शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील हवेच्या गुणवत्तेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST

अमरावती : कोरोनाकाळातील लॉकडाऊन, दिवसाची संचारबंदी याशिवाय पर्यावरणासंदर्भात प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे शहरतील हवेच्या गुणवत्तेत गतवर्षीच्या तुलनेत सुधारणा झालेली आहे. ...

अमरावती : कोरोनाकाळातील लॉकडाऊन, दिवसाची संचारबंदी याशिवाय पर्यावरणासंदर्भात प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे शहरतील हवेच्या गुणवत्तेत गतवर्षीच्या तुलनेत सुधारणा झालेली आहे. महापालिकेच्या पर्यावरण संवर्धन अधिकाऱ्यांनी हा अहवाल मंगळवारी सादर केला.

महापालिकेचा येथील शिवाजी सायन्स कॉलेजसोबत सामंजस्य करार झालेला आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाद्वारा तपासणी अहवालातही हवेच्या गुणवत्तेत सुधार झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, ध्वनी प्रदूषणात सुधार नसल्याचे सभागृहाने चिंतादेखील व्यक्त केलेली आहे. हवेच्या गुणवत्तेबाबत प्राप्त माहितीनुसार, रहिवासी क्षेत्रात एनओएक्स व एसओटूचे प्रमाण अनुक्रमे १२.४५ व १०.९८ आहे. हे प्रदूषण पातळी ८० पेक्षा कमी आहे. याशिवाय आरएसपीएमचे प्रमाण सरासरी ४८.६१ म्हणजेच अनुज्ञेय पातळीपेक्षा कमी आहे. सन २०१९-२९० मध्ये हे प्रमाण ६९.६४ एवढे होते.

औद्योगिक एनओएक्स व एसओटूचे प्रमाण अनुक्रमे १३.६९ व १२.२८ एवढे आहे. आरएसपीएमचे प्रमाण ५३.४९ पेक्षा कमी आढळले आहे. गतवर्षी हे प्रमाण ८५.८३ होते. त्यामुळे यंदा घट झाल्याचे दिसून येते. शिवाय व्यापारी क्षेत्रात एनओएक्स व एसओटूचे प्रमाण अनुक्रमे १५.३ व १३.८० आढळले हे अनुज्ञेय पातळीपेक्षा कमी आहे. आरएसपीएमचे प्रमाणही अनुज्ञेय पातळीपेक्षा कमी ५६.८१ आढळून आले आहे. गतवर्षी हे प्रमाण ८३.३० एवढे आढळून आले होते.

बॉक्स

पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे आरएसपीएम वाढणार

गतवर्षीच्या तुलनेत रहिवासी, ऑद्यगिक व व्यापारी क्षेत्रातील एनओएक्स, एसओटूच्या प्रमाणात घट आलेली आहे. मात्र, यात अधिक प्रयत्नांची गरज आहे. याशिवाय शहरात पायाभूत सुविधांच्या कामामुळे आरएसपीएमच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांचा विचार करता या प्रमाणात सातत्याने कमी येत आहे.

बॉक्स

वाढते ध्वनीप्रदूषण चिंतेचा विषय

दिवसेंदिवस वाढते नागरिकरण, वाहनांची संख्यावाढ, डीजे संस्कृतीचे वाढते प्रमाण यामुळे शहरातील ध्वनीप्रदूषणात झालेली वाढ चिंताजनक आहे. यामुळे मानवी आरोग्यावर शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होतात. यासाठी शैक्षणिक संस्था, दवाखाने, न्यायालय या सभोवतीच्या १०० मीटरच्या परिसरात शांतता क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे.