शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

परिपत्रकांच्या नादात खरीप हंगाम लोटला, १० हजार मिळेनात

By admin | Updated: July 17, 2017 00:11 IST

कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ होईपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तातडीने दहा हजार रूपयांचे कर्ज....

अनास्था : सरकार गाफील, बँका निवांतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ होईपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तातडीने दहा हजार रूपयांचे कर्ज देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. मात्र आदेश आणि परिपत्रकांच्या नादात खरीप हंगाम लोटला तरी हे दहा हजार रूपये शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत त्यामुळे सरकार गाफील, तर बँका निवांत राहिल्या आहेत.राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला तरी याचा शेतकऱ्यांना कसलाच अद्याप फायदा झालेला दिसून येत नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी तत्काळ दहा हजार रूपयांचे कर्ज मिळावे, यासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच बँकांनी तत्काळ दहा हजार रूपयांचे कर्जवाटप करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र या आदेशाला राज्यातील काही बँका सोडल्या तर सर्वच बँकांनी केराची टोपली दाखविली होती. त्यामुळे कर्जमाफीही नाही आणि नव्याने कर्जही नाही अशी शेतकऱ्यांची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. त्या पार्श्वभूमिवर आरबीआयने आता बँकांना पत्र पाठविले असून कर्जवाटप करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र आता खरीप हंगाम संपण्याच्या स्थितीत आला आहे. दुसरीकडे काही बँकांनी यापूर्वी शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचे कर्ज वाटप केले होते.काही ठिकाणी अद्यापही बँकांनी मात्र शेतकऱ्यांसह शासनालाही ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे कर्जवाटप न करणाऱ्या बँकांवर आता शासन काय कारवाई करणार असा प्रश्न आता शेतकरी वर्गातून होत आहे.