शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पेढी कोपली; हाहाकार

By admin | Updated: July 12, 2016 01:12 IST

संततधार पावसामुळे जिल्ह्यातील महत्त्वांच्या नद्यांपैकी एक असलेल्या पेढीला रविवारी रात्री पूर आला. नया अकोला,

विस्कळीत : नया अकोला, वलगाव, थुगाव, रोहणखेडा, देवरा, फाजलापूर, दोनद, खानापूरला फटकाअमरावती : संततधार पावसामुळे जिल्ह्यातील महत्त्वांच्या नद्यांपैकी एक असलेल्या पेढीला रविवारी रात्री पूर आला. नया अकोला, वलगाव, थुगाव, रोहणखेडा, पर्वतापूर, देवरा, सावंगा, फाजलापूर, दोनद आणि खानापूर या गावांत नदी-नाल्यांनी थैमान घातले. नदीकाठच्या या सर्वच गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. आमदार यशोमती ठाकूर आणि जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सोमवारी पूरबाधित गावांना भेटी दिल्या. अमरावती व भातकुली तालुक्यातील एकूण १३२ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पुरामुळे अनेक घरी रविवारी व सोमवारी चुली पेटल्या नाहीत. धान्य ओले झाले. घरातील साहित्य वाहून गेले. गोठ्यातील जनावरांनाही पुराचा फटका बसला. प्रशासन नैसर्गिक आपत्तीवर यश मिळविण्यासाठी धडपडत असले तरी पुराच्या फटक्यानंतर आता महामारीचा मोठा धोका पुरबाधित लोकांसमोर उभा ठाकला आहे. पुरग्रस्त सर्वच गावांमध्ये तत्काळ प्रभावाने वैद्यकीय शिबिरे उघडण्याची नितांत आवश्यकता आहे. जंतूनाशक औषधांची फवारणी आणि डस्टींग वृत्त लिहिस्तोवर करण्यात आलेली नव्हती. पुरबाधित गावांमधील वृद्ध, अपंग आणि लहान मुलांसाठी आवश्यक त्या विशिष्ट सुविधा आरंभण्यात आलेल्या नव्हत्या. सर्वत्र दूषित वातावरण असल्याने डायरियाचा त्रास गावकऱ्यांना सुरु झाला आहे. गाद्या, कपडे ओलेचिंब झाल्याने गावकऱ्यांचे थंडीने हाल होत आहेत. पाच तालुक्यात अतिवृष्टी: पाच तालुक्यातील २५ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने नदीनाल्यांना पूर आला आहे. खोलगट भागात पाणी शिरल्याने ३०० च्या वर कुटूंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. ५ हजारांवर हेक्टरमधील शेतीत पाणी साचल्याने पिके धोक्यात आलेली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५५.८ मि.मी. पाऊस पडला. यामध्ये अचलपूर ९३.२ मिमी, दर्यापुर ८०.३, अंजनगांव सुर्जी ७९ मिमी, धारणी ७२ मिमी व चिखलदरा तालुक्यात १७२.२ मिमी पाऊस पडला. ६५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस असल्याने ही अतिवृष्टी समजण्यात येते. या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्या दुथडी भरुन वाहत आहे. भातकुली तालुक्यात रविवारी सायंकाळी पेढी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने सावंगा, देवरा, फाजलापूर व जावरा या गावांचा संपर्क तुटला होता. नया अकोला, वलगांव, खानापूर, थुगांव,दोनद, पर्वतापूर रोहनखेड्यात पाणी शिरले.