शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

माहुलीतील अतिक्रमण काढण्यात गाववासीयांचा पुढाकार

By admin | Updated: August 30, 2015 00:01 IST

माहुली (जहागीर) येथे झालेल्या उद्रेकानंतर प्रशासनाला जाग आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्याच्या सूचना...

प्रशासनाला आली जाग : सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्या होत्या सूचनाअमरावती : माहुली (जहागीर) येथे झालेल्या उद्रेकानंतर प्रशासनाला जाग आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्याच्या सूचना देताच नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. मंगळवार २५ आॅगस्ट रोजीची सकाळ साहिल डायरे या चिमुकल्यासाठी काळ बनून आली. त्यानंतर झालेल्या उद्रेकांनतर पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केल्यामुळे माहुलीवासीयांवर मोठे संकट ओढवले. माहुलीतील अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. या कोंडीमुळे बसेस रस्त्यावर थांबवाव्या लागत होत्या. अशातूनच मंगळवारी मोर्शी-बुलडाणा एसटी रस्त्यावर उभी करून प्रवासी घेतले जात होते. ‘त्या’ वाहतूक पोलिसावर कारवाई का नाही? माहुलीत वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मात्र, ते घटनेच्यावेळी बसस्थानक परिसरात नव्हते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यावेळी वाहतूक पोलीस बसस्थानकजवळ असते तर बस मुख्य मार्गाच्या मधोमध उभी राहिली नसती. बस रस्त्याच्या मध्यभागी उभी करून चालक-वाहकाने प्रवासी आत घेतले. त्याचवेळी साहिलसुध्दा एसटीत चढत होता. तेथे वाहतूक पोलीस उपस्थित असते तर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या एसटीखाली साहिल चिरडला गेला नसता, अशा भावना माहुलीवासीयांनी व्यक्त केल्यात. त्यामुळे त्या बेजबाबदार वाहतूक पोलिसांवरही कारवाई करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.