शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

इंटरनेट बंद, तरीही तगडे बिल

By admin | Updated: June 29, 2016 00:22 IST

रिलायन्सची इंटरनेट सेवा अनेक दिवस बंद असतानाही बंद ग्राहकांना तगडे पोस्टपेड बिल पाठविण्यात आले आहेत.

रिलायन्सचा कारभार : हजारो ग्राहकांचे नुकसानअमरावती : रिलायन्सची इंटरनेट सेवा अनेक दिवस बंद असतानाही बंद ग्राहकांना तगडे पोस्टपेड बिल पाठविण्यात आले आहेत. ते भरण्यासाठी सक्ती केली जात असल्याने राज्यातील असंख्य ग्राहकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्राहकांनी ग्राहक मंचात दाद मागण्याचे ठरविले आहे. रिलायन्सची इंटरनेट सेवा २२ जून रोजी सुरू झाली. यापूर्वी अनेक दिवस सेवा अचानक बंद झाल्याने रिलायन्सची इंटरनेट सेवा वापरणाऱ्या ग्राहकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे अमरावतीसह राज्यातील अनेक ग्राहक त्रस्त झाले आहेत. बंद असलेल्या पोस्टपेड सेवेचे विनाकारण बिल पाठविण्यात आल्यामुळे हे बिल का भरावे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात अनेक ग्राहकांनी रिलायन्सच्या सर्व्हिस सेंटरला फोन लावला असता कंपनीचे धोरण आहे. आलेले बिल भरावेच लागेल, असे उडवाउडवीचे उत्तर मिळत आहे. रिलायन्सने डोंगल आयपॉड काढले होते. ते अनेक लोकांनी इंटरनेट सेवेसाठी विकत घेतले रिलायन्सची पोस्टपेड सेवा घेतली. अंदाजे अडीच हजार रुपये डाटा मोडेम विकत घेण्यात आले होते. पण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून २२ जूनपर्यंत पूर्वसूचना न देता ही सेवा बंद करण्यात आल्यामुळे ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. रिलायन्सची इंटरनेट सेवा वापरणारे ज्यांना बंद असलेल्या सेवेचे पोस्टपेड बिल पाठविले, असे अमरावतीत ४०० ग्राहक आहेत. ४ जी सेवा अपग्रेडसाठी सीडीएमएम नेटवर्क बंद केले आहे. पूर्वसूचना न देता प्री-पेडची सेवाही बंदज्या ग्राहकांनी रिलायन्सच्या इंटरनेट सेवेसाठी प्री-पेड प्लॅन घेतला आहे त्या प्लॅनची व्हॅलिडिटी डाटाचे नुकसान झाले आहे. ती सेवा अचानक बंद केल्यामुळे त्या ग्राहकांनी पैसे भरून वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन घेतले आहेत. त्यांच्या पैशाचे काय, असा प्रश्न अनेक ग्राहकांना पडला आहे. त्यांनी या संदर्भात सेवा चालू झाल्यांनतर कस्टमर केअरला फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. पैसे भरण्यासाठी एकाच ग्राहकांना ३० ते ४० मॅसेजरिलायन्सने एकतर सेवा अनेक दिवस बंद असतांना त्यांच्या ग्राहकांना विनाकारण बिल पाठविले व हि बिल भरण्यासाठी एका ग्राहकांच्या मोबाईलवर बिल भरण्यासाठी ३० ते ४० मॅसेज पाठविण्यात येत आहे. हे मॅसेज रात्री बे रात्री येत असल्यामुळे ग्राहकांच्या झोपा खराब होत असल्याचे एका ग्राहकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.