शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

जैवविधता समित्यांची अंमलबजावणी कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

अमरावती : जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता नोंदवह्या तयार करण्यात आल्या आहेत. गावातील जैवविविधतेच्या संरक्षण संवर्धनासाठी स्थानिक पातळीवर जैवविविधता ...

अमरावती : जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता नोंदवह्या तयार करण्यात आल्या आहेत. गावातील जैवविविधतेच्या संरक्षण संवर्धनासाठी स्थानिक पातळीवर जैवविविधता व्यवस्थापन समित्या गठित करण्यात आल्या. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून शासनस्तरावर कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे गावोगावी समित्या गठित केल्या, त्या कागदोपत्रीच केल्या की काय, असा प्रश्न समित्यांच्या सदस्यांमधून उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने ऑगस्ट २०१८ मध्ये दिलेल्या आदेशात जैवविविधता मंडळाद्वारे व जैविक विविधता कायदा २००२ ची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर यशस्वीपणे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांवर जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करून समितीमार्फत लोक जैवविविधता नोंदवही तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात ८४० ग्रामपंचायतीमध्ये या जैवविविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जैवविविधता मंडळ नागपूर व विभागीय कार्यालय, पुणे यांच्याकडे ग्रामपंचायत स्तरावरील नोंदवह्या पाठवण्यात आल्या आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीच्या नोंदवह्या सादर करण्यात आल्या नव्हत्या. मात्र, यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायतींनी पंचायत समिती व जिल्हा परिषद असे मिळून या नोंदवह्या पाठवण्याची कारवाई जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत पूर्ण केल्याचे झेडपी पंचायत विभागाकडून सांगण्यात आले आहे. यानुसार विविध टप्प्यातील गावोगावच्या जैवविविधता नोंदी करून त्याची माहिती शासन व वनविभागास जैवविविधता मंडळ सादर करण्यात आली आहे. यानंतर मात्र जैवविधता समित्यांमार्फत करावयाच्या अंमलबजावणी प्रक्रिया अजूनही सुरू झाली नसल्याचे वास्तव ग्रामपंचायत स्तरावर दिसून येत आहे.

कोट

जैवविविधतेच्या संरक्षण संवर्धनासाठी विविध टप्प्यांतील नोंदी करण्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ स्तरावर सादर केली आहे. याबाबत पुढील सूचना आल्यानंतर अंमलबजावणीची कारवाई केली जाईल.

- दिलीप मानकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)

कोट

सन २०१८ मध्ये शासन व जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या सूचनेप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर जैवविधता समित्या गठित केल्या. यासंदर्भात प्रशिक्षण घेतले. आराखडे सादर केले. परंतु, त्यानंतर अंमलबजावणी बाबत अद्याप कुठल्याची सूचना आलेल्या नाहीत.

- आशिष भागवत, जिल्हा सरचिटणीस, ग्रामसेवक युनियन