शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

सालदार मिळणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:12 IST

लॉकडाऊनचा फटका : पीक परिस्थिती जेमतेमच कावली वसाड : सलगच्या काही वर्षांमध्ये शेतीमध्ये उत्पादन कमी होत असल्याने शेतकºयांना सालदार ...

लॉकडाऊनचा फटका : पीक परिस्थिती जेमतेमच

कावली वसाड : सलगच्या काही वर्षांमध्ये शेतीमध्ये उत्पादन कमी होत असल्याने शेतकºयांना सालदार मिळणे कठीण झाले आहे. कमी पैशात सालदार मिळणे शेतकºयांना कढीण झाल्याने शेतीच्या मशागतीला मर्यादा आल्या आहेत. तर सालदारांनी आपल्या वार्षिक मोबदल्यात वाढ केल्याने शेतकºयांच्या अडचणीतब भर पडली आहे.

ग्रामीण भागात शेतीची मशागत ही गुढीपाडवा या मराठी नववषार्पासून सुरुवात होते. शेतकरी आपल्या शेतात मशागतीला खºया अर्थाने या दिवसापासून सुरुवात करतात. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी असल्याने याच दिवसापासून आपल्या गुराढोरांचे व शेतीचे काम करण्यासाठी सालदार या दिवसापासून आपले साल मांडतात. ज्या शेतकºयांना बºयापैकी उत्पन्न होते, ते शेतकरी आपल्या सालकºयाला पैशाच्या रूपात व धान्य रूपात वार्षिक सालाची या दिवसापासून नोंदणी करतात. मात्र गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकºयांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी होत असल्याने सालदारांना मोबदला कसा द्यावा, या विचारात शेतकरी पडला आहे.

यावर्षी तालुक्यातील शेतकºयांना बºयापैकी उत्पादन झाले. ते उन्हाळी पिकेही घेत आहेत. त्यामुळे शेतीच्या कामासाठी सालदार ठेवला पाहिजे, या विचारात शेतकरी असताना सालदारांनी मात्र आपला वार्षिक मोबदल्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. सालदार जेव्हा आपले साल मांडण्याच्या विचारात असताना शेतकºयांपुढे किमान ८० हजार ते ८५ हजार इतका मोबदला मिळावा अशी अपेक्षा सालदारांनी व्यक्त केली आहे. तरी तो मोबदला देण्यासाठी शेतात अधिक उत्पादन शेतकरी काढत आहे. मात्र ग्रामीण भागात सालदार मिळणे ही मोठी समस्या झाल्याची शेतकरी सांगत आहे.

१५ ते २० हजारांची वाढ

ग्रामीण भागात खरिप व रबी हंगामातील शेतीकामासाठी मजुराला ३०० रुपये व महिला मजुराला २०० रुपये मजुरी दिली जाते. संपुर्ण महिनाभर काम केल्यास एका मजुराच्या घरी सरासरी ८ ते ९ हजार रुपये येतात. मात्र यंदा एैन हंगामाच्या वेळी अवकाळी बरसल्याने शेतकºयांसह मजुरांची मजुरी देखील बुडाली. त्यामुळे सालदारांनी आपला मेहनताना वाढवला असला तरी आज पर्यंत सालदारांना किमान बारा महिन्याचे ६० ते ६५ हजार रुपये इतका मोबदला दिला जात होता. त्यावेळेला त्यांना गुराढोरांचे कामे करावी लागत होते. आज शेतीची प्रत्येक कामे यंत्राच्या साह्याने होत असल्याने बैलजोडीची संख्याही कमी झाली आहे. त्यांचे काम कमी झाले. परंतु तरीही सालदार मोठ्या प्रमाणात मोबदला मागतात.