शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात मानसिक आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:10 IST

पहिल्या लाटेत कुटुंबातील एक-दोघांना कोरोना झाला. मात्र, दुसऱ्या लाटेत अख्खे कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने, तसेच मृत्यूचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या ...

पहिल्या लाटेत कुटुंबातील एक-दोघांना कोरोना झाला. मात्र, दुसऱ्या लाटेत अख्खे कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने, तसेच मृत्यूचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या मनात अधिक भीती निर्माण झाली होती. काहींचा रोजगार, काहींचा व्यवसाय बंद बडल्याने आर्थिक स्थिती बिकट झाली होती. कसे होणार, या विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांचा आधार घेतला जात आहे. कुटुंबीयांकडून अशा व्यक्तींचे सांत्वन केले तरी कोरोनाच्या धक्क्यातून अजूनही काही व्यक्ती बाहेर निघालेले नाहीत. त्यामुळे कुणाची बोलती बंद झाल्याचे चित्र आहे. काहींना झोपच लागत नसल्याने त्यांच्या कामकाजावर परिणाम जाणवत आहे. अशा रुग्णांना सावरण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडे जावे लागत आहे.

बॉक्स

चिंतेमुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या

गत काही वर्षांपासून कृषी क्षेत्राला सारखा फटका बसत आहे. यातून शेतकरी कुटुंब सावरणे अवघड झाले आहे. महागाई वाढतीच असून, त्यात निसर्गाचा प्रकोप अधिकच भर पाडताना दिसत आहे. त्यामुळे कर्जापायी विवंचनेत येऊन शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे एकंदरीत जून महिन्यातील चार घटनांवरून लक्षात येत आहे.

--

मानसोपचारतज्ज्ञ काय म्हणतात?

पहिल्या लाटेत मानसिक रुग्णांची तपासणी कमी प्रमाणात झाली. मात्र, दुसऱ्या लाटेत याचे प्रमाण अधिकच वाढले. जिल्ह्यात कोरोना रुग्णांसह मृत्यूची संख्या वाढल्याने अधिकच भीती वाटू लागल्याने तणावात रात्री झोप न येण्याच्या तक्रारी वाढल्या. व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढल्याने दुरुस्त झालेले रुग्णातदेखील मोठ्या प्रमाणात लक्षणे दिसू लागली आहे.

- डॉ. श्रीकांत देशमुख, मानसोपचारतज्ज्ञ

--

कोरोनामुळे मानसिकतेवर नक्कीच परिणाम झालेला आहे. अनेकांचा रोजगार गेल्याने, कुटुंबातील कर्ता व्यक्ती दगावल्याने अनेक जण तणावात आलेले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत मानसिक रुग्ण भरपूर आहेत. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे किंवा प्रवासी वाहतुकीच्या अभावामुळे ते रुग्णालयापर्यंत पोहोचलेले नाहीत. भविष्यात ही संख्या वाढणार आहे.

- डॉ. लक्ष्मीकांत राठी,

मानसोपचारतज्ज्ञ

-

हे दिवसही जातील...

कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या. अनेकांचे व्यवसाय बुडाले. यामुळे चिंतेत भर पडली आहे.

अनलॉक होताच अनेकांना पुन्हा आशेचा किरण दिसू लागला आहे. कोरोना थांबणार आणि आपला रोजगार पूर्ववत होणार, अशी आशा अनेकांना लागलेली आहे.

कोरोना नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. याशिवाय प्रत्येक दिवस सारखा नसतो.