शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी खरीप पेरणी माघारली

By admin | Updated: June 26, 2016 00:07 IST

मान्सूनच्या पहिल्या पावसाचे २० जूनला आगमन झाल्यानंतर दडी मारली यामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या माघारल्या.

पाऊस नसल्याचा परिणाम : १४ हजार ३०० हेक्टरमध्ये पेरणीअमरावती : मान्सूनच्या पहिल्या पावसाचे २० जूनला आगमन झाल्यानंतर दडी मारली यामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या माघारल्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ७ लाख २९ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. सद्यस्थितीत १४ हजार ३०० हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. क्षेत्राची ही फक्त दोन टक्केवारी आहे. जिल्ह्यात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी पावसाचे आगमन होऊन पेरणीला सुरुवात होते व जूनअखेरीस पूर्ण पेरणी होऊन जाते अशी परंपरा आहे. आता जून ऐवजी जुलै महिन्यात पेरणी सुरू होऊन आॅगस्ट महिन्यापर्यंत पेरणी सुरू राहत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १४ हजार ८०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. हे क्षेत्र सिंचनाची सुविधा असणारे क्षेत्र आहे. कोरडवाहू क्षेत्रातील पेरणीला अद्याप सुरुवात नाही. हवामान खात्याने २६ जूननंतर पेरणीयोग्य पावसाची शक्यता असल्याचा अंदाज दिलेला आहे व कृषी विभागाने देखील २६ जूननंतर पेरणी करावी अन्यथा दुबार पेरणीची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी धानासाठी ४ हजार ३०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना पेरणी क्षेत्र निरंक आहे. ज्वारीसाठी ३७ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असताना १०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. बाजरीसाठी २०० हेक्टर क्षेत्र असून पेरणी क्षेत्र निरंक आहे. मक्यासाठी १२०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. पेरणीक्षेत्र निरंक आहे. तुरीसाठी १ लाख १४ हजार क्षेत्र असून २१ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. उडीदासाठी ५३ हजार हेक्टर क्षेत्रापैकी १०० हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. खरीप भुईमुगाचे क्षेत्र यंदा निरंक आहे. तीळ ५०० हेक्टर क्षेत्रात निरंक आहे. सूर्यफुल निरंक, सोयाबीनसाठी ३ लाख २३ हजार ३०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना ४६०० हेक्टर क्षेत्रात सध्या पेरणी झालेली आहे. कपाशीसाठी १ लाख ९३ हजार २०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना ७ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. १ ते २५ जूनदरम्यान ६२.३ मि.मी. पाऊसजिल्ह्यात १ ते २५ जूनदरम्यान पावसाची अपेक्षित सरासरी ११६.८ मि. मी. आवश्यक असताना ६२.६ मि. मी. पाऊस झाला. या ५३.३ टक्केवारी आहे. ९० मि.मी. पाऊस चिखलदरा, अमरावती ४३, भातकुली ४२.२,नांदगाव ७३.३, चांदूररेल्वे ७९.६, धामणगाव ५८.३, तिवसा ८१.८, मोर्शी ४२, अचलपूर ४७.८, चांदूरबाजार ३७.६, दर्यापूर ७५.७, अंजनगाव ७३.३, धारणी ८४.१ मि. मी. पाऊस पडला आहे.कपाशी वरचढ, सोयाबीन माघारलेदरवर्षी सोयाबीनचे पेरणी क्षेत्र अधिक राहून पेरणीच टक्का अधिक असतो. यंदा मात्र उलट आहे. सोयाबीन सद्यस्थितीत ४६०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. हे केवळ १ टक्के पेरणी क्षेत्र आहे. याउलट कपाशीची ७ हजार ३०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ४ टक्के पेरणीक्षेत्र आहे.