शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

‘इर्विन’ रूग्णालय बनले आजार उत्पत्ती केंद्र

By admin | Updated: July 14, 2014 00:38 IST

जिल्ह्याभरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणारे इर्विन

कर्मचारी, रूग्णांना बाधेचा धोका : संसर्गजन्य आजाराने ग्रासलेल्या रूग्णांचा मुक्त वावरवैभव बाबरेकर अमरावतीजिल्ह्याभरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणारे इर्विन रुग्णालय सद्यस्थितीत संसर्गजन्य आजारांच्या उत्पत्तीचे केंद्र बनले आहे. संसर्गजन्य आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांचा खुला वावर या रूग्णालयात दाखल इतर रूग्ण तसेच रूग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. याकडे आरोग्य प्रशासनाचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसते.जिल्ह्याच्या सीमा दिवसेंदिवस विस्तारत आहेत. राज्यभरातून रोजगारासाठी येथे येणाऱ्या लोकांमुळे लोकवस्ती दाट होत चालली आहे. प्रत्येकालाच शहरात हक्काचा निवारा मिळत नाही. घरे भाड्याने घेण्याची प्रत्येकाचीच कुवत नसते. त्यामुळे कित्येक लोक उघड्यावरच बस्तान मांडतात. शहरातील रेल्वे स्थानक, बसस्थानकासह अलीकडे शासकीय रुग्णालयदेखील भिकाऱ्यांचे आश्रयस्थान बनल्याचे दिसते.जिल्हा सामान्य रूग्णालयात मोफतचे अन्न आणि बिनभाड्याचा निवारा मिळत असल्याने हजारो गोरगरीब रुग्ण उपचाराच्या नावाखाली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होतात. यातील अनेक जण विविध प्राणघातक संसर्गजन्य आजारांनी ग्रासलेले असतात. टी.बी. आणि त्वचारोगांनी ग्रासलेल्या रूग्णांची संख्या यामध्ये अधिक असते. संसर्गजन्य आजारांनी ग्रासलेले हे रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या परिसरात व आतील वॉर्डांमध्येसुध्दा बिनधास्त अनिर्बंध फिरत असतात. त्यामुळे रूग्णालयात इतर आजारांवरील उपचारांसाठी दाखल रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना आणि येथील कर्मचाऱ्यांनाही घातक संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. संसर्गजन्य आजारांनी ग्रासलेले हे मोकाट रूग्ण रुग्णालय परिसरातच थुंकतात. येथेच सर्रास मलमूत्र विसर्जनही केले जाते. काही रुग्ण अंगावरील जखमा खुल्या ठेवून फिरतात. त्यामुुळे वातावरणात रोगजंतुंचा फैलाव होतो. ही बाब सुदृढ रूग्णांसाठीदेखील अत्यंत धोकादायक ठरू शकते. रूग्णालय प्रशासनाने संसर्गजन्य आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांच्या मुक्तसंचारावर तत्काळ निर्बंध घालण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यातरुग्णालय परिसरात भटकंती करणाऱ्या संसर्गजन्य आजारांनी बाधित रूग्णांना डॉक्टर आणि परिचारिका कंटाळल्या आहेत. ओपीडीपासून प्रत्येक वॉर्डापर्यंत सगळीकडे या रूग्णांचा बिनधास्त वावर आहे. सावधगिरी म्हणून काही डॉक्टर व नर्सेस मास्क लावून उपचार करतात. मात्र, एखादवेळी ही सावधगिरी न बाळगल्यास संसर्गजन्य आजारांची बाधा होऊ शकते. सहा महिन्यांत ४० बेघरांवर उपचारजिल्ह्यातील अनाथ व बेघर रूग्णांच्या उपचाराची सोय जिल्हा सामान्य रूग्णालयात केली जाते. पोलीस, सामाजिक संघटना व नागरिकांच्या सहकार्याने दाखल या रूग्णांवर उत्तम उपचार केले जातात. मात्र, आजारातून उठल्यानंतरही हे रूग्ण रूग्णालय परिसरातच तळ ठोकून राहतात. काही रूग्णांना त्यांच्या नातलगांच्या स्वाधीन करण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र, संसर्गजन्य आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांना घरी नेण्यास अनेकदा नातलगही तयार होत नाहीत.