शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
3
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
4
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
5
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
6
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
7
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
8
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
9
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
10
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
11
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
12
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
13
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
14
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
15
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
16
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
17
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
18
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
19
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
20
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना

खरिपाला विम्याचे संरक्षण कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात नैसर्गिक धोक्यापासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी अधिसूचित १५ पिकांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे कवच मिळणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै, तर बिगर कर्जदार खातेदारांसाठी २४ जुलै ही अंतिम मुदत आहे. शुक्रवारी कृषी विभागाने या योजनेला मंजुरी दिली.नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान ...

ठळक मुद्दे२५ जुलै डेडलाईन : अधिसूचित १५ पिकांचा योजनेत समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात नैसर्गिक धोक्यापासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी अधिसूचित १५ पिकांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे कवच मिळणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै, तर बिगर कर्जदार खातेदारांसाठी २४ जुलै ही अंतिम मुदत आहे. शुक्रवारी कृषी विभागाने या योजनेला मंजुरी दिली.नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानाच्या कठीण काळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे आदी योजनेची उद्दिष्टे आहेत. कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक आहे, तर बिगर कर्जदार शेतकºयांसाठी ऐच्छिक आहे. खातेदाराशिवाय कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत सहभाग घेण्यास पात्र आहे. या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. खरीप हंगामासाठी शेतकºयांना दोन टक्के, तर रबी हंगामासाठी व नगदी पिकांसाठी पात टक्के विमा भरावयाचा आहे. या योजनेंतर्गत पाच टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आलेला आहे.जिल्हा समिती घेणार आढावाप्रत्येक हंगामाच्या वेळी कृषी विभागाद्वारा कृषीविषयक परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण व सनियंत्रण करण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सदस्य व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी समितीचे सचिव राहणार आहेत.अशी होणार नुकसानभरपाई निश्चितशासनाने निर्धारित केलेल्या विमा क्षेत्र घटकातील पीक कापणी प्रयोगावरून उपलब्ध झालेल्या सरासरी उत्पन्नावर नुकसानभरपाई आधारित राहणार आहे.एखाद्या निर्धारित क्षेत्रातील विमा संरक्षित पिकाचे त्यावर्षीचे हेक्टरी सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी असल्यास, सर्व विमाधारक शेतकºयांचे नुकसान झाले, असे गृहीत धरण्यात येईल.नुकसानभरपाईचे निकषअधिसूचित पिकांचे अपेक्षित उत्पन्न हे त्या पिकाच्या उंबरठा उत्पन्नाच्या ५० टक्क््यांपेक्षा कमी असल्यास सर्व अधिसूचित क्षेत्र नुकसानभरपाईसाठी पात्र ठरणार आहे. विमा कंपनी व राज्य शासनाचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनंतर विमा कंपनीद्वारा नुकसानाचे प्रमाण व द्यावयाची भरपाई याबाबत ठरविले जाणार आहे.भरपाईसाठी अधिसूचित क्षेत्र घटक ग्राह्यपिकाच्या नुकसानभरपाईसाठी अधिसुचित विमा क्षेत्र घटक ग्राह्य धरले जाणार आहेत. जिल्हाधिकाºयांनी अधिसूचना काढण्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरणा केला व ज्या शेतकऱ्यांच्या खात्यातून हप्ता कपात करण्यात आला, असेच शेतकरी मदतीसाठी पात्र ठरणार आहे. अपेक्षित भरपाईच्या २५ टक्क््यांपर्यंत रक्कम आगाऊ देण्यात येईल.