शहरं
Join us  
Trending Stories
1
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
2
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
3
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
4
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
6
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
7
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
8
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
9
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
10
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
11
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
12
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
13
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
14
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
15
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
16
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
17
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
18
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
19
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
20
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?

सालदार मिळणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:12 IST

लॉकडाऊनचा फटका : पीक परिस्थिती जेमतेमच कावली वसाड : सलगच्या काही वर्षांमध्ये शेतीमध्ये उत्पादन कमी होत असल्याने शेतकºयांना सालदार ...

लॉकडाऊनचा फटका : पीक परिस्थिती जेमतेमच

कावली वसाड : सलगच्या काही वर्षांमध्ये शेतीमध्ये उत्पादन कमी होत असल्याने शेतकºयांना सालदार मिळणे कठीण झाले आहे. कमी पैशात सालदार मिळणे शेतकºयांना कढीण झाल्याने शेतीच्या मशागतीला मर्यादा आल्या आहेत. तर सालदारांनी आपल्या वार्षिक मोबदल्यात वाढ केल्याने शेतकºयांच्या अडचणीतब भर पडली आहे.

ग्रामीण भागात शेतीची मशागत ही गुढीपाडवा या मराठी नववषार्पासून सुरुवात होते. शेतकरी आपल्या शेतात मशागतीला खºया अर्थाने या दिवसापासून सुरुवात करतात. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी असल्याने याच दिवसापासून आपल्या गुराढोरांचे व शेतीचे काम करण्यासाठी सालदार या दिवसापासून आपले साल मांडतात. ज्या शेतकºयांना बºयापैकी उत्पन्न होते, ते शेतकरी आपल्या सालकºयाला पैशाच्या रूपात व धान्य रूपात वार्षिक सालाची या दिवसापासून नोंदणी करतात. मात्र गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकºयांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी होत असल्याने सालदारांना मोबदला कसा द्यावा, या विचारात शेतकरी पडला आहे.

यावर्षी तालुक्यातील शेतकºयांना बºयापैकी उत्पादन झाले. ते उन्हाळी पिकेही घेत आहेत. त्यामुळे शेतीच्या कामासाठी सालदार ठेवला पाहिजे, या विचारात शेतकरी असताना सालदारांनी मात्र आपला वार्षिक मोबदल्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. सालदार जेव्हा आपले साल मांडण्याच्या विचारात असताना शेतकºयांपुढे किमान ८० हजार ते ८५ हजार इतका मोबदला मिळावा अशी अपेक्षा सालदारांनी व्यक्त केली आहे. तरी तो मोबदला देण्यासाठी शेतात अधिक उत्पादन शेतकरी काढत आहे. मात्र ग्रामीण भागात सालदार मिळणे ही मोठी समस्या झाल्याची शेतकरी सांगत आहे.

१५ ते २० हजारांची वाढ

ग्रामीण भागात खरिप व रबी हंगामातील शेतीकामासाठी मजुराला ३०० रुपये व महिला मजुराला २०० रुपये मजुरी दिली जाते. संपुर्ण महिनाभर काम केल्यास एका मजुराच्या घरी सरासरी ८ ते ९ हजार रुपये येतात. मात्र यंदा एैन हंगामाच्या वेळी अवकाळी बरसल्याने शेतकºयांसह मजुरांची मजुरी देखील बुडाली. त्यामुळे सालदारांनी आपला मेहनताना वाढवला असला तरी आज पर्यंत सालदारांना किमान बारा महिन्याचे ६० ते ६५ हजार रुपये इतका मोबदला दिला जात होता. त्यावेळेला त्यांना गुराढोरांचे कामे करावी लागत होते. आज शेतीची प्रत्येक कामे यंत्राच्या साह्याने होत असल्याने बैलजोडीची संख्याही कमी झाली आहे. त्यांचे काम कमी झाले. परंतु तरीही सालदार मोठ्या प्रमाणात मोबदला मागतात.