शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सोयाबीनवर खोड किडीचा 'अटॅक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:01 IST

सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची वर्षभराची उलाढाल अवलंबून असते. त्यामुळे पीकपेरणी, मशागतीकरिता शेतकरी कर्जबाजारी होऊनही पिकावर पाण्यासारखा पैसा खर्च करतो. महागडे बियाणे, फवारणी यावर सर्वात अधिक खर्च केला जातो. मात्र यावर्षी सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना चांगलाच दगा दिला आहे. यावर्षी सर्वप्रथम सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामध्ये पेरलेले बियाणे उगवलेच नाही.

ठळक मुद्देबच्चू कडू शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानग्रस्त भागातील पिकांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातील सोयाबीन पिकावर 'येलो मोझॅक' रोगाने अटॅक केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे. पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळताच राज्यमंत्री बच्चू कडू हे थेट बांधावर पोहोचले. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहे.सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची वर्षभराची उलाढाल अवलंबून असते. त्यामुळे पीकपेरणी, मशागतीकरिता शेतकरी कर्जबाजारी होऊनही पिकावर पाण्यासारखा पैसा खर्च करतो. महागडे बियाणे, फवारणी यावर सर्वात अधिक खर्च केला जातो. मात्र यावर्षी सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना चांगलाच दगा दिला आहे. यावर्षी सर्वप्रथम सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामध्ये पेरलेले बियाणे उगवलेच नाही. काही बियाणे उगवले असले तरी येलो मोझॅकसारख्या विविध रोगामुळे फटका बसला आहे. कुरळपूर्णा भागातील एका शेतात चक्क सोयाबीन पीक बकºयाच्या चाऱ्यासाठी खुले केले आहे. याची गंभीर दखल घेत पं.स.सदस्य संतोष किटुकले यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना माहिती दिली. यावेळी दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री बच्चू कडू थेट कुरळपूर्णा येथील शेतकरी वैभव धाकडे यांच्या शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी पोहोचले. त्यांनी तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड यांना माहिती विचारली. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांचाच समाचार घेतला. जिल्हा कृषी अधीक्षकांना पीकपाहणीचे आदेश दिले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी दांडेगावकर, तहसीलदार अभिजित जगताप व शेतकरी उपस्थित होते.यंदा पहिल्यांदा पेरलेले सोयाबीन उगवले नाही. जे उगवले ते हातात येण्यापूर्वी खराब झाल्यामुळे राज्यातील कृषी विभागावर शंका व्यक्त होत आहे. यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून विम्याचा लाभ देण्यात येणार आहे. विमा नसलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाईल.- बच्चू कडू, राज्यमंत्री, महराष्ट्र शासनकारवाईचे आदेशमहाबीजने बाजारातील २ ते ३ हजार रुपये क्विंटलचे निकृष्ट दर्जाचे सोयाबीन खरेदी करून शेतकºयांना ८ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकले आहे. त्यामुळे या सर्व प्रकारची चौकशी करून दोषींवर कार्यवाही केली जाणार असल्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूagricultureशेती