शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

खरिपातील दहा पिकांसाठी विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:28 IST

जिल्ह्यात २०१९-२० या खरीप हंगामासाठी पंतप्रधान विमा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या योजनेत भात, ज्वारी, मका, तूर, मूंग, उडीद, भुईमूंग, तीळ, सोयाबीन, कापूस या पिकांचा समावेश राहणार आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री विमा योजना : कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक, २४ जुलैपर्यंत प्रस्ताव बँकेकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : जिल्ह्यात २०१९-२० या खरीप हंगामासाठी पंतप्रधान विमा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या योजनेत भात, ज्वारी, मका, तूर, मूंग, उडीद, भुईमूंग, तीळ, सोयाबीन, कापूस या पिकांचा समावेश राहणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा हप्त्यासह अंतिम प्रस्ताव बँकेकडे २४ जुलैपर्यंत सादर करावयाचे आहेत.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान, सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, कृषिक्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, हा या योजनेचा उद्देश आहे. विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीकविमा हप्ता योजनेंतर्गत राज्यात सन २०१९-२० साठी सर्वसाधारणपणे जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेल्या पीककर्ज दराप्रमाणे पीकनिहाय विमा रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. खातेदाराशिवाय कुळांचे अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के, रबी हंगामासाठी १.५० टक्के असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.यंदाच्या खरीप हंगामामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. यासंबंधी अधिक माहितीकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा.- सुभाष नागरे, विभागीय कृषी सहसंचालक

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज