शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

प्राधान्यक्रम ठरवून पाणीपुरवठा योजना आराखडा राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:13 IST

अमरावती : शासनाची कोणतीही नवीन योजना आली की, निकड पाहून आराखडा करण्याऐवजी निधी मिळतो म्हणून आराखडा तयार करण्याकडे कल ...

अमरावती : शासनाची कोणतीही नवीन योजना आली की, निकड पाहून आराखडा करण्याऐवजी निधी मिळतो म्हणून आराखडा तयार करण्याकडे कल असतो. पाणीपुरवठा योजना बाबतीतही असाच प्रकार पाहावयास मिळत असल्यामुळे ज्या गावांमध्ये खरच पाण्याची निकड आहे आणि त्या गावात वजनदार नेता नसेल तर अशी गावी योजनांपासून बाजूला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना आराखडा राबवत असताना प्राधान्यक्रम ठरवून त्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी ग्रामीण भागातून नागरिकांतून होत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात. याशिवाय ज्या गावांमध्ये वजनदार नेते राहतात त्या गावामध्ये मंत्री आमदार, खासदारांच्या फंडातून पाणीपुरवठा योजना राबविली जाते. सध्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत मानसी ५५ याप्रमाणे पाणीपुरवठा योजनांचा आराखडा करण्याच्या सूचना जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला देण्यात आल्या आहेत. यापूर्वी मानसी ४० लिटरप्रमाणे यापूर्वीचे योजनेमधून पाणीपुरवठा करण्यात आला आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा योजनांचा आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या असल्या तरी डोंगराळ दुर्गम भागातील गावांमध्ये अजूनही चार चार महिने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागतात. त्यामुळे वर्षानुवर्षे जिल्ह्यातील काही गावे पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ही गावे टंचाईमुक्त करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून आराखड्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

बॉक्स

असे आहेत योजनामंजुरीचे अधिकार

२५ लाखांपर्यंतच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी अधिकार जिल्हा परिषद दिले आहेत. त्यावरील कामांच्या योजनांची मंजुरीचे अधिकार अधीक्षक अभियंता आणि शासनाला आहेत. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने आराखड्यातील गावांचा प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे.

कोट

ग्रामीण भागातील कुटुंबांच्या घरात नळाद्वारे पाणी देण्याच्या उद्देशाने शासनाच्यावतीने ‘हर घर नल‘ ही योजना राबविण्यात येत आहे. आजपर्यंत अनेक योजना शासनाच्यावतीने राबविण्यात आल्यात. अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा वर्षानुवर्षे सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे प्राधान्यक्रम निश्चित करून पाणीपुरवठा योजनेचा आराखडा राबविणे गरजेचे आहे.

- महेंद्रसिंग गैलवार,

सदस्य, जिल्हा परिषद