शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

खरिपाला विम्याचे संरक्षण कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात नैसर्गिक धोक्यापासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी अधिसूचित १५ पिकांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे कवच मिळणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै, तर बिगर कर्जदार खातेदारांसाठी २४ जुलै ही अंतिम मुदत आहे. शुक्रवारी कृषी विभागाने या योजनेला मंजुरी दिली.नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान ...

ठळक मुद्दे२५ जुलै डेडलाईन : अधिसूचित १५ पिकांचा योजनेत समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात नैसर्गिक धोक्यापासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी अधिसूचित १५ पिकांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे कवच मिळणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै, तर बिगर कर्जदार खातेदारांसाठी २४ जुलै ही अंतिम मुदत आहे. शुक्रवारी कृषी विभागाने या योजनेला मंजुरी दिली.नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानाच्या कठीण काळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे आदी योजनेची उद्दिष्टे आहेत. कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक आहे, तर बिगर कर्जदार शेतकºयांसाठी ऐच्छिक आहे. खातेदाराशिवाय कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत सहभाग घेण्यास पात्र आहे. या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. खरीप हंगामासाठी शेतकºयांना दोन टक्के, तर रबी हंगामासाठी व नगदी पिकांसाठी पात टक्के विमा भरावयाचा आहे. या योजनेंतर्गत पाच टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आलेला आहे.जिल्हा समिती घेणार आढावाप्रत्येक हंगामाच्या वेळी कृषी विभागाद्वारा कृषीविषयक परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण व सनियंत्रण करण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सदस्य व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी समितीचे सचिव राहणार आहेत.अशी होणार नुकसानभरपाई निश्चितशासनाने निर्धारित केलेल्या विमा क्षेत्र घटकातील पीक कापणी प्रयोगावरून उपलब्ध झालेल्या सरासरी उत्पन्नावर नुकसानभरपाई आधारित राहणार आहे.एखाद्या निर्धारित क्षेत्रातील विमा संरक्षित पिकाचे त्यावर्षीचे हेक्टरी सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी असल्यास, सर्व विमाधारक शेतकºयांचे नुकसान झाले, असे गृहीत धरण्यात येईल.नुकसानभरपाईचे निकषअधिसूचित पिकांचे अपेक्षित उत्पन्न हे त्या पिकाच्या उंबरठा उत्पन्नाच्या ५० टक्क््यांपेक्षा कमी असल्यास सर्व अधिसूचित क्षेत्र नुकसानभरपाईसाठी पात्र ठरणार आहे. विमा कंपनी व राज्य शासनाचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनंतर विमा कंपनीद्वारा नुकसानाचे प्रमाण व द्यावयाची भरपाई याबाबत ठरविले जाणार आहे.भरपाईसाठी अधिसूचित क्षेत्र घटक ग्राह्यपिकाच्या नुकसानभरपाईसाठी अधिसुचित विमा क्षेत्र घटक ग्राह्य धरले जाणार आहेत. जिल्हाधिकाºयांनी अधिसूचना काढण्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरणा केला व ज्या शेतकऱ्यांच्या खात्यातून हप्ता कपात करण्यात आला, असेच शेतकरी मदतीसाठी पात्र ठरणार आहे. अपेक्षित भरपाईच्या २५ टक्क््यांपर्यंत रक्कम आगाऊ देण्यात येईल.