शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

जळगाव आर्वीची एमआयडीसी दलालांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST

स्थानिक युवक रोजगारापासून वंचित शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : आपल्या मुलांना तालुक्यात येणाऱ्या उद्योगात नोकरी मिळेल, ...

स्थानिक युवक रोजगारापासून वंचित

शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : आपल्या मुलांना तालुक्यात येणाऱ्या उद्योगात नोकरी मिळेल, त्यांचे भविष्य सुखात जाईल, या आशेने २७ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी ७५ हेक्टर जमीन जळगाव आर्वी एमआयडीसीला दिली. मात्र, जवाहर सहकारी सूतगिरणी वगळता एकही मोठा उद्योग येथे आला नाही. येथील आठ ते दहा प्लाॅट दलालांच्या घशात अडकल्याची धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे.

नागपूर- मुंबई मध्य रेल्वेमार्गावर शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर तीन हजार लोकवस्तीचे जळगाव आर्वी गाव आहे. तेथे सार्वजनिक ई-क्लास जमीन आहे. २७ वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ ९९.३३ हेक्‍टर जमीन उद्योगांसाठी संपादित केली. गावात उद्योग आल्यास आपल्या मुलांना नोकरी मिळेल, या आशेने या परिसरातील शेतकऱ्यांनी अल्प किमतीत ७५ हेक्टर जमीन या उद्योग मंडळात दिली यात ३२ हजार स्क्वेअर मीटर मध्ये येथे जवाहर सहकारी सूतगिरणी यांनी आपला उद्योग सुरू केला जवाहर सहकारी सूतगिरणीचे मार्गदर्शक दत्ता मेघे, अध्यक्ष सागर मेघे, उपाध्यक्ष विजय उगले यांच्या पुढाकारामुळे या भागात शेतकऱ्यांचे मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना अशा जवळपास १४०० जणांना रोजगार मिळाला. मात्र, उर्वरित जमिनीत उद्योग येण्याऐवजी दलालांनी आपल्या घशात टाकल्याचे चित्र आहे.

रोजगाराची स्थिती बिकट

धामणगाव तालुक्याची लोकसंख्या १ लाख ४४,५८९ आहे. दरवर्षी माध्यमिक शाळेतून आठशेच्या वर विद्यार्थी उत्तीर्ण होतात कनिष्ठ महाविद्यालयातनू सातशे विद्यार्थी पुढील शिक्षण घेतात आयटीआय मधून प्रमाणपत्र घेऊन तीनशे विद्यार्थी बाहेर पडतात पदवीधरांची संख्या दरवर्षी दोनशेच्या आकड्याने वाढत आहे. बीएड, कृषी पदवीधारक त्यांची संख्या वर्षाला ८५ च्या आकड्याने वाढत आहे. सात वर्षात केवळ ३७ युवकांना शासकीय नोकरी मिळाली आहे. दरवर्षी बेरोजगारीच्या टक्केवारीत वाढ होत आहे. व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या एक टक्का शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना पुण्या मुंबईत नोकरी मिळाली मात्र बी.एड., एम.एस्सी. या पदवीधारकांना नोकरी मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. बेरोजगारांना शिक्षणाचा फायदा व्हावा स्वतःच्या पायावर उभे राहावे म्हणून शासनाने काही योजना अमलात आणल्यात. परंतु तालुक्‍यात या योजनेचा बोजवारा उडाला आहे. श्रावणबाळ अर्थ सहाय्य योजनेतून वृद्धांना महिन्याकाठी एक हजार मिळते. परंतु लाख रुपये शिक्षणासाठी खर्च करून रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही, ही तालुक्याची वस्तुस्थिती आहे.

प्राथमिक करारनाम्याने केला घात

औद्योगिक महामंडळ यांनी संपादित केलेल्या जमिनीतील प्लांट मिळण्यासाठी प्रथम अर्ज करावा लागतो. येथील प्लाॅट प्राप्त झाल्यानंतर पाच वर्षांचा प्राथमिक करारनामा करण्यात येतो. ज्या गरजूंनी येथे प्लॉट घेतला, त्या प्लॉटवर बांधकाम सुरू असल्याचे लेखी करारनामा दिले. मात्र, तेथे कोणतेही काम सुरू नसल्याचे वास्तव समोर आले आहे. या भागातील बेरोजगारांना व गरजूंना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या दराप्रमाणे उपलब्ध जागा करून देण्याची मागणी जळगाव आर्वी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.