शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

आधी पावसाचा नव्हता पत्ता, आता दराचा संत्र्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:16 IST

वरूड : चांगली लगडलेली फळे भरघोस उत्पन्न देणार अशी शक्यता व्यक्त होत असताना आधी कोरड्या हवामानाने मृग बहराच्या संत्रा ...

वरूड : चांगली लगडलेली फळे भरघोस उत्पन्न देणार अशी शक्यता व्यक्त होत असताना आधी कोरड्या हवामानाने मृग बहराच्या संत्रा फळांना गळती लागली. आता अतिवृष्टीचा संत्र्याच्या बहराला फटका बसत आहे. बाजारात फळांचे दर तेजीत असले तरी व्यापारी स्वस्तात फळे गोळा करीत आहेत. या आतबट्ट्याच्या व्यवहारामुळे हजारोंचा पोशिंदा असलेला संत्राउत्पादक शेतकरी आता शून्यात हरवला आहे.

वरुड तालुका संत्र्यामुळे देशभरात ओळखला जातो. ४०० ते ५०० कोटी रुपयांची उलाढाल संत्रा व्यवसायातून तालुक्यात होत असते. २१ हजार ५०० हेक्टर शेतजमिनीमध्ये संत्री आणि ३ हजार ७९० हेक्टर मध्ये मोसंबीचे पीक आहे. संत्रा उत्पादक शेतकरी आंबिया आणि मृग बहाराची अशी दोन पीक घेतात. डिसेंबर ते जानेवारीमध्ये पाणी सोडले जाऊन आंबिया बहाराचे पीक घेतले ज़ाते, तर जून-जुलैमध्ये पावसाळ्याचे पाणी आल्यावर मृग बहराची पीक घेतली जातात. यावर्षी आंबिया बहाराचे पीक चांगले, तर मृग बहर ४० टक्केच आला आहे. आंबिया बहराला सुरुवातीला पावसाच्या दडीने फटका बसला. आता अतिपावसाचा फटका बसल्याने संत्री जमीनदोस्त होऊ लागला आहे. ३० ते ४० टक्के संत्री गळती झाली असून व्यापाऱ्यांनीसुद्धा पाठ फिरविली आहे. दोन ते तीन हजार रुपये प्रति हजार फळाला भाव मिळत आहे.

-------------------

बाजार समितीत ४० मंडई

देशाच्या कानाकोपऱ्यासह बांगलादेश, दुबई येथेसुद्धा संत्री पाठविली जातात. बाजार समितीच्या संत्रा यार्डमध्ये ४० मंडई आहेत, तर बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात पॅकिंग सेंटर आणि फळ ग्रेडिंग केंद्र आहे. शेकडो ट्रक संत्री दिल्ली, आग्रा, लुधियाना, पंजाब, केरळ, मुंबई, तामीलनाडू आदी परप्रांतातील बाजारपेठेत येथून पाठविली जातात.

--------------------

सुरुवातीला पाऊस आला नाही म्हणून तापमानाने, तर आता अतिपावसामुळे ४० टक्के संत्री गळाली आहेत. संत्रा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. शासनाने प्रक्रिया उद्योग सुरू केल्यासच संत्राला सुगीचे दिवस येतील.

- उद्धव फुटाणे, संत्रा उत्पादक, तिवसाघाट

-------------------

आंबिया बहराचे संत्रा पीक चांगले असले तरी फळे हिरवी असल्याने खाण्यायोग्य झाली नाहीत. तर बांगलादेशने निर्यात कर वाढविल्याने संत्र्याला भाव कमी मिळत आहेत. दोन ते तीन हजार रुपये प्रति हजार दराने संत्री खरेदी होत आहे. यातच अतिपावसामुळे बुरशीजन्य आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- जावेदखान पठाण, संत्रा व्यापारी, वरूड