शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

सालदार मिळणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:12 IST

लॉकडाऊनचा फटका : पीक परिस्थिती जेमतेमच कावली वसाड : सलगच्या काही वर्षांमध्ये शेतीमध्ये उत्पादन कमी होत असल्याने शेतकºयांना सालदार ...

लॉकडाऊनचा फटका : पीक परिस्थिती जेमतेमच

कावली वसाड : सलगच्या काही वर्षांमध्ये शेतीमध्ये उत्पादन कमी होत असल्याने शेतकºयांना सालदार मिळणे कठीण झाले आहे. कमी पैशात सालदार मिळणे शेतकºयांना कढीण झाल्याने शेतीच्या मशागतीला मर्यादा आल्या आहेत. तर सालदारांनी आपल्या वार्षिक मोबदल्यात वाढ केल्याने शेतकºयांच्या अडचणीतब भर पडली आहे.

ग्रामीण भागात शेतीची मशागत ही गुढीपाडवा या मराठी नववषार्पासून सुरुवात होते. शेतकरी आपल्या शेतात मशागतीला खºया अर्थाने या दिवसापासून सुरुवात करतात. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी असल्याने याच दिवसापासून आपल्या गुराढोरांचे व शेतीचे काम करण्यासाठी सालदार या दिवसापासून आपले साल मांडतात. ज्या शेतकºयांना बºयापैकी उत्पन्न होते, ते शेतकरी आपल्या सालकºयाला पैशाच्या रूपात व धान्य रूपात वार्षिक सालाची या दिवसापासून नोंदणी करतात. मात्र गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकºयांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी होत असल्याने सालदारांना मोबदला कसा द्यावा, या विचारात शेतकरी पडला आहे.

यावर्षी तालुक्यातील शेतकºयांना बºयापैकी उत्पादन झाले. ते उन्हाळी पिकेही घेत आहेत. त्यामुळे शेतीच्या कामासाठी सालदार ठेवला पाहिजे, या विचारात शेतकरी असताना सालदारांनी मात्र आपला वार्षिक मोबदल्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. सालदार जेव्हा आपले साल मांडण्याच्या विचारात असताना शेतकºयांपुढे किमान ८० हजार ते ८५ हजार इतका मोबदला मिळावा अशी अपेक्षा सालदारांनी व्यक्त केली आहे. तरी तो मोबदला देण्यासाठी शेतात अधिक उत्पादन शेतकरी काढत आहे. मात्र ग्रामीण भागात सालदार मिळणे ही मोठी समस्या झाल्याची शेतकरी सांगत आहे.

१५ ते २० हजारांची वाढ

ग्रामीण भागात खरिप व रबी हंगामातील शेतीकामासाठी मजुराला ३०० रुपये व महिला मजुराला २०० रुपये मजुरी दिली जाते. संपुर्ण महिनाभर काम केल्यास एका मजुराच्या घरी सरासरी ८ ते ९ हजार रुपये येतात. मात्र यंदा एैन हंगामाच्या वेळी अवकाळी बरसल्याने शेतकºयांसह मजुरांची मजुरी देखील बुडाली. त्यामुळे सालदारांनी आपला मेहनताना वाढवला असला तरी आज पर्यंत सालदारांना किमान बारा महिन्याचे ६० ते ६५ हजार रुपये इतका मोबदला दिला जात होता. त्यावेळेला त्यांना गुराढोरांचे कामे करावी लागत होते. आज शेतीची प्रत्येक कामे यंत्राच्या साह्याने होत असल्याने बैलजोडीची संख्याही कमी झाली आहे. त्यांचे काम कमी झाले. परंतु तरीही सालदार मोठ्या प्रमाणात मोबदला मागतात.