शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

पीकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 22:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रधानमंत्री पीकविमा योजना २०१७-१८ मधील (खरीप हंगाम) अंतर्गत भातकुली, तिवसा, मोर्शी व अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित लाभ द्यावा, अशी मागणी मंगळवारी आ. यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.तिवसा मतदारसंघातील ...

ठळक मुद्देकाँग्रेसची जिल्हा कचेरीवर धडक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रधानमंत्री पीकविमा योजना २०१७-१८ मधील (खरीप हंगाम) अंतर्गत भातकुली, तिवसा, मोर्शी व अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित लाभ द्यावा, अशी मागणी मंगळवारी आ. यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.तिवसा मतदारसंघातील भातकुली, अमरावती व तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन २०१७-१८ मधील खरीप हंगामातील पिकांकरिता प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत विम्याची रक्कम भरलेली असतानाही ५ वर्षांचे उत्पन्न आधारित उंबरठा उत्पन्नामुळे वरील तालुक्यातील महसूल मंडळे वगळल्यामुळे विमा रक्कम मिळाली नाही. तालुकानिहाय वगळलेल्या मंडळामध्ये भातकुली तालुक्यातील : आष्टी, खोलापूर, पूर्णानगर, तिवसातील कुऱ्हा, मोझरी, वऱ्हा, तिवसा, वरखेड, अमरावती तालुक्यातील डवरगाव, माहुली, जहागीर, शिराळा, वलगाव, मोर्शीतील नेरपिंगळाई, शिरखेड, धामणगावचा समावेश आहे. तालुकानिहाय शेतकऱ्यांनी पीकनिहाय रक्कम भरूनही विमा लागू झाला नाही. आणेवारी ५० पैशाचे आत असल्याने महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांना पिकाच्या विमा कंपनीकडून विम्याची योग्य रक्कम तत्काळ मिळावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी केली आहे. यावेळी झेडपी सभापती जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, शेखर औगड, दिलीप म्हस्के, अभिजित बोके, वैभव वानखडे, वीरेंद्रसिंह जाधव, प्रकाश माहोरे, दिलीप देशमुख आदी उपस्थित होते.