शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

बाजार समितीच्या संत्रा मंडईत घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:29 IST

दुर्लक्ष : व्यापारी, शेतकरी, कष्टकऱ्यांचे आरोग्य धोक्यात वरूड : बाजार समितीच्या संत्रा लिलाव मंडईत सडलेली संत्री, केरकचरा ...

दुर्लक्ष : व्यापारी, शेतकरी, कष्टकऱ्यांचे आरोग्य धोक्यात

वरूड : बाजार समितीच्या संत्रा लिलाव मंडईत सडलेली संत्री, केरकचरा पडला असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी, शेतकरी, व्यापारी, मजुरांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष असल्याची ओरड आहे.

बाजार समितीच्या संत्रा लिलाव मंडईत दिवसागणिक शेकडो ट्रक संत्रा परप्रांतात पाठविला जातो. शेकडो मजूर तेथे काम करतात. येथील हमाल भवनाशेजारी कचऱ्याचा ढीग पडला असून ते अडगळीत पडले आहे. खराब संत्री फेकून दिली जात असल्याने मजुरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. बाजार समिती समस्यांचे माहेरघर बनली आहे. बाजार समितीत ३० ते ३५ संत्रा मंडी आहे. येथे लिलाव बाजारसुद्धा भरतो. परंतु शेतकऱ्यांकरिता असणाऱ्या सुविधा धूळखात पडल्या आहेत. व्यापाऱ्यांना दुकाने दिली आहेत. शेतकरी भवन केवळ खासगी आणि सरकारी कार्यक्रमाकरिता असल्याचे चित्र आहे. येथील संत्रा मंडईत काम करणारे हजारो मजूर उघड्यावर वास्तव्य करतात. हमालाकरिता असलेले हमाल भवन दुर्गंधीचे आश्रयस्थान बनले आहे. सडलेल्या संत्र्यांचा ढीग येथे लागला आहे. कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी खरेदी करताना व्यापाऱ्यांचे हित जोपासले जाते.

कुणी ‘ब्र’ही काढत नाही

बाजार समितीच्या कार्यकारी मंडळात सर्वच पक्षाचे संचालक असले तरी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलण्यास कुणीही तयार नाही. यामुळे सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू असल्याची ओरड आहे. घाणीचे साम्राज्य व सडक्या संत्र्यांचा दुर्गंध सभापती वा संचालकांच्या नाकापर्यंत अद्याप पोहोचलेला नाही.