शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

शंकरबाबांच्या मानसकन्येचे खासदारांकडून कन्यादान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 22:29 IST

अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या वैशालीचा विवाह येत्या १४ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. चेंबूर येथे कचऱ्यात टाकलेल्या या मूकबधिर मुलीचा २३ वर्षे सांभाळ केल्यानंतर आता हा काळजाचा तुकडा शंकरबाबांपासून लग्नानंतर दुरावणार आहे. तिचे कन्यादान खासदार आनंदराव अडसूळ हे करणार आहेत.

ठळक मुद्देमूकबधिर वैशालीचे शुभमंगल : हव्याप्र मंडळात होणार विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या वैशालीचा विवाह येत्या १४ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. चेंबूर येथे कचऱ्यात टाकलेल्या या मूकबधिर मुलीचा २३ वर्षे सांभाळ केल्यानंतर आता हा काळजाचा तुकडा शंकरबाबांपासून लग्नानंतर दुरावणार आहे. तिचे कन्यादान खासदार आनंदराव अडसूळ हे करणार आहेत.सन १९९५ मध्ये वैशाली अचलपूर तालुक्यातील वझ्झर फाटा येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर बालगृहात दाखल झाली. या बालगृहाची जबाबदारी शंकरबाबा पापळकर यांनी स्वीकारली आहे. मुंबईच्या चेंबूर भागात वैशालीला तिच्या अज्ञात माता-पित्याने कचºयाच्या ढिगावर टाकून पलायन केले. पोलिसांनी तिला उचलून डोंगरी येथील रिमांड होममध्ये दाखल केले. दोन वर्षांपर्यंत तिच्या माता-पित्यांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी बालकल्याण समितीच्या आदेशान्वये तिला शंकरबाबा पापळकर यांच्या स्वाधीन केले. तिचे वैशाली असे नामकरण करण्यात आले. मूकबधिर असलेली ही वैशाली आता २५ वर्षांची झाली असून, तिचा विवाह संस्थेतच मोठा झालेला मूकबधिर अनिलसोबत जुळविला आहे.१४ जानेवारीला लग्नवैशाली व अनिल यांचे लग्न १४ जानेवारी २०१९ रोजी नियोजित केले आहे. अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात थाटात हा सोहळा पार पडेल, असे वचनच खा. अडसूळ यांनी शंकरबाबांना दिले. आतापर्यंत त्यांच्या संस्थेतील मुलींचे विवाह थाटात पार पडले. त्यामुळे या विवाह सोहळ्याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे.आजपासून ही माझी मानसकन्याकन्यादानाचे दायित्व पार पाडावे, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांनी केली असता, त्यांनी त्यास होकार दर्शविला आणि आजपासून ही माझी मानसकन्या झाली, असे सांगितले. या घडामोडीबद्दल पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी समाधान व्यक्त केले.पुनर्वसनाची काळजी झाली दूरवैशाली वयात आल्यानंतर तिच्या पुनर्वसनाची काळजी शंकरबाबांना लागली होती. सुदैवाने संस्थेतच लहानाचा मोठा झालेला अनिल याचे वैशालीसोबत सूर जुळले आणि दोघांनी लग्नगाठीत एकत्र येण्याचा निर्णय घेतला. अनिलला पुणे येथून शंकरबाबांच्या स्वाधीन करण्यात आले होते.