शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

गणोरीत काठेवाडींचा हैदोस, कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By admin | Updated: February 17, 2017 00:19 IST

भातकुली तालुक्यातील गणोरी आणि परलाम यागावांमध्ये काठेवाडी जनावरांचे पाच कळप शिरविण्यात

गावकऱ्यांच्या तक्रारी : तहसीलदार, ठाणेदार पोहोचले गावातअमरावती : भातकुली तालुक्यातील गणोरी आणि परलाम यागावांमध्ये काठेवाडी जनावरांचे पाच कळप शिरविण्यात आल्यामुळे गुरुवारी गावकरी आणि काठेवाडींमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिलेत.भातकुली उपविभागात गायी, बैल आणि मेंढ्या याकाठेवाडी जनावारांचा असह्य त्रास शेतकऱ्यांना आहे. काठेवाडींचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे हरिभाऊ मोहोड यांनी यापूर्वी आंदोलनही केले होते. काठेवाडी जनावरांना भातकुली उपविभात शिरण्याची बंदी आहे. मनाईहुकूम असतानाही काठेवाडींनी गणोरी आणि परलाम या गावांमध्ये साधारणत: आठवडाभरापासून झुंडीने जनावरे शिरविली आहेत. कळपाने आलेली ही जनावरे चक्क शेतात शिरविली जातात. वर्षभर रक्ताचे पाणी करून शेतकऱ्यांनी कापणीपर्यंत जोपासलेली पिके काठेवाडी गुरांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत फस्त केलीत. काठेवाडींच्या वाढत्या गुंडगिरीविरुद्ध गुरुवारी गणोरीतील काही गावकरी एकत्र झाले. काठेवाडींना त्यांनी गावाबाहेर जाण्याचा इशारा दिला. ३४ शेतकऱ्यांच्या स्वाक्षरींची तक्रार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना अमरावती येथे देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीचे गांभीर्य जाणून भातकुलीच्या तहसीलदार वैशाली पाथरे यांना कारवाईचे आदेश दिलेत. भातकुलीचे नायब तहसीलदार अशोक काळीलकर आणि भातकुली पोलीसांचे पथक रात्री गणोरी गावात दाखल झाले. दरम्यान गणोरीलगतच्या परलाम गावातील शेतकऱ्यांनीही एकत्रितपणे पोलीस ठाणे गाठले. हे गाव लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे लोणी पोलिसही रात्री परलाममध्ये दाखल झाले. गणोरीच्या शेतकऱ्यांनी भातकुली पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदविली. सामूहिक तक्रारीवर ३४ शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत. इरशाद मुस्तफा खान यांच्या शेतातील अर्धा एकरातील पीक खल्ल्यामुळे त्यांनीही भातुकली पोलिसांत तक्रार नोंदविल्याचे 'लोकमत'ला सांगितले.