शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी, मूग, उडीद पेरणी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 22:14 IST

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी अपेक्षित आहे. मात्र, पाऊस न आल्याने कपाशी, मूग, उडीद पिकाची पेरणी संकटात आली आहे. जुलैमध्ये पेरणी झाल्यास मूग, उडिदाच्या उत्पादनात घट होते, तर उशिराने पेरणी झाल्यास कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, असे शेतकऱ्यांचे निरीक्षण आहे.

ठळक मुद्देपाऊस लांबला : खरिपात फेरबदलाची शक्यता, उत्पादनात घट येण्याची भीती

संजय जेवडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी अपेक्षित आहे. मात्र, पाऊस न आल्याने कपाशी, मूग, उडीद पिकाची पेरणी संकटात आली आहे. जुलैमध्ये पेरणी झाल्यास मूग, उडिदाच्या उत्पादनात घट होते, तर उशिराने पेरणी झाल्यास कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, असे शेतकऱ्यांचे निरीक्षण आहे. जिल्ह्यात ३३ हजार हेक्टर क्षेत्रावर मूग, ३० हजार हेक्टर क्षेत्रावर उडीद व सर्वाधिक २ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा प्रस्तावित आहे. मान्सून लांबल्याने कपाशी, मूग व उडिदाच्या २.९१ लाख हेक्टर क्षेत्रातील पेरणी संकटात आली आहे. जिल्ह्यात १ ते २१ जूनदरम्यान १०२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ ९.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याचवेळी ६१ मिमी पाऊस कोसळला होता.मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्यास कापूस, मूग, उडीद पीक पेरणीवर परिणाम होऊन क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. असे असले तरी २ जुलैपर्यंत पावसाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरही पाऊस न आल्यास पिकात फेरबदल करावे लागणार असून, कपाशीचे सरळ, सुधारित वाण पेरणीसाठी योग्य राहील, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. सोयाबीनला भाव नसल्याने यंदा कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता होती. मात्र, २१ जूनअखेर पाऊस न आल्याने कापसाचा पेरा लांबला आहे.खरीप हंगामात कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांची पेरणी साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. तथापि, जिल्ह्यात यंदा जून महिन्याचा तिसरा आठवडा संपला तरी पाऊस आला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी ७ जून रोजी मृग नक्षत्र सुरू झाले. २२ जूनपर्यंत हे नक्षत्र राहील. ३० जूनपर्यंत दीड नक्षत्र संपलेले असेल. तोपर्यंत जर मान्सून आला नाही, तर शेतकºयांना पिकात बदल करावे लागणार आहेत. मागील काही वर्षांत मूग, उडीद पिकाचे क्षेत्र घटले आहे. यावर्षी मान्सून वेळेवर येईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. परंतु, अद्याप मान्सून पोहोचला नाही. त्याचा परिणाम जलसाठ्यावरही होणार आहे.पाऊस लांबल्याने कपाशी, मूग व उडिदाचा पेरा कमी होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कपाशीच्या पेरणीस उशीर झाल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. खरिपासोबतच संत्र्यांचा अंबिया बहर धोक्यात आहे.- वसंतराव कडू,शेतकरी, येणससाधारणत: जूनच्या दुसºया आठवड्यात पेरणी झाल्यास उत्पादन बरे होते. मात्र, तिसरा आठवडा संपत असताना पावसाचा मागमूस नाही. कपाशी, मूग व उडिदाची पेरणी यामुळे संकटात आली आहे.- पद्माकर भेंडे,शेतकरी, पहूरधोंडी धोंडी पाणी दे : पावसाळ्याचा महिना असूनही हवा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकºयांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. सोयाबीन, मूग, तूर, पऱ्हाटी या पिकांसह सर्वच खरीप पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. त्याअनुषंगाने वरुणराजाला साकडे घालण्यासाठी बुधवारी शेंदूरजनाघाट येथे धोंडी काढण्यात आली. ‘धोंडी धोंडी पाणी दे, साळ-माळ पिकू दे’ असे आवाहन करत युवा वर्गाने ज्येष्ठांच्या सोबतीने या परंपरेला उजाळा दिला

टॅग्स :Rainपाऊस