शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जामठीच्या शिक्षकांनी जपला सावित्रीचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 22:04 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी रानोरान भटकंती करणाऱ्या मेंढपाळाच्या कुटुंबासाठी सुरू करण्यात आलेल्या जामठी येथील शाळेचे रूपडे पालटले आहे. झोपडीत सुरू झालेल्या या शाळेच्या माध्यमातून अक्षरे गिरविण्यापासून कोसोदूर असलेल्या येथील चिमुकल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्कार्य येथील शिक्षकांनी केले. त्यांनी सावित्रीचा वसा जपला.

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले जयंती विशेष : शाळाबाह्य विद्यार्थ्यांना आणले शिक्षणाच्या प्रवाहात

संजय जेवडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : पोटाची खळगी भरण्यासाठी रानोरान भटकंती करणाऱ्या मेंढपाळाच्या कुटुंबासाठी सुरू करण्यात आलेल्या जामठी येथील शाळेचे रूपडे पालटले आहे. झोपडीत सुरू झालेल्या या शाळेच्या माध्यमातून अक्षरे गिरविण्यापासून कोसोदूर असलेल्या येथील चिमुकल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्कार्य येथील शिक्षकांनी केले. त्यांनी सावित्रीचा वसा जपला.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जामठी या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ही कहाणी. गावाची लोकसंख्या २२५ आणि कुटुंबसंख्या ७५ च्या आसपास. येथील ९५ टक्के नागरिक धनगर समाजाचे असून, मेंढीपालन हा त्यांच्या उपजीविकेचा मोठा आधार. त्यामुळे पाठीवर बिºहाड घेऊन गावोगावी फिरणे आलेच. मुलाबाळांना घेऊन चराईसाठी जागा मिळेल तेथे त्यांचा बेडा असतो. मग त्यांच्या मुला-मुलींना कुठले शिक्षण? मात्र, शिक्षकांनी त्यावरही उपाय शोधून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. २०१० मध्ये येथे जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळेला सुरुवात झाली. इमारत नसल्याने गुरांचा गोठा हीच शाळेची इमारत होती. त्यावेळी हजेरीपटावर मुलांची संख्या ४५ असली तरी प्रत्यक्षात १९ विद्यार्थी शाळेत दिसायचे. तत्कालीन शिक्षक व विद्यमान मुख्याध्यापक उमेश मारोतराव शिंदे यांनी शोध घेतला तेव्हा बहुतांश मुले बेड्यावर आढळले. त्यांनी या पालकांना विश्वास दिला आणि घरी असलेल्या आजी-आजोबांच्या भरवशावर त्यांना सोडण्याची विनंती केली. त्यांची धडपड पाहून पालकांना शिक्षणाचे महत्त्व कळले. शिंदे हे बेड्यावरून या मुलांना शाळेत घेऊन आले आणि त्यावेळी या मुलांच्या राहण्याची, भोजनाची, आरोग्याची जबाबदारीही स्वीकारली. यासाठी शाळेतील सहायक शिक्षक अलका राजेंद्र नेरकर यांची त्यांना मोलाची साथ लाभली.शाळाबाह्य असलेली ही मुले आता शिक्षणाच्या प्रवाहात आली असून, येथील विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच डिजिटल क्लासरूमसारख्या आधुनिक शैक्षणिक सुविधेसोबत शिक्षण घेत आहेत.आर्थिक, सामाजिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाºया विद्यार्थ्यांप्रति शिक्षकांची तळमळ हेच जामठीच्या शाळेचे यश आहे. या शिक्षकांमुळेच आजही सावित्रीबार्इंचा वसा जपला जात आहे.- प्रवीण खांडेकर, गटशिक्षणाधिकारी, पं.स.अनेक पिढ्यांपासून रानोरान फिरत तेथेच वास्तव्य करीत होतो. पण, या शाळेमुळे आमची मुले शिकू लागली आहेत. येथील शिक्षक घरोघरी फिरून मुले शाळेत आणतात आणि त्यांची सर्व काळजी घेतात.- सुखाभाऊ टेळे, माजी सरपंच, जामगाव (जामठी)