शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

जळगाव आर्वीची एमआयडीसी दलालांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST

स्थानिक युवक रोजगारापासून वंचित शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : आपल्या मुलांना तालुक्यात येणाऱ्या उद्योगात नोकरी मिळेल, ...

स्थानिक युवक रोजगारापासून वंचित

शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : आपल्या मुलांना तालुक्यात येणाऱ्या उद्योगात नोकरी मिळेल, त्यांचे भविष्य सुखात जाईल, या आशेने २७ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी ७५ हेक्टर जमीन जळगाव आर्वी एमआयडीसीला दिली. मात्र, जवाहर सहकारी सूतगिरणी वगळता एकही मोठा उद्योग येथे आला नाही. येथील आठ ते दहा प्लाॅट दलालांच्या घशात अडकल्याची धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे.

नागपूर- मुंबई मध्य रेल्वेमार्गावर शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर तीन हजार लोकवस्तीचे जळगाव आर्वी गाव आहे. तेथे सार्वजनिक ई-क्लास जमीन आहे. २७ वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ ९९.३३ हेक्‍टर जमीन उद्योगांसाठी संपादित केली. गावात उद्योग आल्यास आपल्या मुलांना नोकरी मिळेल, या आशेने या परिसरातील शेतकऱ्यांनी अल्प किमतीत ७५ हेक्टर जमीन या उद्योग मंडळात दिली यात ३२ हजार स्क्वेअर मीटर मध्ये येथे जवाहर सहकारी सूतगिरणी यांनी आपला उद्योग सुरू केला जवाहर सहकारी सूतगिरणीचे मार्गदर्शक दत्ता मेघे, अध्यक्ष सागर मेघे, उपाध्यक्ष विजय उगले यांच्या पुढाकारामुळे या भागात शेतकऱ्यांचे मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना अशा जवळपास १४०० जणांना रोजगार मिळाला. मात्र, उर्वरित जमिनीत उद्योग येण्याऐवजी दलालांनी आपल्या घशात टाकल्याचे चित्र आहे.

रोजगाराची स्थिती बिकट

धामणगाव तालुक्याची लोकसंख्या १ लाख ४४,५८९ आहे. दरवर्षी माध्यमिक शाळेतून आठशेच्या वर विद्यार्थी उत्तीर्ण होतात कनिष्ठ महाविद्यालयातनू सातशे विद्यार्थी पुढील शिक्षण घेतात आयटीआय मधून प्रमाणपत्र घेऊन तीनशे विद्यार्थी बाहेर पडतात पदवीधरांची संख्या दरवर्षी दोनशेच्या आकड्याने वाढत आहे. बीएड, कृषी पदवीधारक त्यांची संख्या वर्षाला ८५ च्या आकड्याने वाढत आहे. सात वर्षात केवळ ३७ युवकांना शासकीय नोकरी मिळाली आहे. दरवर्षी बेरोजगारीच्या टक्केवारीत वाढ होत आहे. व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या एक टक्का शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना पुण्या मुंबईत नोकरी मिळाली मात्र बी.एड., एम.एस्सी. या पदवीधारकांना नोकरी मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. बेरोजगारांना शिक्षणाचा फायदा व्हावा स्वतःच्या पायावर उभे राहावे म्हणून शासनाने काही योजना अमलात आणल्यात. परंतु तालुक्‍यात या योजनेचा बोजवारा उडाला आहे. श्रावणबाळ अर्थ सहाय्य योजनेतून वृद्धांना महिन्याकाठी एक हजार मिळते. परंतु लाख रुपये शिक्षणासाठी खर्च करून रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही, ही तालुक्याची वस्तुस्थिती आहे.

प्राथमिक करारनाम्याने केला घात

औद्योगिक महामंडळ यांनी संपादित केलेल्या जमिनीतील प्लांट मिळण्यासाठी प्रथम अर्ज करावा लागतो. येथील प्लाॅट प्राप्त झाल्यानंतर पाच वर्षांचा प्राथमिक करारनामा करण्यात येतो. ज्या गरजूंनी येथे प्लॉट घेतला, त्या प्लॉटवर बांधकाम सुरू असल्याचे लेखी करारनामा दिले. मात्र, तेथे कोणतेही काम सुरू नसल्याचे वास्तव समोर आले आहे. या भागातील बेरोजगारांना व गरजूंना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या दराप्रमाणे उपलब्ध जागा करून देण्याची मागणी जळगाव आर्वी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.