शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
5
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
8
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
9
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
10
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
11
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
12
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
14
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
15
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
16
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
17
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
18
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
19
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
20
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय घरकुलांमध्ये शौचालयाचा अभाव

By admin | Updated: December 23, 2014 22:56 IST

ग्रामीण भागात असलेल्या तीन लाख ९५ हजार घरकुलामध्ये अद्यापही सुमारे २ लाख पाच हजार घरकुलांना शौचालयाची प्रतीक्षा आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे शौचालय

अमरावती : ग्रामीण भागात असलेल्या तीन लाख ९५ हजार घरकुलामध्ये अद्यापही सुमारे २ लाख पाच हजार घरकुलांना शौचालयाची प्रतीक्षा आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे शौचालय निर्मितीत जिल्हा माघारला जात आहे. याशिवाय स्वच्छतेविषयक जनजागृती नसल्याने संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या संतांच्या जिल्ह्यात स्वच्छतेच्या बाबतीत पुरेशी जनजागृती होत नसल्याने शौचालय उभारणीत जिल्हा मागे पडत आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियानाचे नामकरण नुकतेच स्वच्छ भारत मिशन असे करण्यात आले आहे. वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी प्रोत्साहनपर रक्कम वाढवून ती बारा हजार रुपये करण्यात आली आहे. इंदिरा गांधी आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरातील स्वच्छता गृहासाठी वेगळी तरतूद आहे. त्यामुळे वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामांना वेग येईल, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात येत होती. अशातच मोजमाप व तपाणी आदी बाबीसाठी जास्त वेळ खर्च होत असल्याने तसेच या उपक्रमाची अंमलबजावणीसाठी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा असलेला उदासिनपणा यामुळे या योजनेकडेच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. शासनाने शौचालयासाठी अनुदान बारा हजार रुपये केले असले तरी एवढ्या किंमतीत चांगले स्वच्छतागृह बांधणे अशक्य आहे. केंद्र शासनाने सन २००३ पासून संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू केले. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या वैयक्तिक शौचालय बांधकामास प्राधान्य देण्यात आले होते. या अभियानाचे नाव सन २०१२ मध्ये निर्मल भारत अभियान करण्यात आले. योजनाचे नावे बदले परंतु स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छतागृहाच्या संख्येत पाहिजे तशी वाढ झाली नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामाकरिता प्रोत्साहनपर अनुदान दिले जात होते. पण तांत्रिक अडचणीमुळे या योजनेत लोकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता तर अनुदानच बंद केले आहे. अनुदानाची पूर्ण रक्कम स्वच्छ भारत मिशनकरिता केंद्र शासनाकडून मंजुर निधीत दिली जात आहे. वैयक्तिक शौचालयासाठी केंद्र शासनाकडून नऊ हजार रुपये आणि राज्य शासनामार्फत तीन हजार रुपये अशा प्रकारे ७५ टक्के केंद्र व २५ टक्के राज्य हिस्सा मिळतो. गावपातळीवर आरोग्याबाबत चांगले वातावरण असावे, महिलांचा सन्मान राखला जावा हा या मागील उद्देश आहे. यासाठी सन २००५ पासून राज्यात पाणी पुरवठा योजनांसाठी हगणदारी मुक्तीचे धोरण स्वीकारण्यात आले. याच आधारावर पाणी पुरवठा योजनाचे प्रस्ताव तयार करण्यात आले. यानुसार कामे सुरू करताना सदर गावामध्ये ६० टक्के हगणदारी मुक्तीची अट टाकण्यात आली. याशिवाय दुसरा हप्ता देतेवेळी १०० टक्के हगणदारी मुक्त असणे या अटी होत्या. मात्र जिल्ह्यात पाणी टंचाईगस्त गावांमध्ये याचा फार फरक पडला नाही. सध्या ही अट साठ टक्के करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)