शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

परिपत्रकांच्या नादात खरीप हंगाम लोटला, १० हजार मिळेनात

By admin | Updated: July 17, 2017 00:11 IST

कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ होईपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तातडीने दहा हजार रूपयांचे कर्ज....

अनास्था : सरकार गाफील, बँका निवांतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ होईपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तातडीने दहा हजार रूपयांचे कर्ज देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. मात्र आदेश आणि परिपत्रकांच्या नादात खरीप हंगाम लोटला तरी हे दहा हजार रूपये शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत त्यामुळे सरकार गाफील, तर बँका निवांत राहिल्या आहेत.राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला तरी याचा शेतकऱ्यांना कसलाच अद्याप फायदा झालेला दिसून येत नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी तत्काळ दहा हजार रूपयांचे कर्ज मिळावे, यासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच बँकांनी तत्काळ दहा हजार रूपयांचे कर्जवाटप करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र या आदेशाला राज्यातील काही बँका सोडल्या तर सर्वच बँकांनी केराची टोपली दाखविली होती. त्यामुळे कर्जमाफीही नाही आणि नव्याने कर्जही नाही अशी शेतकऱ्यांची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. त्या पार्श्वभूमिवर आरबीआयने आता बँकांना पत्र पाठविले असून कर्जवाटप करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र आता खरीप हंगाम संपण्याच्या स्थितीत आला आहे. दुसरीकडे काही बँकांनी यापूर्वी शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचे कर्ज वाटप केले होते.काही ठिकाणी अद्यापही बँकांनी मात्र शेतकऱ्यांसह शासनालाही ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे कर्जवाटप न करणाऱ्या बँकांवर आता शासन काय कारवाई करणार असा प्रश्न आता शेतकरी वर्गातून होत आहे.