याकरिता ते आर्थिक स्थितीने सुदृढ असणाऱ्या मुलांनाच प्राधान्य देतात. त्यामुळे भूमिहीन तरुणांना मुली मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकावे लागते. परंतु या सर्व कारणामुळे तरुण मुलांची मानसिकता बिघडत चालली आहे.- विवेक काळे, धामनगाव गढी