शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

‘इर्विन’ रूग्णालय बनले आजार उत्पत्ती केंद्र

By admin | Updated: July 14, 2014 00:38 IST

जिल्ह्याभरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणारे इर्विन

कर्मचारी, रूग्णांना बाधेचा धोका : संसर्गजन्य आजाराने ग्रासलेल्या रूग्णांचा मुक्त वावरवैभव बाबरेकर अमरावतीजिल्ह्याभरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणारे इर्विन रुग्णालय सद्यस्थितीत संसर्गजन्य आजारांच्या उत्पत्तीचे केंद्र बनले आहे. संसर्गजन्य आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांचा खुला वावर या रूग्णालयात दाखल इतर रूग्ण तसेच रूग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. याकडे आरोग्य प्रशासनाचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसते.जिल्ह्याच्या सीमा दिवसेंदिवस विस्तारत आहेत. राज्यभरातून रोजगारासाठी येथे येणाऱ्या लोकांमुळे लोकवस्ती दाट होत चालली आहे. प्रत्येकालाच शहरात हक्काचा निवारा मिळत नाही. घरे भाड्याने घेण्याची प्रत्येकाचीच कुवत नसते. त्यामुळे कित्येक लोक उघड्यावरच बस्तान मांडतात. शहरातील रेल्वे स्थानक, बसस्थानकासह अलीकडे शासकीय रुग्णालयदेखील भिकाऱ्यांचे आश्रयस्थान बनल्याचे दिसते.जिल्हा सामान्य रूग्णालयात मोफतचे अन्न आणि बिनभाड्याचा निवारा मिळत असल्याने हजारो गोरगरीब रुग्ण उपचाराच्या नावाखाली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होतात. यातील अनेक जण विविध प्राणघातक संसर्गजन्य आजारांनी ग्रासलेले असतात. टी.बी. आणि त्वचारोगांनी ग्रासलेल्या रूग्णांची संख्या यामध्ये अधिक असते. संसर्गजन्य आजारांनी ग्रासलेले हे रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या परिसरात व आतील वॉर्डांमध्येसुध्दा बिनधास्त अनिर्बंध फिरत असतात. त्यामुळे रूग्णालयात इतर आजारांवरील उपचारांसाठी दाखल रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना आणि येथील कर्मचाऱ्यांनाही घातक संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. संसर्गजन्य आजारांनी ग्रासलेले हे मोकाट रूग्ण रुग्णालय परिसरातच थुंकतात. येथेच सर्रास मलमूत्र विसर्जनही केले जाते. काही रुग्ण अंगावरील जखमा खुल्या ठेवून फिरतात. त्यामुुळे वातावरणात रोगजंतुंचा फैलाव होतो. ही बाब सुदृढ रूग्णांसाठीदेखील अत्यंत धोकादायक ठरू शकते. रूग्णालय प्रशासनाने संसर्गजन्य आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांच्या मुक्तसंचारावर तत्काळ निर्बंध घालण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यातरुग्णालय परिसरात भटकंती करणाऱ्या संसर्गजन्य आजारांनी बाधित रूग्णांना डॉक्टर आणि परिचारिका कंटाळल्या आहेत. ओपीडीपासून प्रत्येक वॉर्डापर्यंत सगळीकडे या रूग्णांचा बिनधास्त वावर आहे. सावधगिरी म्हणून काही डॉक्टर व नर्सेस मास्क लावून उपचार करतात. मात्र, एखादवेळी ही सावधगिरी न बाळगल्यास संसर्गजन्य आजारांची बाधा होऊ शकते. सहा महिन्यांत ४० बेघरांवर उपचारजिल्ह्यातील अनाथ व बेघर रूग्णांच्या उपचाराची सोय जिल्हा सामान्य रूग्णालयात केली जाते. पोलीस, सामाजिक संघटना व नागरिकांच्या सहकार्याने दाखल या रूग्णांवर उत्तम उपचार केले जातात. मात्र, आजारातून उठल्यानंतरही हे रूग्ण रूग्णालय परिसरातच तळ ठोकून राहतात. काही रूग्णांना त्यांच्या नातलगांच्या स्वाधीन करण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र, संसर्गजन्य आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांना घरी नेण्यास अनेकदा नातलगही तयार होत नाहीत.