शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

सोयाबीनवर खोड किडीचा 'अटॅक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:01 IST

सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची वर्षभराची उलाढाल अवलंबून असते. त्यामुळे पीकपेरणी, मशागतीकरिता शेतकरी कर्जबाजारी होऊनही पिकावर पाण्यासारखा पैसा खर्च करतो. महागडे बियाणे, फवारणी यावर सर्वात अधिक खर्च केला जातो. मात्र यावर्षी सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना चांगलाच दगा दिला आहे. यावर्षी सर्वप्रथम सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामध्ये पेरलेले बियाणे उगवलेच नाही.

ठळक मुद्देबच्चू कडू शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानग्रस्त भागातील पिकांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातील सोयाबीन पिकावर 'येलो मोझॅक' रोगाने अटॅक केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे. पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळताच राज्यमंत्री बच्चू कडू हे थेट बांधावर पोहोचले. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहे.सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची वर्षभराची उलाढाल अवलंबून असते. त्यामुळे पीकपेरणी, मशागतीकरिता शेतकरी कर्जबाजारी होऊनही पिकावर पाण्यासारखा पैसा खर्च करतो. महागडे बियाणे, फवारणी यावर सर्वात अधिक खर्च केला जातो. मात्र यावर्षी सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना चांगलाच दगा दिला आहे. यावर्षी सर्वप्रथम सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामध्ये पेरलेले बियाणे उगवलेच नाही. काही बियाणे उगवले असले तरी येलो मोझॅकसारख्या विविध रोगामुळे फटका बसला आहे. कुरळपूर्णा भागातील एका शेतात चक्क सोयाबीन पीक बकºयाच्या चाऱ्यासाठी खुले केले आहे. याची गंभीर दखल घेत पं.स.सदस्य संतोष किटुकले यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना माहिती दिली. यावेळी दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री बच्चू कडू थेट कुरळपूर्णा येथील शेतकरी वैभव धाकडे यांच्या शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी पोहोचले. त्यांनी तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड यांना माहिती विचारली. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांचाच समाचार घेतला. जिल्हा कृषी अधीक्षकांना पीकपाहणीचे आदेश दिले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी दांडेगावकर, तहसीलदार अभिजित जगताप व शेतकरी उपस्थित होते.यंदा पहिल्यांदा पेरलेले सोयाबीन उगवले नाही. जे उगवले ते हातात येण्यापूर्वी खराब झाल्यामुळे राज्यातील कृषी विभागावर शंका व्यक्त होत आहे. यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून विम्याचा लाभ देण्यात येणार आहे. विमा नसलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाईल.- बच्चू कडू, राज्यमंत्री, महराष्ट्र शासनकारवाईचे आदेशमहाबीजने बाजारातील २ ते ३ हजार रुपये क्विंटलचे निकृष्ट दर्जाचे सोयाबीन खरेदी करून शेतकºयांना ८ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकले आहे. त्यामुळे या सर्व प्रकारची चौकशी करून दोषींवर कार्यवाही केली जाणार असल्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूagricultureशेती