शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कपाशी, मूग, उडीद पेरणी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 22:14 IST

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी अपेक्षित आहे. मात्र, पाऊस न आल्याने कपाशी, मूग, उडीद पिकाची पेरणी संकटात आली आहे. जुलैमध्ये पेरणी झाल्यास मूग, उडिदाच्या उत्पादनात घट होते, तर उशिराने पेरणी झाल्यास कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, असे शेतकऱ्यांचे निरीक्षण आहे.

ठळक मुद्देपाऊस लांबला : खरिपात फेरबदलाची शक्यता, उत्पादनात घट येण्याची भीती

संजय जेवडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी अपेक्षित आहे. मात्र, पाऊस न आल्याने कपाशी, मूग, उडीद पिकाची पेरणी संकटात आली आहे. जुलैमध्ये पेरणी झाल्यास मूग, उडिदाच्या उत्पादनात घट होते, तर उशिराने पेरणी झाल्यास कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, असे शेतकऱ्यांचे निरीक्षण आहे. जिल्ह्यात ३३ हजार हेक्टर क्षेत्रावर मूग, ३० हजार हेक्टर क्षेत्रावर उडीद व सर्वाधिक २ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा प्रस्तावित आहे. मान्सून लांबल्याने कपाशी, मूग व उडिदाच्या २.९१ लाख हेक्टर क्षेत्रातील पेरणी संकटात आली आहे. जिल्ह्यात १ ते २१ जूनदरम्यान १०२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ ९.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याचवेळी ६१ मिमी पाऊस कोसळला होता.मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्यास कापूस, मूग, उडीद पीक पेरणीवर परिणाम होऊन क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. असे असले तरी २ जुलैपर्यंत पावसाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरही पाऊस न आल्यास पिकात फेरबदल करावे लागणार असून, कपाशीचे सरळ, सुधारित वाण पेरणीसाठी योग्य राहील, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. सोयाबीनला भाव नसल्याने यंदा कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता होती. मात्र, २१ जूनअखेर पाऊस न आल्याने कापसाचा पेरा लांबला आहे.खरीप हंगामात कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांची पेरणी साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. तथापि, जिल्ह्यात यंदा जून महिन्याचा तिसरा आठवडा संपला तरी पाऊस आला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी ७ जून रोजी मृग नक्षत्र सुरू झाले. २२ जूनपर्यंत हे नक्षत्र राहील. ३० जूनपर्यंत दीड नक्षत्र संपलेले असेल. तोपर्यंत जर मान्सून आला नाही, तर शेतकºयांना पिकात बदल करावे लागणार आहेत. मागील काही वर्षांत मूग, उडीद पिकाचे क्षेत्र घटले आहे. यावर्षी मान्सून वेळेवर येईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. परंतु, अद्याप मान्सून पोहोचला नाही. त्याचा परिणाम जलसाठ्यावरही होणार आहे.पाऊस लांबल्याने कपाशी, मूग व उडिदाचा पेरा कमी होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कपाशीच्या पेरणीस उशीर झाल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. खरिपासोबतच संत्र्यांचा अंबिया बहर धोक्यात आहे.- वसंतराव कडू,शेतकरी, येणससाधारणत: जूनच्या दुसºया आठवड्यात पेरणी झाल्यास उत्पादन बरे होते. मात्र, तिसरा आठवडा संपत असताना पावसाचा मागमूस नाही. कपाशी, मूग व उडिदाची पेरणी यामुळे संकटात आली आहे.- पद्माकर भेंडे,शेतकरी, पहूरधोंडी धोंडी पाणी दे : पावसाळ्याचा महिना असूनही हवा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकºयांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. सोयाबीन, मूग, तूर, पऱ्हाटी या पिकांसह सर्वच खरीप पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. त्याअनुषंगाने वरुणराजाला साकडे घालण्यासाठी बुधवारी शेंदूरजनाघाट येथे धोंडी काढण्यात आली. ‘धोंडी धोंडी पाणी दे, साळ-माळ पिकू दे’ असे आवाहन करत युवा वर्गाने ज्येष्ठांच्या सोबतीने या परंपरेला उजाळा दिला

टॅग्स :Rainपाऊस