शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आधी पावसाचा नव्हता पत्ता, आता दराचा संत्र्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:16 IST

वरूड : चांगली लगडलेली फळे भरघोस उत्पन्न देणार अशी शक्यता व्यक्त होत असताना आधी कोरड्या हवामानाने मृग बहराच्या संत्रा ...

वरूड : चांगली लगडलेली फळे भरघोस उत्पन्न देणार अशी शक्यता व्यक्त होत असताना आधी कोरड्या हवामानाने मृग बहराच्या संत्रा फळांना गळती लागली. आता अतिवृष्टीचा संत्र्याच्या बहराला फटका बसत आहे. बाजारात फळांचे दर तेजीत असले तरी व्यापारी स्वस्तात फळे गोळा करीत आहेत. या आतबट्ट्याच्या व्यवहारामुळे हजारोंचा पोशिंदा असलेला संत्राउत्पादक शेतकरी आता शून्यात हरवला आहे.

वरुड तालुका संत्र्यामुळे देशभरात ओळखला जातो. ४०० ते ५०० कोटी रुपयांची उलाढाल संत्रा व्यवसायातून तालुक्यात होत असते. २१ हजार ५०० हेक्टर शेतजमिनीमध्ये संत्री आणि ३ हजार ७९० हेक्टर मध्ये मोसंबीचे पीक आहे. संत्रा उत्पादक शेतकरी आंबिया आणि मृग बहाराची अशी दोन पीक घेतात. डिसेंबर ते जानेवारीमध्ये पाणी सोडले जाऊन आंबिया बहाराचे पीक घेतले ज़ाते, तर जून-जुलैमध्ये पावसाळ्याचे पाणी आल्यावर मृग बहराची पीक घेतली जातात. यावर्षी आंबिया बहाराचे पीक चांगले, तर मृग बहर ४० टक्केच आला आहे. आंबिया बहराला सुरुवातीला पावसाच्या दडीने फटका बसला. आता अतिपावसाचा फटका बसल्याने संत्री जमीनदोस्त होऊ लागला आहे. ३० ते ४० टक्के संत्री गळती झाली असून व्यापाऱ्यांनीसुद्धा पाठ फिरविली आहे. दोन ते तीन हजार रुपये प्रति हजार फळाला भाव मिळत आहे.

-------------------

बाजार समितीत ४० मंडई

देशाच्या कानाकोपऱ्यासह बांगलादेश, दुबई येथेसुद्धा संत्री पाठविली जातात. बाजार समितीच्या संत्रा यार्डमध्ये ४० मंडई आहेत, तर बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात पॅकिंग सेंटर आणि फळ ग्रेडिंग केंद्र आहे. शेकडो ट्रक संत्री दिल्ली, आग्रा, लुधियाना, पंजाब, केरळ, मुंबई, तामीलनाडू आदी परप्रांतातील बाजारपेठेत येथून पाठविली जातात.

--------------------

सुरुवातीला पाऊस आला नाही म्हणून तापमानाने, तर आता अतिपावसामुळे ४० टक्के संत्री गळाली आहेत. संत्रा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. शासनाने प्रक्रिया उद्योग सुरू केल्यासच संत्राला सुगीचे दिवस येतील.

- उद्धव फुटाणे, संत्रा उत्पादक, तिवसाघाट

-------------------

आंबिया बहराचे संत्रा पीक चांगले असले तरी फळे हिरवी असल्याने खाण्यायोग्य झाली नाहीत. तर बांगलादेशने निर्यात कर वाढविल्याने संत्र्याला भाव कमी मिळत आहेत. दोन ते तीन हजार रुपये प्रति हजार दराने संत्री खरेदी होत आहे. यातच अतिपावसामुळे बुरशीजन्य आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- जावेदखान पठाण, संत्रा व्यापारी, वरूड