शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

आरोग्य विभागात बेरोजगार आरोग्य कर्मचाऱ्यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:13 IST

अमरावती : एनआरएचएम व जिल्हा आरोग्य विभागातील बेरोजगार आरोग्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याप्रकरणी या विभागातील गलथान व मनमानी कारभाराला ...

अमरावती : एनआरएचएम व जिल्हा आरोग्य विभागातील बेरोजगार आरोग्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याप्रकरणी या विभागातील गलथान व मनमानी कारभाराला दोषी कोण, याची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी राज्याच्या आरोग्य विभागाकडे केली आहे.

आरोग्य विभागाच्या अकोला परिमंडळामार्फत समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) पदाच्या भरतीकरिता नोव्हेंबर २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यात उत्तीर्ण झालेल्या बेरोजगांचे गुणवत्तेनुसार व बिंदूनामावली प्रमाणे निवड याद्या प्रसिध्द करण्यात आल्यात. सदर यादीनुसार समुदाय आरोग्य अधिकारी यांनी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सहा महिन्याचे प्रशिक्षणसुध्दा पार पडले व संबंधितांनी आरोग्य विभाग नाशिक येथील परीक्षासुध्दा उत्तीर्ण केली.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निवड झालेल्या समुदायाचे आरोग्य समुपदेशन होऊन संबधितांना नियुत्या देण्यात आल्या. परंतु एकमेव अमरावती जिल्ह्यात निवड झालेल्या उमेदवारांचे समुपदेशन झालेले नाही. त्यामुळे ते पात्र असतानाही अद्याप ताटकळत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रावर विशेषत: आदिवासी भागात अनेक उपकेंद्रातील पदे रिक्त नसल्याची चुकीची माहिती दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. पात्र उमदेवार प्रतीक्षा यादीवर असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्याला आवश्यकता असताना सदर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त केले नाहीत. दिशाभूल करणारी माहिती देऊन एनआरएचएम व आरोग्य विभागाने बेरोजगारावर अन्याय केल्याचा आरोप सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी तक्रारीत केला आहे. एवढेच नव्हे तर पात्र व निवड झालेल्या उमेदवारांसाठी उपकेंद्र रिक्त नाही, अशी शासनाला खोटी माहिती देऊन कोलोटेड उपकेंद्रावर आपल्या नेमणुका करू व त्याकरिता संबंधित विभागाने शासनाकडे परवानगी मागितली. असे संबंधिताना सांगण्यात आले. विशेष म्हणजे शासनाने पत्रावर समुदाय आरोग्य अधिकारी नेमणुका केलेल्या उपकेंद्रावर करण्याची परवानगी दिली आहे. यालाही चार महिने झाले आहेत. परंतु संबंधित विभागाने मनमानी करभार करून शासनाच्या पत्रालाही केराची टोपली दाखवून समुदाय आरोग्य अधिकारी पदस्थापनेकरिता कोलोटेड उपकेंद्राऐवजी उपकेंद्रावर नियुक्ती देण्याची कार्यवाही सुरू केल्याची माहिती आहे. एनआरएचएम व आरोग्य विभागातील सन २०१९ मधील या घोळाची चौकशी करावी व ज्या ३५ हून अधिकारी बेरोजगार आरोग्य कर्मचाऱ्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी प्रताप अभ्यंकर यांनी केली आहे.