शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

जैवविधता समित्यांची अंमलबजावणी कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

अमरावती : जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता नोंदवह्या तयार करण्यात आल्या आहेत. गावातील जैवविविधतेच्या संरक्षण संवर्धनासाठी स्थानिक पातळीवर जैवविविधता ...

अमरावती : जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता नोंदवह्या तयार करण्यात आल्या आहेत. गावातील जैवविविधतेच्या संरक्षण संवर्धनासाठी स्थानिक पातळीवर जैवविविधता व्यवस्थापन समित्या गठित करण्यात आल्या. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून शासनस्तरावर कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे गावोगावी समित्या गठित केल्या, त्या कागदोपत्रीच केल्या की काय, असा प्रश्न समित्यांच्या सदस्यांमधून उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने ऑगस्ट २०१८ मध्ये दिलेल्या आदेशात जैवविविधता मंडळाद्वारे व जैविक विविधता कायदा २००२ ची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर यशस्वीपणे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांवर जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करून समितीमार्फत लोक जैवविविधता नोंदवही तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात ८४० ग्रामपंचायतीमध्ये या जैवविविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जैवविविधता मंडळ नागपूर व विभागीय कार्यालय, पुणे यांच्याकडे ग्रामपंचायत स्तरावरील नोंदवह्या पाठवण्यात आल्या आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीच्या नोंदवह्या सादर करण्यात आल्या नव्हत्या. मात्र, यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायतींनी पंचायत समिती व जिल्हा परिषद असे मिळून या नोंदवह्या पाठवण्याची कारवाई जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत पूर्ण केल्याचे झेडपी पंचायत विभागाकडून सांगण्यात आले आहे. यानुसार विविध टप्प्यातील गावोगावच्या जैवविविधता नोंदी करून त्याची माहिती शासन व वनविभागास जैवविविधता मंडळ सादर करण्यात आली आहे. यानंतर मात्र जैवविधता समित्यांमार्फत करावयाच्या अंमलबजावणी प्रक्रिया अजूनही सुरू झाली नसल्याचे वास्तव ग्रामपंचायत स्तरावर दिसून येत आहे.

कोट

जैवविविधतेच्या संरक्षण संवर्धनासाठी विविध टप्प्यांतील नोंदी करण्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ स्तरावर सादर केली आहे. याबाबत पुढील सूचना आल्यानंतर अंमलबजावणीची कारवाई केली जाईल.

- दिलीप मानकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)

कोट

सन २०१८ मध्ये शासन व जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या सूचनेप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर जैवविधता समित्या गठित केल्या. यासंदर्भात प्रशिक्षण घेतले. आराखडे सादर केले. परंतु, त्यानंतर अंमलबजावणी बाबत अद्याप कुठल्याची सूचना आलेल्या नाहीत.

- आशिष भागवत, जिल्हा सरचिटणीस, ग्रामसेवक युनियन