शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
4
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
5
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
6
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
7
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
8
तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
9
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
10
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
11
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
12
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
13
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
14
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
15
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
16
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
17
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
18
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
19
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
20
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...

कपाशी, मूग, उडीद पेरणी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 22:14 IST

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी अपेक्षित आहे. मात्र, पाऊस न आल्याने कपाशी, मूग, उडीद पिकाची पेरणी संकटात आली आहे. जुलैमध्ये पेरणी झाल्यास मूग, उडिदाच्या उत्पादनात घट होते, तर उशिराने पेरणी झाल्यास कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, असे शेतकऱ्यांचे निरीक्षण आहे.

ठळक मुद्देपाऊस लांबला : खरिपात फेरबदलाची शक्यता, उत्पादनात घट येण्याची भीती

संजय जेवडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी अपेक्षित आहे. मात्र, पाऊस न आल्याने कपाशी, मूग, उडीद पिकाची पेरणी संकटात आली आहे. जुलैमध्ये पेरणी झाल्यास मूग, उडिदाच्या उत्पादनात घट होते, तर उशिराने पेरणी झाल्यास कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, असे शेतकऱ्यांचे निरीक्षण आहे. जिल्ह्यात ३३ हजार हेक्टर क्षेत्रावर मूग, ३० हजार हेक्टर क्षेत्रावर उडीद व सर्वाधिक २ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा प्रस्तावित आहे. मान्सून लांबल्याने कपाशी, मूग व उडिदाच्या २.९१ लाख हेक्टर क्षेत्रातील पेरणी संकटात आली आहे. जिल्ह्यात १ ते २१ जूनदरम्यान १०२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ ९.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याचवेळी ६१ मिमी पाऊस कोसळला होता.मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्यास कापूस, मूग, उडीद पीक पेरणीवर परिणाम होऊन क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. असे असले तरी २ जुलैपर्यंत पावसाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरही पाऊस न आल्यास पिकात फेरबदल करावे लागणार असून, कपाशीचे सरळ, सुधारित वाण पेरणीसाठी योग्य राहील, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. सोयाबीनला भाव नसल्याने यंदा कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता होती. मात्र, २१ जूनअखेर पाऊस न आल्याने कापसाचा पेरा लांबला आहे.खरीप हंगामात कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांची पेरणी साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. तथापि, जिल्ह्यात यंदा जून महिन्याचा तिसरा आठवडा संपला तरी पाऊस आला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी ७ जून रोजी मृग नक्षत्र सुरू झाले. २२ जूनपर्यंत हे नक्षत्र राहील. ३० जूनपर्यंत दीड नक्षत्र संपलेले असेल. तोपर्यंत जर मान्सून आला नाही, तर शेतकºयांना पिकात बदल करावे लागणार आहेत. मागील काही वर्षांत मूग, उडीद पिकाचे क्षेत्र घटले आहे. यावर्षी मान्सून वेळेवर येईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. परंतु, अद्याप मान्सून पोहोचला नाही. त्याचा परिणाम जलसाठ्यावरही होणार आहे.पाऊस लांबल्याने कपाशी, मूग व उडिदाचा पेरा कमी होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कपाशीच्या पेरणीस उशीर झाल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. खरिपासोबतच संत्र्यांचा अंबिया बहर धोक्यात आहे.- वसंतराव कडू,शेतकरी, येणससाधारणत: जूनच्या दुसºया आठवड्यात पेरणी झाल्यास उत्पादन बरे होते. मात्र, तिसरा आठवडा संपत असताना पावसाचा मागमूस नाही. कपाशी, मूग व उडिदाची पेरणी यामुळे संकटात आली आहे.- पद्माकर भेंडे,शेतकरी, पहूरधोंडी धोंडी पाणी दे : पावसाळ्याचा महिना असूनही हवा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकºयांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. सोयाबीन, मूग, तूर, पऱ्हाटी या पिकांसह सर्वच खरीप पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. त्याअनुषंगाने वरुणराजाला साकडे घालण्यासाठी बुधवारी शेंदूरजनाघाट येथे धोंडी काढण्यात आली. ‘धोंडी धोंडी पाणी दे, साळ-माळ पिकू दे’ असे आवाहन करत युवा वर्गाने ज्येष्ठांच्या सोबतीने या परंपरेला उजाळा दिला

टॅग्स :Rainपाऊस