शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आधी पावसाचा नव्हता पत्ता, आता दराचा संत्र्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:16 IST

वरूड : चांगली लगडलेली फळे भरघोस उत्पन्न देणार अशी शक्यता व्यक्त होत असताना आधी कोरड्या हवामानाने मृग बहराच्या संत्रा ...

वरूड : चांगली लगडलेली फळे भरघोस उत्पन्न देणार अशी शक्यता व्यक्त होत असताना आधी कोरड्या हवामानाने मृग बहराच्या संत्रा फळांना गळती लागली. आता अतिवृष्टीचा संत्र्याच्या बहराला फटका बसत आहे. बाजारात फळांचे दर तेजीत असले तरी व्यापारी स्वस्तात फळे गोळा करीत आहेत. या आतबट्ट्याच्या व्यवहारामुळे हजारोंचा पोशिंदा असलेला संत्राउत्पादक शेतकरी आता शून्यात हरवला आहे.

वरुड तालुका संत्र्यामुळे देशभरात ओळखला जातो. ४०० ते ५०० कोटी रुपयांची उलाढाल संत्रा व्यवसायातून तालुक्यात होत असते. २१ हजार ५०० हेक्टर शेतजमिनीमध्ये संत्री आणि ३ हजार ७९० हेक्टर मध्ये मोसंबीचे पीक आहे. संत्रा उत्पादक शेतकरी आंबिया आणि मृग बहाराची अशी दोन पीक घेतात. डिसेंबर ते जानेवारीमध्ये पाणी सोडले जाऊन आंबिया बहाराचे पीक घेतले ज़ाते, तर जून-जुलैमध्ये पावसाळ्याचे पाणी आल्यावर मृग बहराची पीक घेतली जातात. यावर्षी आंबिया बहाराचे पीक चांगले, तर मृग बहर ४० टक्केच आला आहे. आंबिया बहराला सुरुवातीला पावसाच्या दडीने फटका बसला. आता अतिपावसाचा फटका बसल्याने संत्री जमीनदोस्त होऊ लागला आहे. ३० ते ४० टक्के संत्री गळती झाली असून व्यापाऱ्यांनीसुद्धा पाठ फिरविली आहे. दोन ते तीन हजार रुपये प्रति हजार फळाला भाव मिळत आहे.

-------------------

बाजार समितीत ४० मंडई

देशाच्या कानाकोपऱ्यासह बांगलादेश, दुबई येथेसुद्धा संत्री पाठविली जातात. बाजार समितीच्या संत्रा यार्डमध्ये ४० मंडई आहेत, तर बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात पॅकिंग सेंटर आणि फळ ग्रेडिंग केंद्र आहे. शेकडो ट्रक संत्री दिल्ली, आग्रा, लुधियाना, पंजाब, केरळ, मुंबई, तामीलनाडू आदी परप्रांतातील बाजारपेठेत येथून पाठविली जातात.

--------------------

सुरुवातीला पाऊस आला नाही म्हणून तापमानाने, तर आता अतिपावसामुळे ४० टक्के संत्री गळाली आहेत. संत्रा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. शासनाने प्रक्रिया उद्योग सुरू केल्यासच संत्राला सुगीचे दिवस येतील.

- उद्धव फुटाणे, संत्रा उत्पादक, तिवसाघाट

-------------------

आंबिया बहराचे संत्रा पीक चांगले असले तरी फळे हिरवी असल्याने खाण्यायोग्य झाली नाहीत. तर बांगलादेशने निर्यात कर वाढविल्याने संत्र्याला भाव कमी मिळत आहेत. दोन ते तीन हजार रुपये प्रति हजार दराने संत्री खरेदी होत आहे. यातच अतिपावसामुळे बुरशीजन्य आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- जावेदखान पठाण, संत्रा व्यापारी, वरूड