शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

सपन, पूर्णा चंद्रभागा, शहानूर, चारघडच्या जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:16 IST

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सपन, पूर्णा, चंद्रभागा, शहानूर, चारघड नदी प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली. सपन नदी प्रकल्प ८० टक्के भरला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा पहिला व चौथा दरवाजा सायंकाळी सहाच्या सुमारास पाच सेमीने उघडला. प्रकल्प अधिकाऱ्यांनी नदीकाठच्या गावांना सावध केले आहे.

ठळक मुद्देबिच्छन, पिली, पूर्णा नदीला पूर; सपनचे दोन दरवाजे उघडले

परतवाडा : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सपन, पूर्णा, चंद्रभागा, शहानूर, चारघड नदी प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली. सपन नदी प्रकल्प ८० टक्के भरला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा पहिला व चौथा दरवाजा सायंकाळी सहाच्या सुमारास पाच सेमीने उघडला. प्रकल्प अधिकाऱ्यांनी नदीकाठच्या गावांना सावध केले आहे.सपन नदी प्रकल्पाची पाणीपातळी सकाळी ९ वाजता पाण्याची पातळी ५०८.७० मीटरवर पोहोचली होती. सायंकाळी त्यातून विसर्ग करण्यात आला. या अनुषंगाने अचलपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदारांना माहिती देण्यात आली तसेच लोकांना इशारा देण्यात आला. त्यापूर्वी नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे साहित्य उचलल्यानंतर प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात यावेत, अशा सूचना उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिल्या होत्या.अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा धरण ४७ टक्के भरले आहे. धरणावर ९३ मिमी पावसाची नोंद आहे. शहरानूर धरण ४० टक्के भरले आहे. धरणावर ५० मिमी पावसाची नोंद आहे.दरम्यान, रविवारी मध्यरात्रीनंतर परतवाडा-अचलपूर शहरांतून वाहणाऱ्या बिच्छन नदीला पूर आला. अमरावती रोडवरील भूगाव लगतच्या पिली नदी आणि आसेगाव लगतच्या पूर्णा नदीलाही पूर गेला. पुरामुळे बिच्छन, पिली, पूर्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत.बिच्छन नदीच्या पुरामुळे अचलपूर शहरातील भैरवघाट स्मशानभूमीत पाणी घुसले, तर पावसाच्या पाण्यामुळे परतवाडातून अचलपूर शहराकडे जाणाºया दोन्ही रस्त्यांवर तीन फूटांहूनही अधिक पाणी साचले. तहसीलमागून खिडकी गेटकडे जाणाºया रस्त्यावरील पेट्रोल पंपसमोर आणि तहसीलसमोरून दुल्हागेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर चेडे ते जि.प. हायस्कूललगत हे पाणी थांबले. यात अचलपूर शहराकडे जाणारे रस्ते बंद पडलेत. वाहतूक थांबली असून, आॅटोअभावी विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही.परतवाडा शहरातील घामोडिया प्लॉट स्थित विनोद इंगोले यांच्या घरात व फर्निचरच्या दुकानातही पाणी घुसले. अमरावती रोडवरील फातिमा कॉन्व्हेंटसमोरील स्वयंवर लॉनकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या खुल्या जागेतील झोपड्यांमध्ये पाणी घुसले.अंजनगाव रोडवरील सावळी गावातील ६० ते ७० घरांमध्ये मध्यरात्रीनंतर ३ वाजताच्या सुमारास पाणी शिरले. या पाण्यामुळे व रस्त्याच्या कामामुळे अंजनगाव रस्ता बंद पडला आहे. परतवाड्यावरून अंजनगावकडे जाणारी वाहतूक थांबली आहे. धारणी रोडवरील गौरखेडा कुंभीतील काही घरांमध्ये पाणी घुसले आहे.