शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शासकीय घरकुलांमध्ये शौचालयाचा अभाव

By admin | Updated: December 23, 2014 22:56 IST

ग्रामीण भागात असलेल्या तीन लाख ९५ हजार घरकुलामध्ये अद्यापही सुमारे २ लाख पाच हजार घरकुलांना शौचालयाची प्रतीक्षा आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे शौचालय

अमरावती : ग्रामीण भागात असलेल्या तीन लाख ९५ हजार घरकुलामध्ये अद्यापही सुमारे २ लाख पाच हजार घरकुलांना शौचालयाची प्रतीक्षा आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे शौचालय निर्मितीत जिल्हा माघारला जात आहे. याशिवाय स्वच्छतेविषयक जनजागृती नसल्याने संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या संतांच्या जिल्ह्यात स्वच्छतेच्या बाबतीत पुरेशी जनजागृती होत नसल्याने शौचालय उभारणीत जिल्हा मागे पडत आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियानाचे नामकरण नुकतेच स्वच्छ भारत मिशन असे करण्यात आले आहे. वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी प्रोत्साहनपर रक्कम वाढवून ती बारा हजार रुपये करण्यात आली आहे. इंदिरा गांधी आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरातील स्वच्छता गृहासाठी वेगळी तरतूद आहे. त्यामुळे वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामांना वेग येईल, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात येत होती. अशातच मोजमाप व तपाणी आदी बाबीसाठी जास्त वेळ खर्च होत असल्याने तसेच या उपक्रमाची अंमलबजावणीसाठी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा असलेला उदासिनपणा यामुळे या योजनेकडेच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. शासनाने शौचालयासाठी अनुदान बारा हजार रुपये केले असले तरी एवढ्या किंमतीत चांगले स्वच्छतागृह बांधणे अशक्य आहे. केंद्र शासनाने सन २००३ पासून संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू केले. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या वैयक्तिक शौचालय बांधकामास प्राधान्य देण्यात आले होते. या अभियानाचे नाव सन २०१२ मध्ये निर्मल भारत अभियान करण्यात आले. योजनाचे नावे बदले परंतु स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छतागृहाच्या संख्येत पाहिजे तशी वाढ झाली नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामाकरिता प्रोत्साहनपर अनुदान दिले जात होते. पण तांत्रिक अडचणीमुळे या योजनेत लोकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता तर अनुदानच बंद केले आहे. अनुदानाची पूर्ण रक्कम स्वच्छ भारत मिशनकरिता केंद्र शासनाकडून मंजुर निधीत दिली जात आहे. वैयक्तिक शौचालयासाठी केंद्र शासनाकडून नऊ हजार रुपये आणि राज्य शासनामार्फत तीन हजार रुपये अशा प्रकारे ७५ टक्के केंद्र व २५ टक्के राज्य हिस्सा मिळतो. गावपातळीवर आरोग्याबाबत चांगले वातावरण असावे, महिलांचा सन्मान राखला जावा हा या मागील उद्देश आहे. यासाठी सन २००५ पासून राज्यात पाणी पुरवठा योजनांसाठी हगणदारी मुक्तीचे धोरण स्वीकारण्यात आले. याच आधारावर पाणी पुरवठा योजनाचे प्रस्ताव तयार करण्यात आले. यानुसार कामे सुरू करताना सदर गावामध्ये ६० टक्के हगणदारी मुक्तीची अट टाकण्यात आली. याशिवाय दुसरा हप्ता देतेवेळी १०० टक्के हगणदारी मुक्त असणे या अटी होत्या. मात्र जिल्ह्यात पाणी टंचाईगस्त गावांमध्ये याचा फार फरक पडला नाही. सध्या ही अट साठ टक्के करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)