शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

शाळा आरोग्य केंद्राची अचानकच होणार झाडाझडती

By admin | Updated: November 3, 2016 00:23 IST

जिल्हा परिषद शाळा, आरोग्य केंद्र व अन्य ठिकाणी मिनीमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन ...

विभागीय आयुक्तांचे आदेश : अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्जअमरावती : जिल्हा परिषद शाळा, आरोग्य केंद्र व अन्य ठिकाणी मिनीमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन तेथील परिस्थितीची व सोई-सुविधेची तपासणी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी मागील महिन्यात जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार आता याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सुरू केली आहे.जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या १४ पंचायत समितीसह जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, आयुर्वेदिक दवाखाने, ग्रामपंचायती, अशा विविध संस्था येतात. या अंतर्गत विकास कामे, शासकीय योजना, शिक्षण, नागरी आरोग्य सोई सुविधा अशा योजनाची अंमलबजावणी व त्यासाठीचे प्रशासकीय कामकाज केले जाते. मात्र बरेचवेळा शासकीय निधी, विकासकामे, अन्य प्रशासकीय कामकाजात उणिवा दिसून येतात. तशा तक्रारीहीसुध्दा मुख्य कार्यालयाकडे येतात. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्यालय ते ग्रामस्तरावर असलेल्या ग्रामपंचायती, शाळा, आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने अशा ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन परिस्थिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यापूर्वीसुध्दा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख अधिकारी यांच्याकडून अचानक भेटीचा कार्यक्रम राबविला जात होता. मात्र यात मध्यंतरी खंड पडल्याने अचानक भेटीचा कार्यक्रम अर्ध्यावरच थांबला आहे. त्यामुळे यावर जिल्हा परिषद प्रशासनाचे प्रमुख म्हणून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटीच्या कार्यक्रमावर अधिक भर देण्याचा सल्ला या बैठकीत विभागीय आयुक्त यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यानुसार आता जिल्हा परिषदेने या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जोरदार तयारी सुरू केल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)दप्तराचे ओझे कायम दफ्तरांचे ओझे हा विषय विद्यार्थ्यांसोबतच पालकांसाठीही चांगलाच डोकेदुखी ठरत आहे. काही संघटनांनी दफ्तरांचे हे ओझे कमी करण्याच्या मागणीचा वेळोवेळी पाठपुरावा केला. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. अधिकारी कधीही शाळेत येतील आणि तपासणी करतील. त्यामुळे शाळा निश्चितच ओझे कमी करण्यासाठी धोरण ठरवतील. परिणामी विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना ही अपेक्षाही फोल ठरली आहे.