शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

आरोग्य विभागात बेरोजगार आरोग्य कर्मचाऱ्यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:13 IST

अमरावती : एनआरएचएम व जिल्हा आरोग्य विभागातील बेरोजगार आरोग्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याप्रकरणी या विभागातील गलथान व मनमानी कारभाराला ...

अमरावती : एनआरएचएम व जिल्हा आरोग्य विभागातील बेरोजगार आरोग्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याप्रकरणी या विभागातील गलथान व मनमानी कारभाराला दोषी कोण, याची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी राज्याच्या आरोग्य विभागाकडे केली आहे.

आरोग्य विभागाच्या अकोला परिमंडळामार्फत समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) पदाच्या भरतीकरिता नोव्हेंबर २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यात उत्तीर्ण झालेल्या बेरोजगांचे गुणवत्तेनुसार व बिंदूनामावली प्रमाणे निवड याद्या प्रसिध्द करण्यात आल्यात. सदर यादीनुसार समुदाय आरोग्य अधिकारी यांनी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सहा महिन्याचे प्रशिक्षणसुध्दा पार पडले व संबंधितांनी आरोग्य विभाग नाशिक येथील परीक्षासुध्दा उत्तीर्ण केली.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निवड झालेल्या समुदायाचे आरोग्य समुपदेशन होऊन संबधितांना नियुत्या देण्यात आल्या. परंतु एकमेव अमरावती जिल्ह्यात निवड झालेल्या उमेदवारांचे समुपदेशन झालेले नाही. त्यामुळे ते पात्र असतानाही अद्याप ताटकळत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रावर विशेषत: आदिवासी भागात अनेक उपकेंद्रातील पदे रिक्त नसल्याची चुकीची माहिती दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. पात्र उमदेवार प्रतीक्षा यादीवर असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्याला आवश्यकता असताना सदर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त केले नाहीत. दिशाभूल करणारी माहिती देऊन एनआरएचएम व आरोग्य विभागाने बेरोजगारावर अन्याय केल्याचा आरोप सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी तक्रारीत केला आहे. एवढेच नव्हे तर पात्र व निवड झालेल्या उमेदवारांसाठी उपकेंद्र रिक्त नाही, अशी शासनाला खोटी माहिती देऊन कोलोटेड उपकेंद्रावर आपल्या नेमणुका करू व त्याकरिता संबंधित विभागाने शासनाकडे परवानगी मागितली. असे संबंधिताना सांगण्यात आले. विशेष म्हणजे शासनाने पत्रावर समुदाय आरोग्य अधिकारी नेमणुका केलेल्या उपकेंद्रावर करण्याची परवानगी दिली आहे. यालाही चार महिने झाले आहेत. परंतु संबंधित विभागाने मनमानी करभार करून शासनाच्या पत्रालाही केराची टोपली दाखवून समुदाय आरोग्य अधिकारी पदस्थापनेकरिता कोलोटेड उपकेंद्राऐवजी उपकेंद्रावर नियुक्ती देण्याची कार्यवाही सुरू केल्याची माहिती आहे. एनआरएचएम व आरोग्य विभागातील सन २०१९ मधील या घोळाची चौकशी करावी व ज्या ३५ हून अधिकारी बेरोजगार आरोग्य कर्मचाऱ्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी प्रताप अभ्यंकर यांनी केली आहे.