शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

सालदार मिळणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:12 IST

लॉकडाऊनचा फटका : पीक परिस्थिती जेमतेमच कावली वसाड : सलगच्या काही वर्षांमध्ये शेतीमध्ये उत्पादन कमी होत असल्याने शेतकºयांना सालदार ...

लॉकडाऊनचा फटका : पीक परिस्थिती जेमतेमच

कावली वसाड : सलगच्या काही वर्षांमध्ये शेतीमध्ये उत्पादन कमी होत असल्याने शेतकºयांना सालदार मिळणे कठीण झाले आहे. कमी पैशात सालदार मिळणे शेतकºयांना कढीण झाल्याने शेतीच्या मशागतीला मर्यादा आल्या आहेत. तर सालदारांनी आपल्या वार्षिक मोबदल्यात वाढ केल्याने शेतकºयांच्या अडचणीतब भर पडली आहे.

ग्रामीण भागात शेतीची मशागत ही गुढीपाडवा या मराठी नववषार्पासून सुरुवात होते. शेतकरी आपल्या शेतात मशागतीला खºया अर्थाने या दिवसापासून सुरुवात करतात. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी असल्याने याच दिवसापासून आपल्या गुराढोरांचे व शेतीचे काम करण्यासाठी सालदार या दिवसापासून आपले साल मांडतात. ज्या शेतकºयांना बºयापैकी उत्पन्न होते, ते शेतकरी आपल्या सालकºयाला पैशाच्या रूपात व धान्य रूपात वार्षिक सालाची या दिवसापासून नोंदणी करतात. मात्र गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकºयांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी होत असल्याने सालदारांना मोबदला कसा द्यावा, या विचारात शेतकरी पडला आहे.

यावर्षी तालुक्यातील शेतकºयांना बºयापैकी उत्पादन झाले. ते उन्हाळी पिकेही घेत आहेत. त्यामुळे शेतीच्या कामासाठी सालदार ठेवला पाहिजे, या विचारात शेतकरी असताना सालदारांनी मात्र आपला वार्षिक मोबदल्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. सालदार जेव्हा आपले साल मांडण्याच्या विचारात असताना शेतकºयांपुढे किमान ८० हजार ते ८५ हजार इतका मोबदला मिळावा अशी अपेक्षा सालदारांनी व्यक्त केली आहे. तरी तो मोबदला देण्यासाठी शेतात अधिक उत्पादन शेतकरी काढत आहे. मात्र ग्रामीण भागात सालदार मिळणे ही मोठी समस्या झाल्याची शेतकरी सांगत आहे.

१५ ते २० हजारांची वाढ

ग्रामीण भागात खरिप व रबी हंगामातील शेतीकामासाठी मजुराला ३०० रुपये व महिला मजुराला २०० रुपये मजुरी दिली जाते. संपुर्ण महिनाभर काम केल्यास एका मजुराच्या घरी सरासरी ८ ते ९ हजार रुपये येतात. मात्र यंदा एैन हंगामाच्या वेळी अवकाळी बरसल्याने शेतकºयांसह मजुरांची मजुरी देखील बुडाली. त्यामुळे सालदारांनी आपला मेहनताना वाढवला असला तरी आज पर्यंत सालदारांना किमान बारा महिन्याचे ६० ते ६५ हजार रुपये इतका मोबदला दिला जात होता. त्यावेळेला त्यांना गुराढोरांचे कामे करावी लागत होते. आज शेतीची प्रत्येक कामे यंत्राच्या साह्याने होत असल्याने बैलजोडीची संख्याही कमी झाली आहे. त्यांचे काम कमी झाले. परंतु तरीही सालदार मोठ्या प्रमाणात मोबदला मागतात.